शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाने सर्वसामान्यांना दिला सामाजिक, वाड़मयीन क्षेत्राचा आनंद

By admin | Updated: February 5, 2017 21:25 IST

डोंबिवलीत झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने सर्वसामान्यांना सामाजिक आणि वाड़मयीन क्षेत्राचा आनंद मिळवून दिला

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
पु. भा. भावे साहित्यनगरी डोंबिवली, दि. ५ - डोंबिवलीत झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने सर्वसामान्यांना सामाजिक आणि वाड़मयीन क्षेत्राचा आनंद मिळवून दिला, असे संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आपल्या समारोपाच्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले. 
परिसंवाद, कविसंमेलने, मुलाखती, कथाकथन यांच्या माध्यमातून डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलामधील पु. भा. भावे साहित्यनगरीत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साहित्याच्या जागराचा आज संध्याकाळी दिमाखात समारोप झाला. यावेळी राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, अतिरिक्त आयुक्त घरत, महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे, संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी झालेल्या समारोपाच्या भाषणात काळे म्हणाले, संमेलनाच्या निमित्ताने विविध विषयांवर भाष्य झाले. समीक्षा, चर्चा, परिसंवाद रंगले, सभागृहाबाहेर ची चर्चा मुक्त चर्चा घडल्या. एकंदरीत या संमेलनाने सर्वसामान्यांना सामाजिक आणि वाड़मयीन क्षेत्राचा आनंद मिळवून दिला".
समारोपाच्या भाषणात काळे यांनी सबनीस यांनी सोपवलेल्या सत्याचाही ऊल्लेख केला, "माझ्याकडे अध्यक्षीय सूत्रे सोपवताना सबनीस म्हणाले होते की सुत्र नाही सत्य सोपवत आहे, त्याचा अंतर्मुख होउन विचार करतोय. पण सत्यासाठी गांधींसारख्या गोळ्या झेलायला लागतात. पानसरे, दाभोलकर यांना त्या झेलव्या लागल्या. त्यामुळे मी सत्य नाही स्वीकारत, पन त्याकडे अंतर्मुख होऊ न बघतो. असे अक्षयकुमार काळे म्हणाले. मी बुद्ध नाही चार्वाक नाही पण मी अभ्यासक आहे, असेही त्यांनी सांगितले.
काळे पुढे म्हणाले, "यश उगाच कुणालाही मिळत नाही, गीतेत त्याबाबत सविस्तर सांगितलं आहे. गीता काय सांगते याचा विचार करा,  मग संमेलनातील सगळ्या बाजू समजतील."
"कुठल्याही गोष्टीसाठी लोकचेतना महत्त्वाची असते. ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळी ती दिसली. संमेलनाची उद्दिष्ट महत्त्वाची असतात, ती सगळीच साध्य होतील असे नाही, पण हे संमेलन त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दिशेने गेले." असेही काळे यांनी पुढे सांगितले. तसेच संमेलनाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले.
 
स्थानिक प्रतिभेचा अनुषेश भरून निघाला - जोशी
यंदाचे मराठी साहित्य संमेलन सर्व बाबतीत वेगळे ठरले आहे. संमेलनातील स्थानिक प्रतिभेचा अनुशेष येथे भरून निघाला, असे  साहित्य परिषदेचे अध्यक्ष जोशी यांनी सांगितले. 
ते म्हणाले, हे गर्दीचे नव्हे तर दर्दींचे संमेलन ठरले, परिसंवादांना उपस्थितांनी दाद दिली. त्या अनुशंगाने हे संमेलन नवा पायंडा पाडणारे ठरले.  अशा संमेलनाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सहकार्य करा, असे  आवाहनही त्यांनी यावेळी मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांना केले.
२७ गावांच्या ठरावाला केडीएमसीच्या महापौरांचा विरोध
पु. भा. भावे साहित्यनगरी डोंबिवली, दि. ५ - साहित्य संमेलनात करण्यात येणा-या ठरावांचे वाचन सुरू असताना कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या ठरावास विरोध केला. यावेळी देवळेकरांनी विरोध दर्शवल्यावर राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी या प्रस्तावास समर्थन दिले. अखेर परिषदेचे अध्यक्ष जोशी यांनी समर्थन आणि विरोध दोन्ही बाबी ठरावाला जोडून सरकारकडे पाठवला जाईल. असे सांगून हा विषय मिटवला.
बोलीभाषांना दिलेला मान हे या संमेलनाचे वेगळेपण 
९०व्या साहित्य संमेलनाच्या यजमानपदाच्या निमित्ताने पु.भा. भावे आणि शं. ना. नवरे यांच्या नगरीला मान मिळाला आहे. राज्यातील बोलीभाषांना संमेलनाने दिलेले स्थान हे या संमेलनाचे वेगळेपण, ठरले असे उद्गार ९०व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांनी काढले.
 वझे यांनी यावेळी संमेलनाच्या आयोजनात आलेल्या अडचणींचा उल्लेख करत मदत करणा-यांचे आभार मानले. ते म्हणाले, या संमेलनाचे आयोजन करताना आर्थिक टंचाई जाणवली, आचारसंहितेचा अडथळा आला. अनेक अडचणी आल्या.  पण त्या सगळ्यांचा सामना करत आम्ही समारोपापर्यंत पोहोचलो. 
 मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे तसेच इतरांनी मदत केली.  ठाणे, कल्याण डोंबिवली बदलापूर येथील साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी मदत केली. त्या सर्वांचे मी आभार मानतो, असे वझे म्हणाले