शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

‘पानसरेंचा खून करणारी विचारधारा सत्तेवर’

By admin | Updated: November 23, 2015 02:39 IST

‘गेल्या काही दिवसांत देशात धर्मांध शक्तींनी डोके वर काढले आहे. देशभर जाणीवपूर्वक असहिष्णुतेचे वातावरण तयार करून धार्मिक उन्माद माजविण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे.

कोल्हार (अहमदनगर) : ‘गेल्या काही दिवसांत देशात धर्मांध शक्तींनी डोके वर काढले आहे. देशभर जाणीवपूर्वक असहिष्णुतेचे वातावरण तयार करून धार्मिक उन्माद माजविण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. ज्या विचारधारेने डॉ. गोविंद पानसरेंचा खून केला, तीच विचारधारा आज सत्तेवर आहे,’ असा घणाघाती आरोप गोविंद पानसरेंच्या कन्या स्मिता पानसरे यांनी केला.पानसरे, कलबुर्गी व दाभोलकर यांच्या हत्या होऊनही आरोपी मोकाट आहेत. याबाबत सरकारला जाग यावी, म्हणून पानसरेंची जन्मभूमी कोल्हार (ता. राहाता) ते कर्मभूमी कोल्हापूर अशा समता संघर्ष यात्रेला रविवारी कोल्हारमधून प्रारंभ झाला. त्या वेळी पानसरे बोलत होत्या. भाकपचे राज्य सचिव भालचंद्र कांगो, अंनिसचे जिल्हाध्यक्ष अरुण कडू, माजी सरपंच डॉ. संजय खर्डे, सुरेश पानसरे आदी या वेळी उपस्थित होते.स्मिता म्हणाल्या की, ‘सत्तेवर असणारे सरकार आम्हाला न्याय देईल का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. सध्या देशात जातीयवादी संघटना असहिष्णुतेचा माहोल तयार करीत आहेत. त्यांनी मोदींचा चेहरा पुढे करून सत्ता हस्तगत केली आणि देश लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे झुकला. या विरोधात सर्वांनी एकजुटीने सहभागी होऊन पानसरे, दाभोलकरांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र यावे,’ असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, कोल्हारमधून सुरू झालेली ही यात्रा राहुरी, नगर, पारनेर, राळेगणसिद्धी, शिरूर, लोणंद, सातारामार्गे २४ नोव्हेंबरला कोल्हापूरला पोहोचणार आहे. (वार्ताहर)