शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

पोलीस दलातील बंडाचा डाव उधळला

By admin | Updated: January 2, 2015 02:41 IST

राज्यातील वायरलेस यंत्रणा (बिनतारी संदेशवहन यंत्रणा) बंद पाडण्याचा धक्कादायक कट काही कर्मचाऱ्यांनी रचला होता;

३१ डिसेंबरच्या रात्रीचा प्रकार : राज्यभरातील वायरलेस यंत्रणा बंद पाडण्याचा प्रयत्न फसला विनोद काकडे - औरंगाबाद पोलिसांच्या मागण्या आणि समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला राज्यातील वायरलेस यंत्रणा (बिनतारी संदेशवहन यंत्रणा) बंद पाडण्याचा धक्कादायक कट काही कर्मचाऱ्यांनी रचला होता; परंतु उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अत्यंत समयसूचकतेने हे प्रकरण हाताळल्यामुळे हा डाव उधळला गेल्याचे समजते. पोलीस दलाच्या वायरलेस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. २००५पासून या विभागासाठी भरतीच झालेली नाही. ६० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. या सर्व बाबींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री बरोबर १२ वाजता (नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला) संदेशवहन यंत्रणा बंद पाडण्याचा कट रचला गेला होता, असे सूत्रांकडून समजते.गेल्या महिनाभरापासून या बंडाची डाळ शिजत होती. त्याची संपूर्ण तयारीही झाली होती; परंतु ऐनवेळी गृहविभागाला याची कुणकुण लागली अन् उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना आखल्या. त्यामुळे हा कट फसला. जर तो यशस्वी झाला असता तर काही क्षणापुरती का होईना राज्यभरातील अख्खी पोलीस यंत्रणा ठप्प झाली असती. कोठे काय घडले, घडत आहे, काय करायचे आहे, याची काहीच माहिती पोलिसांना मिळू शकली नसती. तीन दशकांपूर्वीही...तीन दशकांपूर्वी बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री असताना पोलीस दलातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारे बंड करून संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु शासनाने तो हाणून पाडला. त्या वेळी तसा प्रयत्न करणाऱ्यांना शासनाने घरचा रस्ता दाखविला होता. त्यानंतर ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या बंडाचा हा प्रकार उजेडात आल्याने आता पुन्हा पोलीस दलातील असंतोषाला तोंड फुटले आहे. पोलीस ठाणे, चौक्या, पोलीस गाड्यांमध्ये असलेली वायरलेस यंत्रणा आॅपरेट करण्यासाठी पोलीस शिपाई नियुक्त केलेला असतो; परंतु शिपायाऐवजी फौजदार दर्जाचे अधिकारी नेमण्याचे आदेश गृहविभागाकडून ३१ डिसेंबरच्या रात्री अचानक देण्यात आले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी ती जबाबदारी पार पाडली. आम्ही कौशल्याने परिस्थिती हाताळली ३१ तारखेला असे काही घडणार, याची कुणकुण आम्हाला लागली होती. मात्र आम्ही कौशल्याने परिस्थिती हाताळली आणि असे काहीच घडले नाही.- डॉ. रणजीत पाटील, गृहराज्य मंत्री