शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाऊस सरासरी गाठेना!

By admin | Updated: July 9, 2016 20:04 IST

बहुतांशी जून महिना कोरडा गेल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असला तरी तो अजून सरासरी गाठू शकलेला नाही

ऑनलाइन लोकमत -
आत्तापर्यंत ९० टक्केच पाऊस : नाशिक जिल्हयात अवघा ४४ टक्केच पाऊस
पुणे, दि. 09 - बहुतांशी जून महिना कोरडा गेल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असला तरी तो अजून सरासरी गाठू शकलेला नाही. १ जूनपासून आत्तापर्यंत राज्यात जेवढा पाऊस पडणे अपेक्षित होते, त्यापेक्षा १० टक्के पाऊस कमी पडला आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात आत्तापर्यंत सर्वात कमी पाऊस नाशिक जिल्हयात झाला असून तो सरासरीच्या केवळ ४४ टक्केच पडला आहे.
 
गेल्या २ वर्षांपासून सलग पडलेल्या दुष्काळाने महाराष्ट्र होरपळून निघाला होता. पावसाअभावी अनेक ठिकाणी शेती ओसाड पडल्या होत्या. तर धरणांमधील पाणीसाठाही संपण्याच्या मार्गावर पोहोचल्याने पिण्याच्या पाण्याचीही गंभीर टंचाई निर्माण झाली होती. अशातच महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडणार असे भाकित भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले होते. त्यामुळे शेतक-यांसह सामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते होते. मात्र जून महिन्यात मान्सून राज्यात उशीरा दाखल झाला आणि त्यानंतरही खूप कमी प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून पावसाने मुसळधारपणे बरसण्यास सुरूवात केली आणि जुलै महिन्यातही तो मुक्तपणे बरसतच आहे. असे असले तरी राज्यातील पाऊस अजूनही सरासरी गाठू शकलेला नाही. राज्याच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात १ जूनपासून आत्तापर्यंत ३२७.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात या काळात २९४.३ मिमीच पाऊस पडला आहे. तो सरासरीच्या ९० टक्के आहे.
 
राज्यात प्रत्येक भागात पावसाचे प्रमाण वेगवेगळे राहिले आहे. काही जिल्हयांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे तर काही जिल्हयांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी पडला आहे. राज्यात सर्वात कमी अवघा ४४ टक्केच पाऊस नाशिक जिल्हयांमध्ये पडला आहे. त्यापाठोपाठ नंदूरबार जिल्हयात ५४ टक्केच पाऊस पडला आहे. कोल्हापूर जिल्हयात अवघा ६० टक्केच, धुळे जिल्हयात ७१ टक्के, जळगाव जिल्हयात ७२ टक्के, सोलापूर, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्हयात ७५ टक्के, यवतमाळ जिल्हयात ७७ टक्के, भंडारा जिल्हयात ७८ टक्केच पाऊस पडला आहे. 
 
राज्यात आत्तापर्यंत सर्वाधिक पाऊस सांगली जिल्हयात पडला आहे. तेथे आत्तापर्यंत १३८ टक्के पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ रत्नागिरी जिल्हयात १२० टक्के, पालघर जिल्हयात ११७ टक्के पाऊस पडला आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतातूर झालेल्या शेतकºयांमध्ये मुसळधार पावसामुळे आनंदाचे वातावरण आहे. पाऊस पडू लागल्याने शेतकºयांकडून शेतात पेरण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत.
 
राज्यातील पाऊस दृष्टिक्षेपात
५० टक्क्यांहून कमी पाऊस : नाशिक.
५० ते ७५ टक्के दरम्यान पाऊस : धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद
७५ ते १०० टक्के पाऊस : अहमदनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर.
१०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, गडचिरोली.
 
गतवर्षी याच काळात पडला होता ७३ टक्के पाऊस
गतवर्षीपेक्षा यावर्षीची पावसाची स्थिती चांगली आहे. गेल्यावर्षी याच काळात राज्यात ७३ टक्केच पाऊस पडला होता. यावर्षी त्यापेक्षा १७ टक्के जास्त पाऊस पडला आहे. गतवर्षी सातारा, सांगली, नागपूर आणि गडचिरोली राज्यांमध्येच पाऊस सरासरी गाठू शकला होता. उर्वरित सर्व जिल्हयांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. 
 
नाशिकमध्ये सलग तिस-या वर्षीही कमी पाऊस
नाशिक जिल्हयामधील दुष्काळ अजूनही संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. गेल्या २ वर्षापासून दुष्काळाने होरपळणाºया नाशिककडे यंदाही पावसाने पाठ फिरविली आहे. गतवर्षी २०१५ मध्ये नाशिकमध्ये १ जून ते आत्तापर्यंतच्या ४९ टक्के पाऊस पडला होता. यंदा तर यापेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यावर्षी या काळात अवघा ४४ टक्के पाऊस पडला आहे.