शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकेसाठी मतदान सुरू

By admin | Updated: April 22, 2015 11:52 IST

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील पाच नगरपालिकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील पाच नगरपालिकांसाठी  आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली असून औरंगाबादमध्ये पहिल्या दोन तासात ११ टक्के तर नवी मुंबईत १३ टक्के मतदान झाले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असून संध्याकाळी साडेपपाच पर्यंत मतदान करता येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलिस बंदबोस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान औरंगाबादमध्ये माजी आमदार व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी मतदानाचा हक्क बजावत सर्व नागरिकांना भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले. तर नवी मुंबईत गणेश नाईक यांनी सहकुटुंब मतदान करत जनता विकासाच्या बाजून मतदान करून आपल्यालाच पुन्हा निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला. उद्या मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येईल. 
औरंगाबाद महापालिकेत दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १११ जागांसाठी, तर नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांसाठी ही मतदान प्रक्रिया होत आहे.  औरंगाबादेत ९०४ व नवी मुंबईत ५६८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील वाडी, मोवाड, जळगाव जिल्ह्यातील वरणगाव आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर-कुळगाव व अंबरनाथ या पाच नगरपालिकांसाठीही आज मतदान होत आहे़.