शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वरदहस्ताने बेसुमार उपसा

By admin | Updated: June 8, 2017 01:33 IST

माती व मुरुमाचा गेल्या दहा वर्षापासून बेसुमार बेकायदा उपसा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउर्से : द्रुतगती महामार्गावर परंदवडी ते कामशेत जवळील डोंगरावरील माती व मुरुमाचा गेल्या दहा वर्षापासून बेसुमार बेकायदा उपसा केला जात आहे. याला स्थानिक राजकीय हस्तक्षेप, वरदहस्त कारणीभूत ठरत आहे. पवन मावळात दहा वर्षात अनेक बांधकामे झाली. नवीन उद्योगांना भरीसाठी मोठ्या प्रमाणावर माती व मुरुम याची आवश्यकता असते. त्यासाठी परिसरातील डोंगरातून उत्खनन करण्यात आले. द्रुतगती महामार्गालगतच्या डोंगरावरील उत्खनन सहज दृष्टीस पडते. वेगाने विकसित होणाऱ्या पवन मावळातून द्रुतगती महामार्ग गेल्याने लगतचा डोंगराळ भाग ओसाड पडला. गावातील शेतकऱ्यांना आपली जनावरे डोंगरावर चरावयासही घेऊन जाता येत नाही. त्यामुळे डोंगरावरील जनावरांची ये-जा कमी झाली. डोंगर व द्रुतगती महामार्गालगतच्या जमिनींना रस्ता नसल्याने व भाव कमी असल्याने जमिनी व डोंगर शेतकऱ्यांनी विकून टाकले. जमिनी, डोंगर घेणारे मालक बाहेरील असल्याने या ठिकाणी मालकांचे जाणे येणे नसल्याने स्थानिकांनी यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली. गेली दहा वर्षात पवन मावळातील घरे, बंगले, कंपन्या, रस्त्यांसाठी भरावासाठी लागणारी माती व मुरूम डोंगरावरील पायथ्याशी उकरून आणण्यात आला. यासाठी स्थानिक ठेकेदार व पुढाऱ्यांनी हातमिळवणी करून जेसीबी, पोकलँडच्याद्वारे बेसुमार उत्खनन केले. अनेक शेतकऱ्यांनी डोंगर विकून पैसे मिळविले. पुन्हा त्याच जागेतून कुठलीही रॉयल्टी न देता लाखो-करोडो रुपयांचा मुरूम विकून धनदांडग्यांनी बक्कळ पैसे कमविले. द्रुतगती महामार्गा लगत व मध्य ठिकाणी असणाऱ्या डोंगर भागात हा गोरखधंदा गेल्या दहा वर्षापासून राजरोसपणे सुरू आहे. काही ठिकाणी परस्पर नाममात्र दंड आकारून काम चालू ठेवले जाते. कधी रात्री तर कधी सकाळच्या वेळेस या मुरुमाची वाहतूक केली जात आहे. >दिवसाढवळ्या वाहतूक : इको सायलेंट झोनकाही ठिकाणी गायरानही वाचलेले नाही. गावातून छोट्यामोठ्या बांधकामासाठी व वीटभट्टीसाठी मातीचा, मुरुमाचा पुरवठा आवश्यक असतो. त्यासाठी ट्रॅक्टरमधून याची दिवसा ढवळ्या वाहतूक सुरू असते. माती, मुरुमासाठी शुल्लक रक्कम शेतकऱ्यांना देऊन व्यायवसायिक मोठा फायदा कमवितात. राज्य शासनाने डोंगर पायथा व डोंगरावरील उत्खननास बंदीचा नवीन कायदा करूनही गावाजवळील डोंगरावर उत्खनन सुरूच आहे. याबाबत स्थानिक तलाठी किंवा अधिकारी कुठलीच कारवाई करताना दिसत नाही. या उत्खनामुळे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दगड गोटे व माती ओढ्यााद्वारे वाहून जाते. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. वळ आणि मुळशी तालुका इको सायलंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी उत्खनन करण्यास पुर्ण बंदी असल्याने उत्खननासाठी परवानगी घ्यावी लागते. स्वताची जागा असली तरी परवानगी आवश्यक आहे. मात्र, कोणीच परवानगी घेताना दिसत नाही.