शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

पोलिसांना माझ्या सुरक्षेची काळजी नाही : केसरकर

By admin | Updated: April 30, 2015 13:20 IST

पोलिसांबाबत नाराजी : पालकमंत्र्यांकडून खडे बोल

सावंतवाडी : सिंधुदुर्ग सोडला, तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी मला सुरक्षेबाबतचा कधी प्रश्न उद्भवत नाही. कर्नाटकात मी येणार म्हटल्यावर तेथील अधिकारी फोन करत असतात. मग सिंधुुदुर्गातच मला योग्य सुरक्षा का पुरवली जात नाही, येथील पोलीस माझ्या सुरक्षेबाबत गंभीर नाहीत. याबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणार आहे, असे सांगत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग पोलिसांबाबतची आपली नाराजी पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्याकडे व्यक्त केली. तुम्ही माझ्या सुरक्षेबाबत गंभीर नाही, मग सामान्यांची सुरक्षा कशी करणार, असे यावेळी त्यांनी बोलून दाखवले.पालकमंत्री केसरकर आढावा बैठकीनिमित्त सावंतवाडीत आले होते. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, पोलीस खात्यातील कोणताही वरिष्ठ अधिकारी बैठकीला फिरकलाच नाही. पोलीस निरीक्षक रणजित देसाई या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्याकडे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपली नाराजी बोलून दाखविली. मी सिंधुदुर्ग सोडून कोठेही गेलो, तर माझ्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जाते. मग सिंधुदुर्गमध्येच पोलीस का एवढे बेफिकीर आहेत? ते माझी सुरक्षा करू शकत नाहीत, तर सर्वसामान्य जनतेची सुरक्षा कशी काय करणार, असा सवाल यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षकांना केला.माझ्या बरोबर नेहमी दोन सुरक्षारक्षक राज्यात कुठेही गेलो तरी असतात; पण सिंधुदुर्गात एकही सुरक्षा रक्षक नसतो. रेल्वेने प्रवास मी एकटा करतो. त्यावेळी कोणीही बरोबर नसतो. कर्नाटकात मी गेल्यास तेथे कर्नाटक राज्याचे पोलीस व्हॅन घेऊन उभे असतात. अनेकवेळा मला वेळ झाला, तर सतत संपर्क करीत असतात; पण येथील पोलिसांना माझ्या सुरक्षेची काळर्जी नाही का? तसे असेल, तर मला तुमच्या वरिष्ठांशी बोलावे लागेल, असे सांगितले.मी तीस मंत्र्यांमधील एक मंत्री असून मलाही प्रोटोकॉल आहे. येथील पोलीस जर प्रोटोकॉलच विसरत असतील, तर त्यापेक्षा वाईट ते काय, असा सवालही पालकमंत्र्यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)यापूर्वीही गृहराज्यमंत्र्यांकडे तक्रारपालकमंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे गोव्यात सुरक्षा मिळत नसल्याबाबत तक्रार केली होती. यावेळी शिंदे यांनी आपणासही गोव्याने सुरक्षा दिली नाही, असे सांगत आपण काही करू शकत नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगितले होते. त्यानंतर पुन्हा एकदा बुधवारी पालकमंत्री केसरकर यांनी ही तक्रार केली आहे.