शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

समाजासाठी राजकारणी व्यासपीठावर

By admin | Updated: April 15, 2015 23:18 IST

कुठल्याही धार्मिक, सामाजिक किंवा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचे काय काम, असा प्रश्न विचारला जातो. आम्ही मोठे आहोत म्हणून आम्हाला बोलावले जाते,

पुणे : कुठल्याही धार्मिक, सामाजिक किंवा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचे काय काम, असा प्रश्न विचारला जातो. आम्ही मोठे आहोत म्हणून आम्हाला बोलावले जाते, हा समज चुकीचा आहे. देशाची नीती ठरविण्याची महत्त्वाची भूमिका राजकारणी पार पाडत असतात. त्यामुळे विविध क्षेत्रातील परिस्थिती जाणून घेण्याकरिता अशा कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो, अशा शब्दांत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी विरोधकांना टोला लगावला. श्री संत गुलाबराव महाराज जीवन शताब्दीनिमित्त श्री संत गुलाबराव महाराज ८ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी डॉ. डी. वाय पाटील यांना ‘श्री संत गुलाबराव महाराज’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच श्री संत गुलाबराव महाराज समग्र वाङ्मयांपैकी ५ खंडाचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष डॉ. विजय भटकर, स्वागताध्यक्ष खासदार अनिल शिरोळे, संयोजिका उषा काकडे, डॉ. वसंतराव गाडगीळ आणि कार्याध्यक्ष नारायण मोहोड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गोविंदगिरी महाराज होते. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांच्या भाऊगर्दीबद्दल नेहमीच साहित्य वर्तुळातून टिकेची झोड उठविली जाते, त्याला आपल्या भाषणात सुमित्रा महाजन यांनी एकप्रकारे प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘‘देशाची निती मग ती शिक्षण, उद्योग, धर्म, साहित्य कुठल्याही क्षेत्राची असो, ती ठरविण्याची जवाबदारी राजकीय नेत्यांची असते. देशाचा व्यक्ती चांगला नागरिक कसा होईल, हे पहावे लागते. सामाजिक परिस्थितीची माहिती असावी म्हणून अशा कार्यक्रमांना आम्ही आवर्जून उपस्थित राहतो. यात विशिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तींना बोलवण्यामागे योजनांची घोषणा व्हावी, असा आयोजकांचा हेतू असतोही. मात्र ते समजून घेतले पाहिजे.’’ शिक्षणाचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. अंधश्रद्धा नको पण जीवनात श्रद्धा असली पाहिजे, त्यानेच जीवन समृद्ध होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संतश्री गुलाबराव महाराज यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांच्यासारखा महापुरूष जगात शोधूनही सापडणार नाही, असे सांगून गोविंदगिरी महाराज यांनी भविष्यात जगाचे ‘बायबल’ हे भगवद्गीता असेल, असे भाकितही वर्तविले. प्रास्ताविक नारायण मोहोड यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटनापूवी ग्रंथदिंडी काढण्यात आली. (प्रतिनिधी) ४ब्रिटिीशांनी १८५७च्या उठावाला ‘बंड’ असे नाव दिले आणि तेच आज रूढ झाले. हा शब्द इंग्रजींना आणला, पण आपण तेच म्हणत आहोत हे दुर्दैव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याला ‘स्वातंत्र्यसमर’ म्हटले पाहिजे, असे सांगितले. आपल्याच इतिहासाबद्दल आपण अनभिज्ञ आहोत, अशी खंतही सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली.जगातील ज्ञानाधिष्ठित संस्कृती कोणती असेल, तर ती भारतीय संस्कृती. आज धर्माच्या नावावर युद्ध आणि अतिरेकीवाद फोफावत चालला आहे, जो विचार करायला लावणारा आहे. देशाची संस्कृती विशाल आहे, ती कशामुळे आहे हे राजकारण्यांना समजायला हवे.- डॉ. विजय भटकर, संमेलनाध्यक्ष