शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
6
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
9
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
10
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
13
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
14
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
15
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
16
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
17
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
18
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
19
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
20
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

मुळा नदीकाठावर बारमाही पीक!

By admin | Updated: August 15, 2015 00:57 IST

नद्यांमधील वाळूच्या बेसुमार उपशामुळे पाणी वेगाने वाहून जाते, परिणामी जमिनीत पाणी न जिरल्याने परिसरातील विहिरी पावसाळ्यानंतर कोरड्याठाक पडतात. मुळा नदी काठावरील

-  भाऊसाहेब येवले,  राहुरीनद्यांमधील वाळूच्या बेसुमार उपशामुळे पाणी वेगाने वाहून जाते, परिणामी जमिनीत पाणी न जिरल्याने परिसरातील विहिरी पावसाळ्यानंतर कोरड्याठाक पडतात. मुळा नदी काठावरील सात गावांनी मात्र वाळूउपशाविरोधात यशस्वी मोहीम राबविल्याने १० कि.मी. परिसरातील विहिरी १२ महिने पाण्याने भरलेल्या असतात. त्यामुळे येथे शेती बहरली आहे.मुळा नदीकाठावरील वांजुळपोई, मांजरी, निंभारी, अंमळनेर, पानेगाव, करजगाव या सात गावांनी ग्रामसभेत ठराव करून वाळू उचलेगिरीला ब्रेक लावला. गामस्थांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला़ एवढ्यावरच न थांबता ग्रामस्थांनी वाळूउपसा करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना पिटाळून लावले होते़वाळू जपण्याचा लढा तसा अवघड होता़ वाळूउपशामुळे पाण्याअभावी परिसराचे वाळवंट होऊन शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला़ न्यायालयाला शेतकऱ्यांचे म्हणणे पटले आणि वाळू उचलण्यास मज्जाव करण्यात आला.सात गावांतील ग्रामस्थांनी वाळू संदर्भात नियमच घालून दिला आहे़ स्थानिकांना घर बांधण्यासाठी वाळू हवी तर, आवश्यक तेवढाच उपसा करायचा. ग्रामस्थांच्या एकीमुळे नदीपात्रात वाळू पाहायला मिळते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग मंदावल्याने जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. परिणामी, दुष्काळातही विहिरींच्या पाण्याची पातळी समाधानकारक आहे.मुळा धरणाच्या पायथ्याला बेसुमार वाळूउपसा झाल्याने बारागाव नांदुर, राहुरी, देसवंडी आदी गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला़ २० फुटांपर्यंत वाळूउपसा झाल्यामुळे विहिरींचे अस्तित्व धोक्यात आले आहे़ याउलट मांजरीसह अन्य गावांत ऊस, चारा, कापूस, गहू व भाजीपाल्याचे जोमदार पीक आले आहे.