शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

‘भारतमाता की जय’ बोलण्यासाठी माणसे जिवंत राहायला हवीत - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 7, 2016 11:34 IST

‘भारतमाता की जय’ बोलावेच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसे जिवंत राहायला हवीत. मराठवाड्यासह अनेक भागात पाण्यासाठी माणूसच माणसाचा शत्रू झालाय.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ७ - ‘भारतमाता की जय’ बोलावेच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसे जिवंत राहायला हवीत. मराठवाड्यासह अनेक भागात पाण्यासाठी माणूसच माणसाचा शत्रू झालाय. भारतमातेच्या स्वप्नातील हा महाराष्ट्र नाही. मुख्यमंत्री, खुर्चीवर बसा व महाराष्ट्राला पाणी द्या! या शब्दांमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 
 
भारत माता की जय बोलण्यास नकार देणा-यांना देशात रहाण्याचा अधिकार नाही या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेनेही याच मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्य दुष्काळामध्ये होरपळत असताना, महाराष्ट्रातील जनतेची पाण्यासाठी वणवण सुरु असताना राष्ट्रभक्तींच्या आरोळयांनी कोणीही रोमांचित होणार नाही असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, घरात पिण्याचे पाणी देईन नाहीतर खुर्चीवर लाथ मारीन अशी मुख्यमंत्र्यांनी गर्जना केली असती तर ते अधिक बरे झाले असते असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
अग्रलेखातील मुद्दे 
महाराष्ट्रात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले आहे व फक्त ‘भारतमाता की जय’ बोलून दुष्काळाची दाहकता कमी होणार नाही. पाण्याच्या टाक्या व टँकरवर पोलिसांचे पहारे बसविण्यात आले असून पाण्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला हे चित्र धक्कादायक आहे. ‘भारतमाता की जय’ बोलावेच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसे जिवंत राहायला हवीत. मराठवाड्यासह अनेक भागात पाण्यासाठी माणूसच माणसाचा शत्रू झालाय. भारतमातेच्या स्वप्नातील हा महाराष्ट्र नाही. मुख्यमंत्री, खुर्चीवर बसा व महाराष्ट्राला पाणी द्या! 
 
तिसरे महायुद्ध पाण्यासाठी लढले जाईल अशी शापवाणी अनेकांनी उच्चारली आहे. ती खरी ठरताना दिसत आहे. महाराष्ट्रात या महायुद्धाची ठिणगी पडली आहे व पाण्यासाठी दंगली, मारामार्‍या सुरू झाल्याचे चित्र अस्वस्थ करणारे आहे. सध्या ‘भारतमाता की जय’चे राजकारण जोरात सुरू आहे. खुर्ची गेली तरी चालेल, पण ‘भारतमाता की जय’ बोलणारच असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठणकावले आहे हे छानच झाले, पण भारतमातेची लेकरे पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, तडफडत आहेत, पाण्यासाठी एकमेकांचे रक्त पिण्यापर्यंत प्रकरण गेले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, घरात पिण्याचे पाणी देईन नाहीतर खुर्चीवर लाथ मारीन अशी गर्जना केली असती तर ते अधिक बरे झाले असते. 
 
मराठवाड्यातील तरुण घोटभर पाण्यासाठी शस्त्र हातात घेऊन दहशतवादी तर बनणार नाहीत ना? तसे झाले तर ‘भारतमाता की जय’ला काही अर्थ राहणार नाही. जनता सुखी तर भारतमाता सुखी. भारतमातेचा जय म्हणजे जनतेचा जय, पण जनतेला घोटभर पाणी नाही, गुरढोरे तडफडून मरत आहेत व शेतांचे स्मशान झाले आहे. या स्मशानात उभे राहून कोणी राष्ट्रभक्तीच्या आरोळ्या ठोकल्या तरी भारतमाता रोमांचित होऊन उठणार नाही. स्वातंत्र्यापूर्वी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हेे आझादी दुंगी’ अशी भारतमातेची हाक होती, पण रक्ताचे शिंपण देऊन स्वतंत्र झालेल्या भारतमातेस पिण्याच्या पाण्यासाठी त्राही त्राही करावे लागत आहे. 
 
पाण्याच्या साठ्यांवर डाकेदरोडे टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. सटाणा तालुक्यात पाण्यासाठी महिलांनी ग्रामसेवक व सरपंचांना डांबून ठेवल्याचे प्रकरण जुने झाले असले तरी यापेक्षा भयंकर अशी नवी प्रकरणे तणावात भर घालत आहेत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले आहे व फक्त ‘भारतमाता की जय’ बोलून दुष्काळाची दाहकता कमी होणार नाही. पाण्यासाठी प. महाराष्ट्र, कोकण, ठाणे व मुंबईतही संघर्ष सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात व शहरात जेमतेम पाणीसाठा उरला आहे. ठाण्यातही पाण्यासाठी दंगली उसळतील अशी भीती ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली. हे सर्व चित्र महाराष्ट्राची बिकट अवस्था दाखवणारे आहे. पाणी नाही म्हणून उद्योग बंद होतील व बेरोजगारीचे संकट उभे राहील. भारतमातेच्या स्वप्नांची महाराष्ट्रात अशी धूळधाण सुरू आहे व भारतमातेच्या नावाने राजकारणाचे ढोल वाजवले जात आहेत.