शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

समुद्री चाच्यांनी पळवलेला कौस्तुभ सुखरूप परतणार!

By admin | Updated: November 20, 2014 13:22 IST

समुद्री चाच्यांनी पळवून नेलेला मुक्ताईनगरचा तरुण कौस्तुभ परदेशी सुखरूप असल्याचे वृत्त आले आणि साडेतीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरणे कठीण झाले.

अतुल कुलकर्णी, मुंबईसमुद्री चाच्यांनी पळवून नेलेला मुक्ताईनगरचा तरुण कौस्तुभ परदेशी सुखरूप असल्याचे वृत्त आले आणि साडेतीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरणे कठीण झाले.मनाला आनंद देणारी ही घटना घडली ती परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्या खा. रक्षा खडसे, महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी वेळीच घेतलेल्या पुढाकारामुळे. आपला तरुण मुलगा कौस्तुभ गेल्या साडेतीन महिन्यांपासून संपर्कातच नाही, त्याचा फोनही लागत नाही. त्याच्या आॅफिसला विचारले तर ते सांगतात, त्याचे अपहरण झाले आहे. आमचा म्हातारणीचा आधार गेला, अशा शब्दांत कौस्तुभच्या आईवडिलांनी मुक्ताईनगरात मंत्री खडसे आणि खा. रक्षा खडसे यांना आपले गाऱ्हाणे सांगितले. सतत रडणाऱ्या त्या आईवडिलांना पाहून ते दोघेही हेलावले. खा. रक्षा खडसे या स्थायी समिती सदस्या आहेत. सगळा तपशील घेऊन त्यांनी सुषमा स्वराज यांना गाठले. कौस्तुभ हा ‘कॉटरो अमीबोज’ नावाच्या जहाजावर नोकरीला होता व हे जहाज दक्षिण आफ्रिकेत होते. अधिक माहिती घेतली असता समजले की, त्या जहाजावर समुद्री चाच्यांनी हल्ला केला होता व त्यात कौस्तुभला त्यांनी पळवून अंगोला देशात नेले होते. सूत्रे हलली. यात महत्त्वाची भूमिका निभावली ती परराष्ट्र खात्याचे सहसचिव संजीव कोहली यांनी. त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेची जबाबदारी होती. त्यांनी तिथल्या भारतीय दूतावासात बोलणी सुरू केली. अंगोला सरकारने चौकशी सुरू केली आणि कौस्तुभ सुखरूपपणे त्यांना सापडला. हे वृत्त स्वत: कोहली यांनी रक्षा खडसे यांना एसएमएस करून कळवले. आता पुढची सूत्र हलवण्यात आली असून, कौस्तुभ दोन -चार दिवसांतच त्याच्या मुक्ताईनगरच्या घरी परत येईल, असे खडसे यांनीच ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुषमा स्वराज आणि कोहली यांच्यामुळेच हे शक्य झाले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.