शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशच्या जनतेने स्मशानाच्या बाजूनं मतदान केले- उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 12, 2017 11:27 IST

उत्तर प्रदेशातील विजय हा नोटाबंदीच्या निर्णयाचा विजय नसून कर्जमाफीच्या गाजराचा विजय आहे, स्मशानाचा विजय आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - भाजपानं उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यामुळे अनेकांनी भाजपाचं कौतुक केलं आहे. मात्र महाराष्ट्रात मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं भाजपावर खरमरीत टीका केली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने कब्रस्तान विरुद्ध स्मशान या वादात स्मशानाच्या बाजूने मतदान केल्याची टिपण्णीही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील विजय हा नोटाबंदीच्या निर्णयाचा विजय नसून कर्जमाफीच्या गाजराचा विजय आहे, स्मशानाचा विजय आहे. उत्तर प्रदेशातील तुफानाचे पाणी बाजूच्या उत्तराखंड राज्यात पोहोचले व तेथेही भाजपला बहुमत मिळाले, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. गाव तेथे स्मशान हे धोरण राबवले तर काय होईल? ही भीती आम्हाला वाटते. स्मशानांपेक्षा कर्जमाफीची आणि रोजगार, कायदा-सुव्यवस्थेची तेथे गरज आहे. आम्ही नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत आहोत! ते जिंकलेच आहेत. पंतप्रधान मोदी हे उत्तर हिंदुस्थानात मतांचे ध्रुवीकरण करण्यात यशस्वी झाले. जाहीर सभांतून त्यांनी लोकांना प्रश्न केला, उत्तर प्रदेशात कब्रस्तान जास्त आहेत. तुम्हाला स्मशान हवे की कब्रस्तान हवे? पंतप्रधानांचा संदेश स्पष्ट होता. उत्तर प्रदेशात मुसलमानांची राजवट सुरू आहे. हिंदूंनी ती संपवायला हवी. हिंदू आणि मुसलमान अशी सरळसरळ फाळणी त्यांनी केली. मोदी यांना विजयासाठी हिंदुत्वाचे कार्ड खेळावेच लागले, पण राममंदिराऐवजी त्यांनी हिंदूंसाठी स्मशाने प्रचारात आणल्याचं म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. प्रचंड विजयानंतर तरी रामाचा वनवास संपून अयोध्येत राममंदिर उभे राहील काय, असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला विचारण्यात आला आहे.पंतप्रधान मोदींचा चमत्कार आणि करिश्मा कायम आहे. उत्तर प्रदेश हा देशाच्या राजकारणातील गड आहे. दिल्ली राजधानी असली तरी उत्तर प्रदेश हा गडच आहे. गड जिंकल्याचा जल्लोष देशभर सुरू आहे. उत्तर प्रदेशात 325 जागांचे तुफानी बहुमत मिळवून मोदी यांनी विरोधकांना चीत केले आहे. अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी व मायावतींच्या बसपाची साफ धुळधाण झाली आहे. यादवांना 60 जागाही मिळाल्या नाहीत आणि मायावतींना 20 जागांचा टप्पा गाठता आला नाही. उत्तर प्रदेशातील हे विजयी तुफान देशाच्या राजकारणावर परिणाम करणार आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.