शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

मुळा नदीकाठावर बारमाही पीक!

By admin | Updated: August 15, 2015 00:57 IST

नद्यांमधील वाळूच्या बेसुमार उपशामुळे पाणी वेगाने वाहून जाते, परिणामी जमिनीत पाणी न जिरल्याने परिसरातील विहिरी पावसाळ्यानंतर कोरड्याठाक पडतात. मुळा नदी काठावरील

-  भाऊसाहेब येवले,  राहुरीनद्यांमधील वाळूच्या बेसुमार उपशामुळे पाणी वेगाने वाहून जाते, परिणामी जमिनीत पाणी न जिरल्याने परिसरातील विहिरी पावसाळ्यानंतर कोरड्याठाक पडतात. मुळा नदी काठावरील सात गावांनी मात्र वाळूउपशाविरोधात यशस्वी मोहीम राबविल्याने १० कि.मी. परिसरातील विहिरी १२ महिने पाण्याने भरलेल्या असतात. त्यामुळे येथे शेती बहरली आहे.मुळा नदीकाठावरील वांजुळपोई, मांजरी, निंभारी, अंमळनेर, पानेगाव, करजगाव या सात गावांनी ग्रामसभेत ठराव करून वाळू उचलेगिरीला ब्रेक लावला. गामस्थांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला़ एवढ्यावरच न थांबता ग्रामस्थांनी वाळूउपसा करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना पिटाळून लावले होते़वाळू जपण्याचा लढा तसा अवघड होता़ वाळूउपशामुळे पाण्याअभावी परिसराचे वाळवंट होऊन शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला़ न्यायालयाला शेतकऱ्यांचे म्हणणे पटले आणि वाळू उचलण्यास मज्जाव करण्यात आला.सात गावांतील ग्रामस्थांनी वाळू संदर्भात नियमच घालून दिला आहे़ स्थानिकांना घर बांधण्यासाठी वाळू हवी तर, आवश्यक तेवढाच उपसा करायचा. ग्रामस्थांच्या एकीमुळे नदीपात्रात वाळू पाहायला मिळते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग मंदावल्याने जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. परिणामी, दुष्काळातही विहिरींच्या पाण्याची पातळी समाधानकारक आहे.मुळा धरणाच्या पायथ्याला बेसुमार वाळूउपसा झाल्याने बारागाव नांदुर, राहुरी, देसवंडी आदी गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला़ २० फुटांपर्यंत वाळूउपसा झाल्यामुळे विहिरींचे अस्तित्व धोक्यात आले आहे़ याउलट मांजरीसह अन्य गावांत ऊस, चारा, कापूस, गहू व भाजीपाल्याचे जोमदार पीक आले आहे.