शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

सीमा भागातील लोकांनी साजरा केला ‘काळा दिवस’!

By admin | Updated: November 2, 2016 05:26 IST

१ नोव्हेंबरला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लोकांनी मुंबईतील करी रोड नाक्यावर रविवारी काळा दिवस म्हणून साजरा केला.

मुंबई : कर्नाटक राज्याचा राज्योत्सव म्हणून साजरा होणाऱ्या १ नोव्हेंबरला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लोकांनी मुंबईतील करी रोड नाक्यावर रविवारी काळा दिवस म्हणून साजरा केला. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रात सीमाभागातील लोकांना विलीन करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी या वेळी सरकारकडे केली.समितीने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवण्यात आलेला बेळगाव १९५६ सालापासून अखंड महाराष्ट्रापासून विलग आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळाली असली, तरी सीमाभागातील लोकांना अन्यायकारक कर्नाटक राज्यात डांबले गेले. म्हणूनच कर्नाटक राज्यात १ नोव्हेंबर राज्योस्तव दिन म्हणून साजरा होत असला, तरी सीमाभागातील लोकांसाठी हा काळा दिवसच आहे. अखंड महाराष्ट्रातील लोकांना सीमाभागातील लोकांची कळकळ कळावी, म्हणून राजधानी मुंबईत हा काळा दिवस साजरा केला. याआधी करी रोड नाक्यावर अखंड महाराष्ट्राचा काळा दिवस साजरा करण्यास ना.म. जोशी मार्ग पोलिसांकडून परवानगी देण्यास टाळाटाळ केली जात होती. दिवाळी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मोर्चा काढण्यास परवानगी देता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे महाराष्ट्रातही सीमाभागातील लोकांचा आवाज दडपडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समन्वय समितीने केला. त्यानंतर पोलिसांनी नमती भूमिका घेत आंदोलनास सोमवारी रात्री परवानगी दिल्याचे समितीने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>मुंबईकरांना विसरू नका!भौगोलिक सलगता, भाषावार प्रांतरचना, संस्कृती, बोलीभाषा या चार मूलभूत संविधानिक मुद्द्यांवर बेळगावसह आजूबाजूचे तालुके, गावे ही महाराष्ट्र राज्याचा अविभाज्य भाग आहेत, असे समितीचे म्हणणे आहे. शिवाय मुंबईकर ज्या हुतात्मा स्मारकास वंदन करतात, त्या १०५ हुतात्मांपैकी २ हुतात्मे हे या सीमाभागातले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी अखंड महाराष्ट्राच्या या लढ्यात भविष्यातही सामील होण्याचे आवाहन समितीने केले आहे.