शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी शेकापचा धडक मोर्चा

By admin | Updated: June 6, 2017 02:36 IST

सरकारकडे गाऱ्हाणे घालूनदेखील सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : वारंवार सरकारकडे गाऱ्हाणे घालूनदेखील सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही. शासनापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांपुढे अखेर संप पुकारण्याखेरीज कोणताही मार्ग नसल्याने शेतकऱ्याने संपाचे शस्त्र उगारले. शेतकऱ्यांचा कैवारी असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेकाप रस्त्यावर उतरला आहे. जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर सकाळी ११ वाजता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. अलिबाग येथील मोर्चाअंती शेकाप नेत्या व माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी तहसीलदार प्रकाश संकपाळ यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिले. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयाजवळून मोर्चाला सुरु वात झाली. या वेळी जि. प. माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे, अनंतराव देशमुख, जि. प. सदस्या चित्रा पाटील, दिलीप भोईर, उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, जिल्हा कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. परेश देशमुख, नगरसेवक अ‍ॅड. गौतम पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महागाई नियंत्रणाच्या नावाखाली सरकार शेतमालाचे भाव वारंवार घसरवत आहे. यामुळे शेतकऱ्यांबरोबर सामान्य करदात्याला वेठीला धरण्यात येत आहे. भाजपाचे प्रमुख देणगीदार प्रामुख्याने शेतमाल पुरवठा व्यवस्थेतील व्यापारी, दलाल, प्रक्रि यादार असल्याने त्यांच्यावर सवलतींची मेहेरबानी करून शेतकरी वर्गाला कर्जाच्या खाईत ढकलले जात आहे. सरकारने त्वरित शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, सध्याच्या शेती व्यवसायाची डबघाईची परिस्थिती ओळखून शेती व ग्रामविकासासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, शेतीमालाचे हमीभाव निश्चित करताना शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची ताबडतोब अंमलबजावणी करून शेती व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी पाणीपुरवठ्याचे समन्यायी नियोजन करावे. तसेच शेतीशी निगडित असलेल्या ग्रामीण रोजगार संधीची निर्मिती करावी, अशा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी या वेळी सांगितले.>भाजीची टंचाई, भाजीचे भाव गगनाला भिडलेशेतकरी संपावर गेल्याने राज्यात ठिकठिकाणी भाजीपाला, दूध व अन्य जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी, शेतमालाला कायमस्वरूपी योग्य भाव, निवृत्तीवेतन, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संपाला सुरु वात केली आहे. भाजीपाला नसल्याने शहरात भाजी मिळणे कठीण झाले आहे. तर उपलब्ध भाजीचा भाव गगनाला भिडल्याने या संपाचा फटका सर्वसामान्य जनतेलाही बसला आहे.भाजीचा रोजगार ठप्पबाजारात भाजी उपलब्ध होत नसल्याने स्थानिक महिलांचा रोजगार ठप्प झाला आहे. जिल्ह्यातील महिला सकाळी घाऊक पद्धतीने भाजीपाला खरेदी करून दिवसभर भाजीविक्र ी करून उदरनिर्वाह करतात. मात्र, भाजीपाला उपलब्ध नसल्याने त्यांना घरी बसावे लागत आहे. त्यामुळे शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेकांच्या पदरी उपासमार आली असल्याचे चित्र दिसून येत आहे.बंदला उत्स्फूर्त प्रतिसादशेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक शहरातील कपडे, किराणा माल, ज्वेलर्स, मोबाइल आदी बाजारपेठेतील दुकाने बंद होती. मात्र, रु ग्णांचे हाल होऊ नये, याकरिता औषधांची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून दुकानदार, व्यापारी वर्गाने एकदिवसीय बंद पुकारल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. >शेतकरी संपाला शेकापचा पाठिंबाकर्जत : राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला आहे. सोमवारी सकाळी ११.३० वाजता तहसीलदार यांना निवेदन देऊन कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाने शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे.शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास थोरवे, जिल्हा परिषद सदस्य व तालुका चिटणीस सुदाम पेमारे, पंचायत समिती माजी उपसभापती अशोक पाटील, प्रकाश फराट, जिकरिया बुबेरे, सुधीर कांबळे, बाळाराम ऐनकर आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांना निवेदन सादर केले.