शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

नवीन वर्षात उघड्यावर शौचास गेल्यास पोलीस कारवाई

By admin | Updated: December 25, 2016 02:47 IST

केंद्र शासनाची राज्य सरकारला कडक कारवाई करण्याची सूचना!

सदानंद सिरसाटअकोला, दि. २४- मार्च २0१८ अखेरपर्यंत राज्य हगणदरीमुक्त करावयाचे आहे. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य घेणे आवश्यक आहे. त्यासाठी १ जानेवारी २0१७ पासून उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर पोलीस विभागाने कारवाई करण्याचे निर्देश केंद्र शासनाने राज्याला दिले आहेत. त्यामुळे आता नवीन वर्षात उघड्यावर शौचास बसणार्‍यांनी थेट पोलीस कारवाईलाच सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हय़ात कुटुंब सर्वेक्षण अभियान २0१२ मध्ये राबविण्यात आले. त्यानुसार जिल्हय़ातील हजारो कुटुंब अद्यापही उघड्यावर शौचास जातात. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे, शौचालयाच्या बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. तरीही वैयक्तिक शौचालय वापरण्याबाबत ग्रामस्थांमध्ये उदासीनता असल्याचे शासनाच्या वारंवार निदर्शनास आले आहे. आता पोलीस कारवाई करूनच ग्रामस्थांना शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न शासनाकडून होणार आहे. मार्च २0१८ अखेर राज्य हगणदरीमुक्तमहाराष्ट्र राज्य येत्या मार्च २0१८ अखेरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात असलेल्या शासनाच्या सर्व यंत्रणांचे सहकार्य घेण्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता हा उपक्रम जोरात सुरू होण्याची शक्यता आहे.प्रधानमंत्री मोदींचे पोलीस कारवाईचे निर्देश राज्यातील एका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तेथील पोलीस अधीक्षकांना उघड्यावर शौचास जाणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पत्र पाठविले आहे. त्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री यांनी १ जानेवारी २0१७ पासून उघड्यावर शौच करणार्‍यांवर पोलीस कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा संदर्भ आहे. मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाईशौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौच करणार्‍या ग्रामस्थांवर मुंबई पोलीस अधिनियमातील कलम ११५, ११७ नुसार कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत; मात्र पोलीस विभागाकडून ही कारवाई केलीच जात नाही. त्याच वेळी जिल्हा परिषदेच्या पथकासोबत हमरी तुमरीच्या घटनाही वाढलेल्या आहेत. पोलीस लक्ष देत नाहीत, जिल्हा परिषदेच्या पथकाला ग्रामस्थ जुमानत नाहीत, ही परिस्थिती आहे.अनुदान न घेणार्‍यांचे करायचे काय..?दरम्यान, ज्या ग्रामस्थांनी शौचालयासाठी शासकीय अनुदान घेतले नाही किंवा स्वखर्चाने ते बांधले, त्यांनी विरोध केल्यास पोलीस कारवाई कशी करावी, असा प्रश्न पोलिसांचा आहे. त्यामुळे अधिनियमातील कारवाईपेक्षा गुड मॉर्निंग पथकासोबत पोलीस देण्याचा पर्याय हा विभाग स्वीकारण्याची शक्यता आहे.