शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

विषबाधेने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By admin | Updated: August 31, 2015 01:51 IST

घरातील जेवणातून एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा होऊन पती-पत्नी आणि मुलाचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना कुर्ला येथे घडली. पहिल्यांदा या आत्महत्या

मुंबई : घरातील जेवणातून एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा होऊन पती-पत्नी आणि मुलाचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना कुर्ला येथे घडली. पहिल्यांदा या आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांचा मृत्यू विषबाधेतून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.कुर्ल्याच्या ख्रिश्चन गाव येथे जोेसेफ मकासरे (५२) हे त्यांची पत्नी स्मिता मकासरे (४८) आणि मायकल मकासरे (२२) यांच्यासोबत राहत होते. महापालिकेत जोसेफ हे कंत्राटदार होते. गुरुवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर तिघांना उलटी आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला घरी बोलावले. डॉक्टराने काही औषधे दिल्यानंतर त्यांना काही वेळ बरे वाटू लागले. मात्र शुक्रवारी सकाळी पुन्हा सर्वांना चक्कर येत असल्यासारखे वाटू लागल्याने शेजाऱ्यांनी त्यांना विद्याविहार येथील कोहिनूर रुग्णालयात दाखल केले. मात्र दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास यातील मायकल आणि त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास जोसेफ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.विनोबा भावे नगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन चौकशी केली. या कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. तसेच या कुटुंबीयांनी हॉटेलमधील जेवण खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली, अशी माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनी गंभीर अवस्थेत असलेल्या स्मिता मकासरे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुरुवारी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. तसेच अन्नातून विषबाधा झाल्यानेच त्यांची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी केवळ घटनेची नोंद करीत तपास सुरू केला आहे. मात्र शनिवारी मध्यरात्री स्मिता मकासरे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोकाकुल वातावरण आहे. रविवारी तिघांवर सायन येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी या तिघांचे मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी धाडले होते. या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात तिघांचाही मृत्यू विषबाधेने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्नाचे नमुने कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.