शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

समाजासाठी राजकारणी व्यासपीठावर

By admin | Updated: April 15, 2015 23:18 IST

कुठल्याही धार्मिक, सामाजिक किंवा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचे काय काम, असा प्रश्न विचारला जातो. आम्ही मोठे आहोत म्हणून आम्हाला बोलावले जाते,

पुणे : कुठल्याही धार्मिक, सामाजिक किंवा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचे काय काम, असा प्रश्न विचारला जातो. आम्ही मोठे आहोत म्हणून आम्हाला बोलावले जाते, हा समज चुकीचा आहे. देशाची नीती ठरविण्याची महत्त्वाची भूमिका राजकारणी पार पाडत असतात. त्यामुळे विविध क्षेत्रातील परिस्थिती जाणून घेण्याकरिता अशा कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो, अशा शब्दांत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी विरोधकांना टोला लगावला. श्री संत गुलाबराव महाराज जीवन शताब्दीनिमित्त श्री संत गुलाबराव महाराज ८ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी डॉ. डी. वाय पाटील यांना ‘श्री संत गुलाबराव महाराज’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच श्री संत गुलाबराव महाराज समग्र वाङ्मयांपैकी ५ खंडाचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष डॉ. विजय भटकर, स्वागताध्यक्ष खासदार अनिल शिरोळे, संयोजिका उषा काकडे, डॉ. वसंतराव गाडगीळ आणि कार्याध्यक्ष नारायण मोहोड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गोविंदगिरी महाराज होते. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांच्या भाऊगर्दीबद्दल नेहमीच साहित्य वर्तुळातून टिकेची झोड उठविली जाते, त्याला आपल्या भाषणात सुमित्रा महाजन यांनी एकप्रकारे प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘‘देशाची निती मग ती शिक्षण, उद्योग, धर्म, साहित्य कुठल्याही क्षेत्राची असो, ती ठरविण्याची जवाबदारी राजकीय नेत्यांची असते. देशाचा व्यक्ती चांगला नागरिक कसा होईल, हे पहावे लागते. सामाजिक परिस्थितीची माहिती असावी म्हणून अशा कार्यक्रमांना आम्ही आवर्जून उपस्थित राहतो. यात विशिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तींना बोलवण्यामागे योजनांची घोषणा व्हावी, असा आयोजकांचा हेतू असतोही. मात्र ते समजून घेतले पाहिजे.’’ शिक्षणाचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. अंधश्रद्धा नको पण जीवनात श्रद्धा असली पाहिजे, त्यानेच जीवन समृद्ध होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संतश्री गुलाबराव महाराज यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांच्यासारखा महापुरूष जगात शोधूनही सापडणार नाही, असे सांगून गोविंदगिरी महाराज यांनी भविष्यात जगाचे ‘बायबल’ हे भगवद्गीता असेल, असे भाकितही वर्तविले. प्रास्ताविक नारायण मोहोड यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटनापूवी ग्रंथदिंडी काढण्यात आली. (प्रतिनिधी) ४ब्रिटिीशांनी १८५७च्या उठावाला ‘बंड’ असे नाव दिले आणि तेच आज रूढ झाले. हा शब्द इंग्रजींना आणला, पण आपण तेच म्हणत आहोत हे दुर्दैव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याला ‘स्वातंत्र्यसमर’ म्हटले पाहिजे, असे सांगितले. आपल्याच इतिहासाबद्दल आपण अनभिज्ञ आहोत, अशी खंतही सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली.जगातील ज्ञानाधिष्ठित संस्कृती कोणती असेल, तर ती भारतीय संस्कृती. आज धर्माच्या नावावर युद्ध आणि अतिरेकीवाद फोफावत चालला आहे, जो विचार करायला लावणारा आहे. देशाची संस्कृती विशाल आहे, ती कशामुळे आहे हे राजकारण्यांना समजायला हवे.- डॉ. विजय भटकर, संमेलनाध्यक्ष