शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकमुक्त वारी करणार

By admin | Updated: June 3, 2017 01:43 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वरमहाराज आणि श्री संत तुकाराममहाराजांची आषाढी वारी आरोग्यदायी, स्वच्छ आणि प्लॅस्टिकमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्हा परिषदेच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वरमहाराज आणि श्री संत तुकाराममहाराजांची आषाढी वारी आरोग्यदायी, स्वच्छ आणि प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, फिरते स्वच्छतागृह, वारीचा मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी औषध फवारणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली. श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे १७ जून आणि १६ जूनपासून आळंदी आणि देहू येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. या वारीमध्ये विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहामध्ये गटविकास अधिकारी, सरपंच आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. समजाकल्याण विभागाचे सभापती सुजाता चौरै, महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे, आरोग्याधिकारी डॉ. भगवान पवार, आरोग्याधिकारी डॉ. संजय जठार उपस्थित होते. पालखी ज्या ठिकाणी विसावा घेते किंवा मुक्कामी असते त्या ग्रामपंचायतींना यात्रा निधी उपलब्ध करून द्यावा. पालखीमध्ये सॅनिटरी नॅपकिन आणि टॉयलेट सोपची व्यवस्था करावी. दिवे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आहे. पालखी मार्गस्थ होण्यापूर्वी कचरा काढून टाकावा. पालखी विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा आणि विजेचे दिवे लावण्यात यावे. घाटामध्ये दरडी कोसळू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. पालखी सोहळ्यासाठी पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी. पाणी शुद्ध करण्याचे ओषध विहिरीमध्ये टाकण्याऐवजी टॅँकरमध्ये टाकावे. पालखी काळामध्ये अपघात होणाऱ्या रुग्णांना त्वरित उपचार मिळावे यासाठी ससून आणि इतर खासगी रुग्णालयाशी समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सासवड रस्त्यावरील अतिक्रमण काढावे. पालखी मार्गावरील खड्डे दुरुस्त करावे, अशा सूचना गटविकास अधिकारी आणि नागरिकांनी केल्या होत्या. १५ जूनपूर्वी ग्रामपंचायतींना यात्रा अनुदान दिले जाईल. वारीमध्ये आठशे फिरती शौचालये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पालखी विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामपंचायतीने वाळू पसरावी, ज्यामुळे पावसाळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही. औषध फवारणीही केली जाईल. टॉयलेट सोपचीही व्यवस्था केली जाणार आहे. हिवताप औषध फवारणीसाठी जिल्हा परिषद निधी देणार आहे, असे दौलत देसाई यांनी सांगितले.वारीच्या काळात फोन न घेणाऱ्यांवर कारवाई करणारवारीच्या काळामध्ये ग्रामसेवक किंवा संबंधित विभागाचे अधिकारी फोन घेत नाहीत. महावितरण विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरते वीज कनेक्शनसाठी आगाऊ पैसै घेतात, अशी तक्रार ग्रामसेवकांनी वारीच्या नियोजन बैठकीमध्ये केली होती. यावर देसाई यांनी वारीच्या काळात फोन न घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तात्पुरता वीज मीटर घेण्यासाठी आगाऊ पैसै घेऊ नये, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. मात्र, ग्रामपंचायतीने कोणत्याही परिस्थितीमध्ये अनधिकृतपणे वीजपुरवठा घेऊ नये.- दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद