शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

पुणे मेट्रोला पीआयबीची मंजुरी

By admin | Updated: October 14, 2016 13:33 IST

गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पुणे मेट्रोला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळाली आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडला जाणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पुणे मेट्रोला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळाली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. आता केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळेल असा विश्वास पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा भूमिगत पहिला टप्पा असणार आहे. पहिला टप्पा चार वर्षात पुर्ण करण्याचा दावा करण्यात आला आहे.
 
स्वारगेट-पिपंरी चिंचवड हा मेट्रोचा पहिला टप्पा असेल तर वनाज-रामवाडी मेट्रोचं काम दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होईल. स्वारगेट-पिंपरी चिंचवड मेट्रोचा मार्ग 16. 59 किमी लांबीचा असेल तर वनाज-रामवाडी मेट्रोचा मार्ग 14.29 किमी लांबीचा असणार आहे.
 
राज्य व केंद्र सरकारच्या तांत्रिक विभागाची मान्यता मिळाल्यानंतर पुणे मेट्रोचा प्रस्ताव पीआयबी समोर मांडण्यात आला. मंजुरीआधीच पुणे मेट्रो साठी साडेसहा हजार कोटी रूपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. पुण्याबरोबरच या मेट्रो मध्ये पिंपरी चिंचवड शहराचाही काही भाग येत असल्यामुळे तिथेही या प्रकल्पाबाबत बरीच उत्सुकता आहे. दोन्ही शहरे मिळून मेट्रो साठी पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन करणार असून त्याची प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मेट्रोचे सर्व कामकाज या कंपनीमार्फत चालणार असून कर्ज वगैरे आर्थिक बाबीही कंपनीच्याच नावे केल्या जाणार आहेत.
 
(पुणे मेट्रोच्या मार्गात ऐतिहासिक वास्तू)
(पुणे मेट्रोला वादाचे ग्रहण)
 
पुण्याच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोला २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने तत्त्वत: मान्यता दिली होती. केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला. पुण्यानंतर नागपूर मेट्रोचा प्रस्ताव सादर होऊन त्याचे काम सुरू झाल्याने पुणेकरांमध्ये नाराजी होती. शहराचे खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पुणे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना सातत्याने पुण्याची मेट्रो केव्हा होणार, हा प्रश्न विचारला जात होता.
 
पीआयबीची मंजूरी मिळाली तरीही केंद्रीय मंत्रीमंडळाचे शिक्कामोर्तब या प्रकल्पावर होणे गरजेचे आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने मेट्रो च्या कामाला सुरूवात होईल. मेट्रोची चर्चा सुरू झाली त्यावेळेपासून तिच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत. रस्त्यावरून की भुयारी या वादात ती रखडली. त्यानंतर राज्य व केंद्र सरकारच्या स्तरावर विलंब झाला. दिल्लीतही हा प्रस्ताव बराच रखडला होता. आता पीआयबीच्या बैठकीत मंजूरी मिळाली असल्याने तिच्यासमोरचे अडथळे दूर होतील.