शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
5
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
6
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
7
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
8
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
9
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
10
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
11
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
12
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
13
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
14
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
15
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
16
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
17
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
18
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
19
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
20
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...

समुद्री चाच्यांनी पळवलेला कौस्तुभ सुखरूप परतणार!

By admin | Updated: November 20, 2014 13:22 IST

समुद्री चाच्यांनी पळवून नेलेला मुक्ताईनगरचा तरुण कौस्तुभ परदेशी सुखरूप असल्याचे वृत्त आले आणि साडेतीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरणे कठीण झाले.

अतुल कुलकर्णी, मुंबईसमुद्री चाच्यांनी पळवून नेलेला मुक्ताईनगरचा तरुण कौस्तुभ परदेशी सुखरूप असल्याचे वृत्त आले आणि साडेतीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरणे कठीण झाले.मनाला आनंद देणारी ही घटना घडली ती परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्या खा. रक्षा खडसे, महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी वेळीच घेतलेल्या पुढाकारामुळे. आपला तरुण मुलगा कौस्तुभ गेल्या साडेतीन महिन्यांपासून संपर्कातच नाही, त्याचा फोनही लागत नाही. त्याच्या आॅफिसला विचारले तर ते सांगतात, त्याचे अपहरण झाले आहे. आमचा म्हातारणीचा आधार गेला, अशा शब्दांत कौस्तुभच्या आईवडिलांनी मुक्ताईनगरात मंत्री खडसे आणि खा. रक्षा खडसे यांना आपले गाऱ्हाणे सांगितले. सतत रडणाऱ्या त्या आईवडिलांना पाहून ते दोघेही हेलावले. खा. रक्षा खडसे या स्थायी समिती सदस्या आहेत. सगळा तपशील घेऊन त्यांनी सुषमा स्वराज यांना गाठले. कौस्तुभ हा ‘कॉटरो अमीबोज’ नावाच्या जहाजावर नोकरीला होता व हे जहाज दक्षिण आफ्रिकेत होते. अधिक माहिती घेतली असता समजले की, त्या जहाजावर समुद्री चाच्यांनी हल्ला केला होता व त्यात कौस्तुभला त्यांनी पळवून अंगोला देशात नेले होते. सूत्रे हलली. यात महत्त्वाची भूमिका निभावली ती परराष्ट्र खात्याचे सहसचिव संजीव कोहली यांनी. त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेची जबाबदारी होती. त्यांनी तिथल्या भारतीय दूतावासात बोलणी सुरू केली. अंगोला सरकारने चौकशी सुरू केली आणि कौस्तुभ सुखरूपपणे त्यांना सापडला. हे वृत्त स्वत: कोहली यांनी रक्षा खडसे यांना एसएमएस करून कळवले. आता पुढची सूत्र हलवण्यात आली असून, कौस्तुभ दोन -चार दिवसांतच त्याच्या मुक्ताईनगरच्या घरी परत येईल, असे खडसे यांनीच ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुषमा स्वराज आणि कोहली यांच्यामुळेच हे शक्य झाले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.