शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा महासागर - नितीन गडकरी

By admin | Updated: May 5, 2015 11:40 IST

जकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

नागपूर : राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन केंद्र इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण व भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.  'राजकारणात कोणीही समाधआनी नाही, नगरसेवकाला आमदार तर आमदाराला मंत्री व्हायचे असते. मंत्र्यांना चांगली खाती हवी असतात. तर मुख्यमंत्र्यांसमोर राज्याचा कारभार असताना त्यांना केंद्रात जायचे असते. इथे कोणीही तृप्त नसते. महत्वाकांक्षा प्रत्येकालाच पळायला लावत असते' असेही गडकरी म्हणाले. 
दहशतवादी विचारांमुळे अनेक देशांतील स्वातंत्र्य, समता व बंधूभाव नष्ट होत आहे. लोकतंत्र, धर्मनिरपेक्षता व समाजवाद संकटात आहे. अशा परिस्थितीत जगाला दिशा दाखविण्याची शक्ती केवळ बुद्ध विचारात आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
गडकरी या कार्यक्रमासाठी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे अध्यक्षस्थानी तर, दिल्ली विद्यापीठाचे बौद्ध अध्ययन विभागप्रमुख भदंत डॉ. सत्यपाल व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम प्रमुख अतिथी होते. 
गडकरी म्हणाले, अनेक देशांनी अणुशस्त्रे विकसित केली असून,काही अणुशस्त्रांची संहारक शक्ती कल्पनातीत आहे. यामुळे सर्वत्र तणाव व अशांतता पसरली आहे. भविष्यात कोणत्या दिशेने वाटचाल करायची, यावर संपूर्ण जगात विचारमंथन सुरू आहे. याचे उत्तर केवळ बुद्ध विचारात आहे. देशाच्या प्रगतीसाठी ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान आवश्यक आहे; पण त्याशिवाय मूल्यांचे जतन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. विकासासोबत विविध प्रकारचे दोष येत असतात. त्यावर केवळ मूल्यांच्या बळावरच मात करता येते. 
शैक्षणिक क्षेत्र अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. शिक्षणातील गुणात्मकता व सर्वसमावेशकता वाढली पाहिजे. शिक्षणाचा संशोधन व राष्ट्रविकासाकरिता उपयोग झाला पाहिजे. विज्ञानामुळे देशातील गरिबी दूर होऊ शकते. जगातील कोणताही धर्म वाईट नाही. हा प्रत्येकाच्या विश्‍वासाचा भाग आहे. समस्या प्रत्येक क्षेत्रात असून सर्व प्रश्न सोडविण्याची ताकद कोणामध्येही नाही, असे त्यांनी सांगितले.
नागपूर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी संचालन केले तर, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे यांनी आभार मानले.
'धम्मरत्न सर्वश्रेष्ठ आहे. शासनाला बुद्ध विचाराचे महत्त्व पटले आहे. यामुळे बुद्ध विचारांच्या संरक्षणासाठी विविध योजना राबवून अनुदान दिले जात आहे. पाली भाषेत बुद्ध धम्मासह अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. संस्कृत व पाली भाषा एकमेकांच्या भगिनी आहेत'
-भदंत डॉ. सत्यपाल
'सर्व देश अणुशस्त्रांनी परिपूर्ण आहेत. या अणुशस्त्रांमध्ये संपूर्ण मानवजातीचा चारवेळा संहार करण्याची क्षमता आहे. कोणत्याही देशाची मानसिकता बदलल्यास काय होऊ शकते याची कल्पना न केलेलीच बरी. भविष्यात बुद्धाची शिकवणच जगाच्या कामी येणार आहे. '
-डॉ. सिद्धार्थविनायक काणे
(प्रतिनिधी)