शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

भाजपाच्या सत्तेने विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवित

By admin | Updated: May 28, 2014 00:56 IST

केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आल्यामुळे विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजपा सुरूवातीपासूनच छोट्या राज्यांचा सर्मथक आहे. त्यातच आता केंद्रात सत्ता आल्याने विदर्भ राज्य

आंदोलनाचा अँक्शन प्लॅन : गावोगावी करणार जनजागरण

संतोष अरसोड - यवतमाळ

केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आल्यामुळे विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजपा सुरूवातीपासूनच छोट्या राज्यांचा सर्मथक आहे. त्यातच आता केंद्रात सत्ता आल्याने विदर्भ राज्य निर्मितीच्या प्रक्रियेला वेग येईल, असा सूर उमटू लागला आहे.

वेगळ्या विदर्भाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आला. मात्र विदर्भाच्या वाट्याला सतत उपेक्षाच आली. पश्‍चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भाला कधीच झुकते माप दिले नाही. विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भाची बाजू कधीच लावून धरल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळ्या विदर्भाच्या बाजूने होता. मात्र या विषयावर ते कधीच आक्रमक झाले नाहीत. अशातच तेलंगणा राज्य निर्मिती झाली आणि वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नाने पुन्हा उचल खाल्ली. मागील वर्षी वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर मतदान घेण्याचे अभिनव आंदोलन अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आदी शहरात घेण्यात आले. या जनमत चाचणीत जनतेने उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. शिवसेना वगळता अनेक महत्वाच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला सहभाग नोंदविला. या चाचणीने वेगळ्या विदर्भाच्या बाजूने कौल दिला. नागपूर अधिवेशना दरम्यान घेण्यात आलेली जनमत चाचणी आणि अभिरूप विधानसभा यामुळे खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीसुध्दा विदर्भावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली होती.आता तर केंद्रात भाजपाचे सरकार आले आहे. त्यातच नितीन गडकरींसारख्या विदर्भवादी नेत्याची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या संयुक्त महाराष्ट्रवादी भूमिकेला आता पाहिजे तशी किंमत राहील असे वाटत नसल्यामुळे वेगळ्या विदर्भाचा मार्ग मोकळा होईल असे चित्र निर्माण झाले आहे. या वातावरणाचा फायदा घेऊन वेगळ्या विदर्भाची चळवळ पुन्हा जोर पकडणार आहे.