शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

प्लॅस्टिकमुक्त वारी करणार

By admin | Updated: June 3, 2017 01:43 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वरमहाराज आणि श्री संत तुकाराममहाराजांची आषाढी वारी आरोग्यदायी, स्वच्छ आणि प्लॅस्टिकमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्हा परिषदेच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वरमहाराज आणि श्री संत तुकाराममहाराजांची आषाढी वारी आरोग्यदायी, स्वच्छ आणि प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, फिरते स्वच्छतागृह, वारीचा मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी औषध फवारणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली. श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे १७ जून आणि १६ जूनपासून आळंदी आणि देहू येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. या वारीमध्ये विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहामध्ये गटविकास अधिकारी, सरपंच आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. समजाकल्याण विभागाचे सभापती सुजाता चौरै, महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे, आरोग्याधिकारी डॉ. भगवान पवार, आरोग्याधिकारी डॉ. संजय जठार उपस्थित होते. पालखी ज्या ठिकाणी विसावा घेते किंवा मुक्कामी असते त्या ग्रामपंचायतींना यात्रा निधी उपलब्ध करून द्यावा. पालखीमध्ये सॅनिटरी नॅपकिन आणि टॉयलेट सोपची व्यवस्था करावी. दिवे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आहे. पालखी मार्गस्थ होण्यापूर्वी कचरा काढून टाकावा. पालखी विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा आणि विजेचे दिवे लावण्यात यावे. घाटामध्ये दरडी कोसळू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. पालखी सोहळ्यासाठी पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी. पाणी शुद्ध करण्याचे ओषध विहिरीमध्ये टाकण्याऐवजी टॅँकरमध्ये टाकावे. पालखी काळामध्ये अपघात होणाऱ्या रुग्णांना त्वरित उपचार मिळावे यासाठी ससून आणि इतर खासगी रुग्णालयाशी समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सासवड रस्त्यावरील अतिक्रमण काढावे. पालखी मार्गावरील खड्डे दुरुस्त करावे, अशा सूचना गटविकास अधिकारी आणि नागरिकांनी केल्या होत्या. १५ जूनपूर्वी ग्रामपंचायतींना यात्रा अनुदान दिले जाईल. वारीमध्ये आठशे फिरती शौचालये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पालखी विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामपंचायतीने वाळू पसरावी, ज्यामुळे पावसाळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही. औषध फवारणीही केली जाईल. टॉयलेट सोपचीही व्यवस्था केली जाणार आहे. हिवताप औषध फवारणीसाठी जिल्हा परिषद निधी देणार आहे, असे दौलत देसाई यांनी सांगितले.वारीच्या काळात फोन न घेणाऱ्यांवर कारवाई करणारवारीच्या काळामध्ये ग्रामसेवक किंवा संबंधित विभागाचे अधिकारी फोन घेत नाहीत. महावितरण विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरते वीज कनेक्शनसाठी आगाऊ पैसै घेतात, अशी तक्रार ग्रामसेवकांनी वारीच्या नियोजन बैठकीमध्ये केली होती. यावर देसाई यांनी वारीच्या काळात फोन न घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तात्पुरता वीज मीटर घेण्यासाठी आगाऊ पैसै घेऊ नये, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. मात्र, ग्रामपंचायतीने कोणत्याही परिस्थितीमध्ये अनधिकृतपणे वीजपुरवठा घेऊ नये.- दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद