शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नाशिकमध्ये उगवत्या दिनकराच्या साक्षीने मतदानाला सुरूवात; चोख बंदोबस्त

By admin | Updated: February 21, 2017 09:18 IST

शहरात सकाळी साडेसात वाजेपासूनच नागरिकांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.

अझहर शेख /आॅनलाइन लोकमत / नाशिक : शहरात सकाळी साडेसात वाजेपासूनच नागरिकांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. शहरासह उपनगरांमध्येही पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरापर्यंत कोणताही बुथ, किंवा दुकाने लावण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. नाशिककर मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र नागरिक मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत उत्तम नाशिकसाठी महापालिके मध्ये नव्याने येत्या पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधींची निवड करताना दिसत आहे. पंधरवड्यापासून शहरात महापालिका निवडणूकीचा रणसंग्राम सुरू झाला होता. प्रचारफेऱ्या, उमेदवारांच्या गाठीभेटी, नेत्यांच्या प्रचार सभा या सर्वांनी अवघे शहर जणू ढवळून निघाले होते. सर्वत्र ‘विजयी करा....विजयी करा...’ असाचा सूर कानी पडत होता; मात्र आदर्श आचारसंहितेनुसार रविवारी (दि.१९) संध्याकाळपासून प्रचाराचा हा सूर बंद पडला अन सारे शांत..शांत..झाले. मंगळवारी (दि.२१) मतदानाचा दिवस उजाडला आणि लोकशाहीने दिलेला हक्क बजावण्यासाठी नागरिक सकाळी साडेसात वाजेपासून घराबाहेर पडले. शहरात आठवडाभरापासून वाढते तपमान लक्षात घेता वृध्द, महिला तसेच युवतींनी देखील सकाळी कोवळ्या उन्हात ‘फ्रेश’मूडमध्ये मतदानाला जाणे पसंत केले. यामुळे मतदान केंद्रांवर गर्दी पहावयास मिळत होती. सर्वच मतदान केंद्रांभोवती चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे नाव, शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी झळकविण्यात आली आहे. विशेष म्हणजे मतदार ही माहिती वाचून केंद्रात प्रवेश करत आहेत. यामुळे यंदा नाशिक महापालिकेत सुशिक्षित, स्वच्छ लोकप्रतिनिधी निवडून जाण्याची आशा आहे.