शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सीमाभागातील जनता मराठीच्या संरक्षकाच्या भूमिकेत

By admin | Updated: February 5, 2017 14:12 IST

सीमाभागातील लाखो लोक गेल्या अनेक वर्षांपासून भाषेसाठी संघर्ष करत आहेत

ऑनलाइन लोकमत पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली, दि. ५ - एकीकडे मराठी भाषेचे मारेकरी शोधण्याचे काम सुरू असतानाच सीमाभागातील लाखो लोक गेल्या अनेक वर्षांपासून भाषेसाठी संघर्ष करत आहेत, ही सीमाभागातील जनता मराठीच्या संरक्षकाच्या भूमिकेत आहेत, असे मत आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.आम्हीच मराठीचे मारेकरी या परिसंवादात राजकारणी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे मराठीचे मारेकरी म्हणून वक्त्यांचा रोख असतानाच मेणसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठीच्या संवर्धनासाठीचा सीमाभागातील जनतेचा संघर्ष समोर आणला, "सीमाभागातील लाखो लोक गेल्या अनेक वर्षांपासून भाषेसाठी संघर्ष करत आहेत, ही सीमाभागातील जनता मराठीच्या संरक्षकाच्या भूमिकेत आहेत, त्यांच्या संघर्षाला सलाम केला पाहिजे. मराठीला संपवण्याचे कर्नाटक सरकारने केले, पण सीमाभागातील जनतेने हे प्रयत्न हाणून पाडले," असे मेणसे म्हणाले.या परिसंवादात दीपक पवार यांनी मराठी भाषेबाबत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. "राजकारण्यांच्या लेखी मराठीचं महत्त्व उरलं आहे. मराठी भाषा विभागाचा प्रस्ताव सात वर्षे धूळ खात आहे. मराठी भाषेच्या शाळांची संख्या रोडावून इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी इंग्रजी शाळा हा धंदा बनला आहे," अशी टीका पवार यांनी केली. "राजकारण्यांची मुलं मराठी शाळेत जात नाहीत. अगदी व्यासपीठावरून मराठीची कढ घेणारेही इंग्रजाळलेले आहेत. मराठीचा वापर न्यायालयात व्हावा असा शासन निर्णय आहे, पण मराठीचा वापर तितकासा होत नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वातील मुंबई मराठी ग्रंथालयासह महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालये शेवटच्या घटका मोजत आहेत, अशाने मराठी टिकेल का असा सवाल उपस्थित करत पवार यांनी आपल्या हयातीत मराठीचे जग बदललेलं पाहायचे आहे," अशी आशा व्यक्त केली. तर चपराशापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सारेच मराठीचे मारेकरी आहेत, असा उद्वेग डॉ. कमलाकर कांबळे यांनी व्यक्त केला. प्रा. अमृता इंदुलकर यांनीही समाज, समूह, कुटुंब आणि व्यक्ती या स्तरांवर मराठीचे मारेकरी कशा पद्धतीने मराठीला हानी पोहोचवत आहेत, हे उदाहरणांसह स्पष्ट केले. गोव्याहून आलेले कृष्णाजी कुलकर्णी प्रसारमाध्यमांना लोकासमोर माराठी योग्य प्रमाणे मांडता आलेली नाही, असा गंभीर आरोप केला. तसेच मराठी प्रांतात मराठी माणसांच्या हितासाठी आवाज उठवण्यात चूक काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.कायदेतज्ज्ञ शांताराम दातार यांनी राजकीय पक्षांकडून मराठीची फसवणूक होत असल्याची टीका केली. सरकार मराठीची सक्ती का करत नाही? संमेलनाध्यक्ष पुढचे वर्षभर मराठीसाठी काय करणार, हे संमेलनाच्या मंचावरून का सांगत नाहीत, अशी विचारणा केली. तर दगडाचं महत्त्व असलेल्या समाजात माणसं आणि भाषा मोठी होऊ शकत नाही, अशी टीका चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी केली.