शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

राजकीय वरदहस्ताने बेसुमार उपसा

By admin | Updated: June 8, 2017 01:33 IST

माती व मुरुमाचा गेल्या दहा वर्षापासून बेसुमार बेकायदा उपसा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउर्से : द्रुतगती महामार्गावर परंदवडी ते कामशेत जवळील डोंगरावरील माती व मुरुमाचा गेल्या दहा वर्षापासून बेसुमार बेकायदा उपसा केला जात आहे. याला स्थानिक राजकीय हस्तक्षेप, वरदहस्त कारणीभूत ठरत आहे. पवन मावळात दहा वर्षात अनेक बांधकामे झाली. नवीन उद्योगांना भरीसाठी मोठ्या प्रमाणावर माती व मुरुम याची आवश्यकता असते. त्यासाठी परिसरातील डोंगरातून उत्खनन करण्यात आले. द्रुतगती महामार्गालगतच्या डोंगरावरील उत्खनन सहज दृष्टीस पडते. वेगाने विकसित होणाऱ्या पवन मावळातून द्रुतगती महामार्ग गेल्याने लगतचा डोंगराळ भाग ओसाड पडला. गावातील शेतकऱ्यांना आपली जनावरे डोंगरावर चरावयासही घेऊन जाता येत नाही. त्यामुळे डोंगरावरील जनावरांची ये-जा कमी झाली. डोंगर व द्रुतगती महामार्गालगतच्या जमिनींना रस्ता नसल्याने व भाव कमी असल्याने जमिनी व डोंगर शेतकऱ्यांनी विकून टाकले. जमिनी, डोंगर घेणारे मालक बाहेरील असल्याने या ठिकाणी मालकांचे जाणे येणे नसल्याने स्थानिकांनी यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली. गेली दहा वर्षात पवन मावळातील घरे, बंगले, कंपन्या, रस्त्यांसाठी भरावासाठी लागणारी माती व मुरूम डोंगरावरील पायथ्याशी उकरून आणण्यात आला. यासाठी स्थानिक ठेकेदार व पुढाऱ्यांनी हातमिळवणी करून जेसीबी, पोकलँडच्याद्वारे बेसुमार उत्खनन केले. अनेक शेतकऱ्यांनी डोंगर विकून पैसे मिळविले. पुन्हा त्याच जागेतून कुठलीही रॉयल्टी न देता लाखो-करोडो रुपयांचा मुरूम विकून धनदांडग्यांनी बक्कळ पैसे कमविले. द्रुतगती महामार्गा लगत व मध्य ठिकाणी असणाऱ्या डोंगर भागात हा गोरखधंदा गेल्या दहा वर्षापासून राजरोसपणे सुरू आहे. काही ठिकाणी परस्पर नाममात्र दंड आकारून काम चालू ठेवले जाते. कधी रात्री तर कधी सकाळच्या वेळेस या मुरुमाची वाहतूक केली जात आहे. >दिवसाढवळ्या वाहतूक : इको सायलेंट झोनकाही ठिकाणी गायरानही वाचलेले नाही. गावातून छोट्यामोठ्या बांधकामासाठी व वीटभट्टीसाठी मातीचा, मुरुमाचा पुरवठा आवश्यक असतो. त्यासाठी ट्रॅक्टरमधून याची दिवसा ढवळ्या वाहतूक सुरू असते. माती, मुरुमासाठी शुल्लक रक्कम शेतकऱ्यांना देऊन व्यायवसायिक मोठा फायदा कमवितात. राज्य शासनाने डोंगर पायथा व डोंगरावरील उत्खननास बंदीचा नवीन कायदा करूनही गावाजवळील डोंगरावर उत्खनन सुरूच आहे. याबाबत स्थानिक तलाठी किंवा अधिकारी कुठलीच कारवाई करताना दिसत नाही. या उत्खनामुळे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दगड गोटे व माती ओढ्यााद्वारे वाहून जाते. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. वळ आणि मुळशी तालुका इको सायलंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी उत्खनन करण्यास पुर्ण बंदी असल्याने उत्खननासाठी परवानगी घ्यावी लागते. स्वताची जागा असली तरी परवानगी आवश्यक आहे. मात्र, कोणीच परवानगी घेताना दिसत नाही.