शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

शेतकऱ्यांसाठी शेकापचा धडक मोर्चा

By admin | Updated: June 6, 2017 02:36 IST

सरकारकडे गाऱ्हाणे घालूनदेखील सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : वारंवार सरकारकडे गाऱ्हाणे घालूनदेखील सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही. शासनापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांपुढे अखेर संप पुकारण्याखेरीज कोणताही मार्ग नसल्याने शेतकऱ्याने संपाचे शस्त्र उगारले. शेतकऱ्यांचा कैवारी असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेकाप रस्त्यावर उतरला आहे. जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर सकाळी ११ वाजता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. अलिबाग येथील मोर्चाअंती शेकाप नेत्या व माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी तहसीलदार प्रकाश संकपाळ यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिले. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयाजवळून मोर्चाला सुरु वात झाली. या वेळी जि. प. माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे, अनंतराव देशमुख, जि. प. सदस्या चित्रा पाटील, दिलीप भोईर, उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, जिल्हा कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. परेश देशमुख, नगरसेवक अ‍ॅड. गौतम पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महागाई नियंत्रणाच्या नावाखाली सरकार शेतमालाचे भाव वारंवार घसरवत आहे. यामुळे शेतकऱ्यांबरोबर सामान्य करदात्याला वेठीला धरण्यात येत आहे. भाजपाचे प्रमुख देणगीदार प्रामुख्याने शेतमाल पुरवठा व्यवस्थेतील व्यापारी, दलाल, प्रक्रि यादार असल्याने त्यांच्यावर सवलतींची मेहेरबानी करून शेतकरी वर्गाला कर्जाच्या खाईत ढकलले जात आहे. सरकारने त्वरित शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, सध्याच्या शेती व्यवसायाची डबघाईची परिस्थिती ओळखून शेती व ग्रामविकासासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, शेतीमालाचे हमीभाव निश्चित करताना शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची ताबडतोब अंमलबजावणी करून शेती व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी पाणीपुरवठ्याचे समन्यायी नियोजन करावे. तसेच शेतीशी निगडित असलेल्या ग्रामीण रोजगार संधीची निर्मिती करावी, अशा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी या वेळी सांगितले.>भाजीची टंचाई, भाजीचे भाव गगनाला भिडलेशेतकरी संपावर गेल्याने राज्यात ठिकठिकाणी भाजीपाला, दूध व अन्य जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी, शेतमालाला कायमस्वरूपी योग्य भाव, निवृत्तीवेतन, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संपाला सुरु वात केली आहे. भाजीपाला नसल्याने शहरात भाजी मिळणे कठीण झाले आहे. तर उपलब्ध भाजीचा भाव गगनाला भिडल्याने या संपाचा फटका सर्वसामान्य जनतेलाही बसला आहे.भाजीचा रोजगार ठप्पबाजारात भाजी उपलब्ध होत नसल्याने स्थानिक महिलांचा रोजगार ठप्प झाला आहे. जिल्ह्यातील महिला सकाळी घाऊक पद्धतीने भाजीपाला खरेदी करून दिवसभर भाजीविक्र ी करून उदरनिर्वाह करतात. मात्र, भाजीपाला उपलब्ध नसल्याने त्यांना घरी बसावे लागत आहे. त्यामुळे शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेकांच्या पदरी उपासमार आली असल्याचे चित्र दिसून येत आहे.बंदला उत्स्फूर्त प्रतिसादशेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक शहरातील कपडे, किराणा माल, ज्वेलर्स, मोबाइल आदी बाजारपेठेतील दुकाने बंद होती. मात्र, रु ग्णांचे हाल होऊ नये, याकरिता औषधांची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून दुकानदार, व्यापारी वर्गाने एकदिवसीय बंद पुकारल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. >शेतकरी संपाला शेकापचा पाठिंबाकर्जत : राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला आहे. सोमवारी सकाळी ११.३० वाजता तहसीलदार यांना निवेदन देऊन कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाने शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे.शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास थोरवे, जिल्हा परिषद सदस्य व तालुका चिटणीस सुदाम पेमारे, पंचायत समिती माजी उपसभापती अशोक पाटील, प्रकाश फराट, जिकरिया बुबेरे, सुधीर कांबळे, बाळाराम ऐनकर आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांना निवेदन सादर केले.