शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलातील बंडाचा डाव उधळला

By admin | Updated: January 2, 2015 02:41 IST

राज्यातील वायरलेस यंत्रणा (बिनतारी संदेशवहन यंत्रणा) बंद पाडण्याचा धक्कादायक कट काही कर्मचाऱ्यांनी रचला होता;

३१ डिसेंबरच्या रात्रीचा प्रकार : राज्यभरातील वायरलेस यंत्रणा बंद पाडण्याचा प्रयत्न फसला विनोद काकडे - औरंगाबाद पोलिसांच्या मागण्या आणि समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला राज्यातील वायरलेस यंत्रणा (बिनतारी संदेशवहन यंत्रणा) बंद पाडण्याचा धक्कादायक कट काही कर्मचाऱ्यांनी रचला होता; परंतु उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अत्यंत समयसूचकतेने हे प्रकरण हाताळल्यामुळे हा डाव उधळला गेल्याचे समजते. पोलीस दलाच्या वायरलेस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. २००५पासून या विभागासाठी भरतीच झालेली नाही. ६० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. या सर्व बाबींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री बरोबर १२ वाजता (नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला) संदेशवहन यंत्रणा बंद पाडण्याचा कट रचला गेला होता, असे सूत्रांकडून समजते.गेल्या महिनाभरापासून या बंडाची डाळ शिजत होती. त्याची संपूर्ण तयारीही झाली होती; परंतु ऐनवेळी गृहविभागाला याची कुणकुण लागली अन् उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना आखल्या. त्यामुळे हा कट फसला. जर तो यशस्वी झाला असता तर काही क्षणापुरती का होईना राज्यभरातील अख्खी पोलीस यंत्रणा ठप्प झाली असती. कोठे काय घडले, घडत आहे, काय करायचे आहे, याची काहीच माहिती पोलिसांना मिळू शकली नसती. तीन दशकांपूर्वीही...तीन दशकांपूर्वी बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री असताना पोलीस दलातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारे बंड करून संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु शासनाने तो हाणून पाडला. त्या वेळी तसा प्रयत्न करणाऱ्यांना शासनाने घरचा रस्ता दाखविला होता. त्यानंतर ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या बंडाचा हा प्रकार उजेडात आल्याने आता पुन्हा पोलीस दलातील असंतोषाला तोंड फुटले आहे. पोलीस ठाणे, चौक्या, पोलीस गाड्यांमध्ये असलेली वायरलेस यंत्रणा आॅपरेट करण्यासाठी पोलीस शिपाई नियुक्त केलेला असतो; परंतु शिपायाऐवजी फौजदार दर्जाचे अधिकारी नेमण्याचे आदेश गृहविभागाकडून ३१ डिसेंबरच्या रात्री अचानक देण्यात आले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी ती जबाबदारी पार पाडली. आम्ही कौशल्याने परिस्थिती हाताळली ३१ तारखेला असे काही घडणार, याची कुणकुण आम्हाला लागली होती. मात्र आम्ही कौशल्याने परिस्थिती हाताळली आणि असे काहीच घडले नाही.- डॉ. रणजीत पाटील, गृहराज्य मंत्री