शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

उमेदवाराच्या घोषणेत शेकापची आघाडी

By admin | Updated: October 17, 2016 02:48 IST

डिसेंबरमध्ये होवू घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून होणार आहे.

जयंत धुळप,

अलिबाग- डिसेंबरमध्ये होवू घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून होणार आहे. या निवडणुकीकरिता शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अलिबागचे विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक हेच राहणार असल्याची घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.रविवारी येथील कच्छीभवन सभागृहात अलिबाग शहर शेकापच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. यावेळी अलिबागचे विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, अलिबाग पं.स. उपसभापती अनिल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा कार्यकारिणी सदस्य नृपाल पाटील, अलिबाग तालुका शेकाप चिटणीस अनिल पाटील, शेकाप पुरोगामी युवा संघटना अध्यक्ष अ‍ॅड.संजय पाटील, अलिबाग मुस्लीम समाज प्रतिनिधी नुर सय्यद, शेकाप कार्यालयीन चिटणीस अनंतराव देशमुख, अलिबाग व्यापारी संघटना प्रतिनिधी मुकेश जैन, राजू जैन आदी उपस्थित होते.अलिबाग नगरपरिषदेतील तीस वर्षांच्या शेकाप सत्ताकाळातील परिवर्तनाच्या प्रक्रियेचा आढावा यावेळी जयंत पाटील यांनी घेतला. प्रथम प्रशांत नाईक यांच्या मातोश्री सुनीता नाईक, नंतर पत्नी अ‍ॅड. नमिता नाईक आणि स्वत: प्रशांत नाईक या तिघांनी अलिबाग शहराच्या नागरिकांबरोबर राजकारणाच्या चौकडी पलीकडे जाऊन व्यक्तिगत नाते निर्माण केले आहे. नाईक यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत नगरसेवक वा नागरिक यांच्याकडून एकही तक्रार आली नसल्याने, सर्वानुमतेच त्यांची नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निश्चिती केली असल्याचे त्यांनी सांगितले.शहराच्या हद्दीत २४ किमी लांबीचे रस्ते आहेत, त्यापैकी १२ ते १३ किमीचे रस्ते काँक्रीट व पेव्हरब्लॉकचे करण्याचे काम नगरपरिषदेने केले आहे. रस्त्याच्या कामांकरिता आमदार पंडित पाटील यांनी पाठपुरावा करुन ५ कोटी रुपये आणले. शहरातील कचरा रात्री उचलणे आणि रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करणे याबाबतचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.अलिबाग कोळीवाडा देखील अलिबागच्या ब्राम्हणआळीप्रमाणे स्वच्छ आणि सुरेख करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता कोळीवाड्यात एफएसआय ४ करुन आणण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. शहरातील मासळी बाजार आधुनिक पद्धतीने बांधून तो वातानुकूलित व स्वच्छ ठेवण्याचे नियोजन आमदार निधी व अन्य निधीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.>विजेसाठी १०० कोटी३० वर्षांत अलिबाग शहरात पाणीपट्टी वाढविण्यात आलेली नाही. शहरात भूमिगत केबलद्वारे वीज पुरवठ्याच्या प्रकल्पासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. भूमिगत नाल्याची योजना कंत्राटदाराच्या अकार्यक्षमतेने प्रलंबित आहे. त्यासाठीचे २० कोटी रुपये नगरपरिषदेकडे जमा आहेत. येत्या काळात नव्या कंत्राटदाराच्या माध्यमातून ही योजना पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.