शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

नगरच्या ३०५ निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 02:23 IST

सुरुवातीच्या १७-१८ वर्षांच्या रोजंदारीसह एकूण २० वर्षांहून अधिक काळ नोकरीनंतर सेवानिवृत्त झालेल्या सुमारे ३०५ कामगारांना अहमदनगर महापालिकेने नियमानुसार ग्रॅच्युईटी व पेन्शन

मुंबई : सुरुवातीच्या १७-१८ वर्षांच्या रोजंदारीसह एकूण २० वर्षांहून अधिक काळ नोकरीनंतर सेवानिवृत्त झालेल्या सुमारे ३०५ कामगारांना अहमदनगर महापालिकेने नियमानुसार ग्रॅच्युईटी व पेन्शन यासारखे निवृत्ती लाभ द्यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.या कामगारांनी व त्यांच्या वतीने अहमदनगर महापालिका कामगार युनियनने दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये हाच आदेश पाच वर्षांपूर्वी औद्योगिक न्यायालयाने दिला होता. परंतु त्याचे पालन न करता महापालिकेने त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. महापालिकेच्या या आव्हान याचिका औरंगाबाद खंडपाठाचे न्यायाधीश न्या. रवींद्र घुगे यांनी काही दिवसांपूर्वी फेटाळल्या. त्यामुळे महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात जाऊन आणखी वेळकाढूपणा केला नाही तर या निवृत्त कर्मचाऱ्यांना लवकरच निवृत्ती लाभ मिळतील, अशी आशा आहे.या कामगारांनी व त्यांच्या संघटनेने गेल्या २० वर्षांहून अधिक काळात दोन टप्प्यांत दिलेल्या यशस्वी न्यायालयीन लढ्याचे हे फलित आहे. यातील पहिला टप्पा नोकरीत कायम होण्याचा होता तर दुसरा टप्पा निवृत्तीनंतर, सुरुवातीचा रोजंदारीचा काळ व नंतरचा कायम नोकरीचा काळ याचा एकत्रित हिशेब करून निवृत्ती लाभ मिळविण्याचा होता.हे कामगार १९८१ पासून निरनिराळ्या वेळेस रोजंदारीवर महापालिकेत काम करू लागले. अशी सुमारे १२-१५ वर्षे रोजंदारी केल्यावर त्यांनी नोकरीत कायम होण्यासाठी औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. त्या न्यायालयाने या कामगारांना नोकरीत कायम करण्याचा आदेश आॅगस्ट १९९८ मध्ये दिला. महापालिकेने तो निकाल मान्य केला व तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. नगरविकास खात्यातीत पालिका प्रशासन संचालनालयाने तो मान्य केला. परंतु नोकरीत कायम झाल्यावर या कामगारांना रोजंदारीच्या काळाचे वित्तीय व सेवा लाभ मिळणार नाहीत, अशी अट घातली. तरीही महापालिकेने नोकरीत कायम केले नाही, म्हणून कामगार पुन्हा औद्योगिक न्यायालयात गेले. संचालनालयाच्या एप्रिल २००१ व आॅक्टोबर २००२ मधील निर्देशांनुसार त्यांना कायम करण्याचे आदेश त्या न्यायालयाने दिले. महापालिकेने या निर्णयास पुढे आव्हान दिले नाही.यानुसार, या कामगारांनी नंतर पुढे काही काळ कायम कामगार म्हणून नोकरी केली व नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले. या वेळी मात्र महापालिकेने त्यांना ग्रॅच्युईटी व पेन्शन यासारखे निवृत्ती लाभ देण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा औद्योगिक न्यायालय व उच्च न्यायालय अशा कोर्टकज्ज्याच्या दोन फेऱ्या झाल्या व दोन्ही स्तरांवर कामगारांच्या बाजूने निकाल झाले. (विशेष प्रतिनिधी)महापालिकेचे म्हणणे फेटाळलेमहापालिकेचे म्हणणे असे होते की, नोकरीत कायम होताना या कामगारांनी नागरी प्रशासन संचालनालयाने घातलेली अट मान्य केली होती. त्यामुळे पेन्शनसाठी त्यांचा रोजंदारीचा काळ हिशेबात धरता येणार नाही. तो काळ वगळला तर त्यांचा पेन्शनसाठी किमान आवश्यक सेवाकाळ पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांना पेन्शन देता येणार नाही.हे अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, मुळात संचालनालयाच्या पत्रांमध्ये पेन्शनसाठी रोजंदारीचा काळ गृहीत धरणार नाही, असे कुठेही म्हटलेले नव्हते. कामगारांची स्थिती दुबळी होती त्यामुळे त्यांनी नोकरीत कायम होण्यासाठी त्या पत्रातील अट मान्य केली. असे असले तरी रोजंदारीचा निम्मा काळ पेन्शनसाठी गृहीत धरण्याचे राज्य सरकारचे मे १९७० मधील परिपत्रक आहे. त्यामुळे पेन्शन रुल्स व हे या परिपत्रकाने मिळालेले हक्क, या कामगारांनी गैरसमजापोटी सोडून दिले होते, असे म्हटले तरी ते त्यांना नाकारता येणार नाहीत.