शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे - उद्धवचा भाजपाला इशारा

By admin | Updated: November 1, 2014 21:55 IST

नव्या सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे आहे, जनतेस गृहीत धरून राज्य करता येणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १ - नव्या सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे आहे, जनतेस गृहीत धरून राज्य करता येणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून नव्या भाजपा सरकारला समजुतीच्या चार गोष्टी सांगतानाच राज्य अखंड ठेवावे व जनतेला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती करावी, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. 
 
भाजपाच्या कालच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या सोहळ्याचे भरभरून कौतुक केले, मात्र त्यावेळी सरकारला त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देण्यासही ते विसरले नाहीत. नवे सरकार हे नव्या नवरीसारखे असते. सासूची मर्जी सांभाळण्यासाठी प्रथम नववधू जबाबदारीने वागते, मात्र काळ पुढे सरकल्यावर सून सासूबाईंना वरचढ होते. महाराष्ट्राची जनता 'खाष्ट' नसली तकी उत्तम सासू असल्याचे सांगत सासूबाईंना खुश करावेच लागेल. सासूपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न झालाच तर नव्या सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे आहेच, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवरायांनी जसे हिंदवी स्वराज्य खर्‍या अर्थाने रयतेचे राज्य बनविण्याचा प्रयत्न केला तसाच राज्यकारभार नवे मुख्यमंत्री करतील अशी आशा लेखात व्यक्त करण्यात आली आहे.
 
काय म्हटले आहे अग्रलेखात - 
 
- नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा तर जोरकस झाला. थाटामाटाच्या बाबतीत कसलीच कमतरता तेथे नव्हती. महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसा, त्यात भर घालेल असाच हा भव्य सोहळा होता. शिवरायांच्या विचाराने राज्य चालविण्याचा उच्चार नव्या मुख्यमंत्र्यांनी या आधीच केला आहे. त्यामुळे शिवरायांनी जसे हिंदवी स्वराज्य खर्‍या अर्थाने रयतेचे राज्य बनविण्याचा प्रयत्न केला तसाच राज्यकारभार नवे मुख्यमंत्री करतील अशी आशा आहे.
 
- शेवटी राज्यातील शेठ, साहुकार नव्हे तर फाटका व काटक मावळा हीच शिवरायांच्या स्वराज्याची ताकद होती. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी हे सदैव ध्यानात ठेवायला हवे. नवे सरकार हे नव्या नवरीसारखे असते. सासूबाईंची मर्जी सांभाळण्यासाठी व कुटुंबास खुश करण्यासाठी नववधू सुरुवातीला जबाबदारीने वागत असते. अंगावर पडेल ते काम मनापासून करीत असते व आपला जन्म यासाठीच झाल्याचे समाधान मानून दिवस ढकलीत असते, पण जसजसा काळ पुढे सरकतो तसतशी सूनबाई सासूबाईंना वरचढ होते. महाराष्ट्राची जनता ‘खाष्ट’ नसली तरी उत्तम ‘सासू’ आहे. सासूबाईस खूश करावे लागेल हे तर नक्कीच, पण सासूबाईंपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न झालाच तर नव्या सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे आहे. जनतेस गृहीत धरून राज्य करता येणार नाही. राजकारण बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांनी आता राज्य करावे. राज्य अखंड ठेवावे व जनतेला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती करावी.
 
- आश्‍वासनांची पूर्तता म्हणजे जादूची कांडी फिरविणे नाही हे खरेच, पण जनता नव्या सरकारकडे एका अपेक्षेने पाहत आहे. नव्या राज्यकारभाराची सुरुवात म्हणजे जनतेच्या आशा-आकांक्षांच्या पूर्ततेची पहाट आहे असा विश्‍वास जनमानसाच्या मनात रूजवावा लागेल. हा विश्‍वासच सुशासनाचा पाया असतो. नवीन सरकार हा पाया भक्कमपणे उभारील अशी अपेक्षा आहे.