शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सीमा भागातील लोकांनी साजरा केला ‘काळा दिवस’!

By admin | Updated: November 2, 2016 05:26 IST

१ नोव्हेंबरला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लोकांनी मुंबईतील करी रोड नाक्यावर रविवारी काळा दिवस म्हणून साजरा केला.

मुंबई : कर्नाटक राज्याचा राज्योत्सव म्हणून साजरा होणाऱ्या १ नोव्हेंबरला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लोकांनी मुंबईतील करी रोड नाक्यावर रविवारी काळा दिवस म्हणून साजरा केला. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रात सीमाभागातील लोकांना विलीन करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी या वेळी सरकारकडे केली.समितीने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवण्यात आलेला बेळगाव १९५६ सालापासून अखंड महाराष्ट्रापासून विलग आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळाली असली, तरी सीमाभागातील लोकांना अन्यायकारक कर्नाटक राज्यात डांबले गेले. म्हणूनच कर्नाटक राज्यात १ नोव्हेंबर राज्योस्तव दिन म्हणून साजरा होत असला, तरी सीमाभागातील लोकांसाठी हा काळा दिवसच आहे. अखंड महाराष्ट्रातील लोकांना सीमाभागातील लोकांची कळकळ कळावी, म्हणून राजधानी मुंबईत हा काळा दिवस साजरा केला. याआधी करी रोड नाक्यावर अखंड महाराष्ट्राचा काळा दिवस साजरा करण्यास ना.म. जोशी मार्ग पोलिसांकडून परवानगी देण्यास टाळाटाळ केली जात होती. दिवाळी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मोर्चा काढण्यास परवानगी देता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे महाराष्ट्रातही सीमाभागातील लोकांचा आवाज दडपडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समन्वय समितीने केला. त्यानंतर पोलिसांनी नमती भूमिका घेत आंदोलनास सोमवारी रात्री परवानगी दिल्याचे समितीने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>मुंबईकरांना विसरू नका!भौगोलिक सलगता, भाषावार प्रांतरचना, संस्कृती, बोलीभाषा या चार मूलभूत संविधानिक मुद्द्यांवर बेळगावसह आजूबाजूचे तालुके, गावे ही महाराष्ट्र राज्याचा अविभाज्य भाग आहेत, असे समितीचे म्हणणे आहे. शिवाय मुंबईकर ज्या हुतात्मा स्मारकास वंदन करतात, त्या १०५ हुतात्मांपैकी २ हुतात्मे हे या सीमाभागातले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी अखंड महाराष्ट्राच्या या लढ्यात भविष्यातही सामील होण्याचे आवाहन समितीने केले आहे.