शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

जीटीपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘नो’ बदल्या!

By admin | Updated: February 16, 2017 05:10 IST

पोलीस अधिकाऱ्यांच्या आंतरघटक सार्वत्रिक बदल्या (जीटी) होण्यापूर्वी विविध पोलीस घटकप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या

जमीर काझी / मुंबईपोलीस अधिकाऱ्यांच्या आंतरघटक सार्वत्रिक बदल्या (जीटी) होण्यापूर्वी विविध पोलीस घटकप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी आयुक्त, अधीक्षकांना बजावलेले आहेत. येत्या मे महिन्यांत पोलीस मुख्यालयातून बदल्यांचे आदेश जारी झाल्यानंतर, जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्याची सूचना केली आहे.महासंचालक कार्यालयातील बदलीच्या आदेशाविरुद्ध तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर, ‘मॅट’मध्ये धाव घेऊन रद्द करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढत आहेत. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच घटकातील सेवा कालावधीच्या नियमाच्या आधारावर, एकाच आयुक्तालय/परिक्षेत्र व जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षे चिकटून राहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची ‘पळवाट’आणि त्यांना ‘मॅट’मधून दिलासा मिळवून देणाऱ्या वकिलांची अडचण होणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली अधिनियम २०१५च्या कायद्यांतर्गत कलम २२ (न) मधील पोटनियमांतर्गत उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक व निरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्याचा सामान्य पदावधी हा एका पोलीस ठाणे/ शाखेत दोन वर्षे, तर जिल्ह्यामध्ये चार वर्षांसाठी आणि परिक्षेत्रात आठ वर्षे निश्चित करण्यात आला आहे. तर मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत आठ, तर अन्य पोलीस आयुक्तालयांसाठी ६, तर एसीबी, एटीएस, सीआयडी गुप्तवार्ता, प्रशिक्षण आणि अन्य विशेष शाखा/ घटकांसाठी ३ वर्षे इतका आहे. त्यानुसार, सर्वसाधारणपणे दरवर्षाच्या ३१ मे पर्यंत संबंधित घटकांत होणाऱ्या सेवेचा कालावधी गृहित धरून, पोलीस मुख्यालयातून त्यांच्या मे/जून महिन्यांत बदल्या केल्या जातात. मात्र, काही अधिकारी संबंधित जिल्हा, आयुक्तालय किंवा विशेष शाखेतील सेवेचा कालावधी संपल्यानंतरही तेथून अन्य ठिकाणी जाण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे महासंचालकांकडून सार्वत्रिक बदल्या जारी होण्यापूर्वी, सध्या कार्यरत पोलीस ठाणे/शाखेतून त्याच जिल्हा/घटकांमधील अन्य पोलीस ठाणे किंवा शाखेत बदली करून घेतात. जेणेकरून, महासंचालकांकडून संबंधित जिल्हा व परिक्षेत्रातील कालावधी संपल्याने, त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी बदली झाल्यास त्याविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (मॅट) मध्ये धाव घेतात. सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी दोन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झालेला नसल्याने, बदली आदेशाच्या नियमाचा भंग करण्यात आला आहे, असा आक्षेप घेत, बदली रद्द करून घेतली जात असे. याबाबत ‘मॅट’कडून मिळणाऱ्या फटकाऱ्यामुळे खात्याची प्रतिमा मलीन होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.