शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

मुळा नदीकाठावर बारमाही पीक!

By admin | Updated: August 15, 2015 00:57 IST

नद्यांमधील वाळूच्या बेसुमार उपशामुळे पाणी वेगाने वाहून जाते, परिणामी जमिनीत पाणी न जिरल्याने परिसरातील विहिरी पावसाळ्यानंतर कोरड्याठाक पडतात. मुळा नदी काठावरील

-  भाऊसाहेब येवले,  राहुरीनद्यांमधील वाळूच्या बेसुमार उपशामुळे पाणी वेगाने वाहून जाते, परिणामी जमिनीत पाणी न जिरल्याने परिसरातील विहिरी पावसाळ्यानंतर कोरड्याठाक पडतात. मुळा नदी काठावरील सात गावांनी मात्र वाळूउपशाविरोधात यशस्वी मोहीम राबविल्याने १० कि.मी. परिसरातील विहिरी १२ महिने पाण्याने भरलेल्या असतात. त्यामुळे येथे शेती बहरली आहे.मुळा नदीकाठावरील वांजुळपोई, मांजरी, निंभारी, अंमळनेर, पानेगाव, करजगाव या सात गावांनी ग्रामसभेत ठराव करून वाळू उचलेगिरीला ब्रेक लावला. गामस्थांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला़ एवढ्यावरच न थांबता ग्रामस्थांनी वाळूउपसा करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना पिटाळून लावले होते़वाळू जपण्याचा लढा तसा अवघड होता़ वाळूउपशामुळे पाण्याअभावी परिसराचे वाळवंट होऊन शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला़ न्यायालयाला शेतकऱ्यांचे म्हणणे पटले आणि वाळू उचलण्यास मज्जाव करण्यात आला.सात गावांतील ग्रामस्थांनी वाळू संदर्भात नियमच घालून दिला आहे़ स्थानिकांना घर बांधण्यासाठी वाळू हवी तर, आवश्यक तेवढाच उपसा करायचा. ग्रामस्थांच्या एकीमुळे नदीपात्रात वाळू पाहायला मिळते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग मंदावल्याने जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. परिणामी, दुष्काळातही विहिरींच्या पाण्याची पातळी समाधानकारक आहे.मुळा धरणाच्या पायथ्याला बेसुमार वाळूउपसा झाल्याने बारागाव नांदुर, राहुरी, देसवंडी आदी गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला़ २० फुटांपर्यंत वाळूउपसा झाल्यामुळे विहिरींचे अस्तित्व धोक्यात आले आहे़ याउलट मांजरीसह अन्य गावांत ऊस, चारा, कापूस, गहू व भाजीपाल्याचे जोमदार पीक आले आहे.