शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

समुद्री चाच्यांनी पळवलेला कौस्तुभ सुखरूप परतणार!

By admin | Updated: November 20, 2014 13:22 IST

समुद्री चाच्यांनी पळवून नेलेला मुक्ताईनगरचा तरुण कौस्तुभ परदेशी सुखरूप असल्याचे वृत्त आले आणि साडेतीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरणे कठीण झाले.

अतुल कुलकर्णी, मुंबईसमुद्री चाच्यांनी पळवून नेलेला मुक्ताईनगरचा तरुण कौस्तुभ परदेशी सुखरूप असल्याचे वृत्त आले आणि साडेतीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरणे कठीण झाले.मनाला आनंद देणारी ही घटना घडली ती परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्या खा. रक्षा खडसे, महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी वेळीच घेतलेल्या पुढाकारामुळे. आपला तरुण मुलगा कौस्तुभ गेल्या साडेतीन महिन्यांपासून संपर्कातच नाही, त्याचा फोनही लागत नाही. त्याच्या आॅफिसला विचारले तर ते सांगतात, त्याचे अपहरण झाले आहे. आमचा म्हातारणीचा आधार गेला, अशा शब्दांत कौस्तुभच्या आईवडिलांनी मुक्ताईनगरात मंत्री खडसे आणि खा. रक्षा खडसे यांना आपले गाऱ्हाणे सांगितले. सतत रडणाऱ्या त्या आईवडिलांना पाहून ते दोघेही हेलावले. खा. रक्षा खडसे या स्थायी समिती सदस्या आहेत. सगळा तपशील घेऊन त्यांनी सुषमा स्वराज यांना गाठले. कौस्तुभ हा ‘कॉटरो अमीबोज’ नावाच्या जहाजावर नोकरीला होता व हे जहाज दक्षिण आफ्रिकेत होते. अधिक माहिती घेतली असता समजले की, त्या जहाजावर समुद्री चाच्यांनी हल्ला केला होता व त्यात कौस्तुभला त्यांनी पळवून अंगोला देशात नेले होते. सूत्रे हलली. यात महत्त्वाची भूमिका निभावली ती परराष्ट्र खात्याचे सहसचिव संजीव कोहली यांनी. त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेची जबाबदारी होती. त्यांनी तिथल्या भारतीय दूतावासात बोलणी सुरू केली. अंगोला सरकारने चौकशी सुरू केली आणि कौस्तुभ सुखरूपपणे त्यांना सापडला. हे वृत्त स्वत: कोहली यांनी रक्षा खडसे यांना एसएमएस करून कळवले. आता पुढची सूत्र हलवण्यात आली असून, कौस्तुभ दोन -चार दिवसांतच त्याच्या मुक्ताईनगरच्या घरी परत येईल, असे खडसे यांनीच ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुषमा स्वराज आणि कोहली यांच्यामुळेच हे शक्य झाले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.