शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

उमेदवाराच्या घोषणेत शेकापची आघाडी

By admin | Updated: October 17, 2016 02:48 IST

डिसेंबरमध्ये होवू घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून होणार आहे.

जयंत धुळप,

अलिबाग- डिसेंबरमध्ये होवू घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून होणार आहे. या निवडणुकीकरिता शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अलिबागचे विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक हेच राहणार असल्याची घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.रविवारी येथील कच्छीभवन सभागृहात अलिबाग शहर शेकापच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. यावेळी अलिबागचे विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, अलिबाग पं.स. उपसभापती अनिल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा कार्यकारिणी सदस्य नृपाल पाटील, अलिबाग तालुका शेकाप चिटणीस अनिल पाटील, शेकाप पुरोगामी युवा संघटना अध्यक्ष अ‍ॅड.संजय पाटील, अलिबाग मुस्लीम समाज प्रतिनिधी नुर सय्यद, शेकाप कार्यालयीन चिटणीस अनंतराव देशमुख, अलिबाग व्यापारी संघटना प्रतिनिधी मुकेश जैन, राजू जैन आदी उपस्थित होते.अलिबाग नगरपरिषदेतील तीस वर्षांच्या शेकाप सत्ताकाळातील परिवर्तनाच्या प्रक्रियेचा आढावा यावेळी जयंत पाटील यांनी घेतला. प्रथम प्रशांत नाईक यांच्या मातोश्री सुनीता नाईक, नंतर पत्नी अ‍ॅड. नमिता नाईक आणि स्वत: प्रशांत नाईक या तिघांनी अलिबाग शहराच्या नागरिकांबरोबर राजकारणाच्या चौकडी पलीकडे जाऊन व्यक्तिगत नाते निर्माण केले आहे. नाईक यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत नगरसेवक वा नागरिक यांच्याकडून एकही तक्रार आली नसल्याने, सर्वानुमतेच त्यांची नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निश्चिती केली असल्याचे त्यांनी सांगितले.शहराच्या हद्दीत २४ किमी लांबीचे रस्ते आहेत, त्यापैकी १२ ते १३ किमीचे रस्ते काँक्रीट व पेव्हरब्लॉकचे करण्याचे काम नगरपरिषदेने केले आहे. रस्त्याच्या कामांकरिता आमदार पंडित पाटील यांनी पाठपुरावा करुन ५ कोटी रुपये आणले. शहरातील कचरा रात्री उचलणे आणि रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करणे याबाबतचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.अलिबाग कोळीवाडा देखील अलिबागच्या ब्राम्हणआळीप्रमाणे स्वच्छ आणि सुरेख करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता कोळीवाड्यात एफएसआय ४ करुन आणण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. शहरातील मासळी बाजार आधुनिक पद्धतीने बांधून तो वातानुकूलित व स्वच्छ ठेवण्याचे नियोजन आमदार निधी व अन्य निधीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.>विजेसाठी १०० कोटी३० वर्षांत अलिबाग शहरात पाणीपट्टी वाढविण्यात आलेली नाही. शहरात भूमिगत केबलद्वारे वीज पुरवठ्याच्या प्रकल्पासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. भूमिगत नाल्याची योजना कंत्राटदाराच्या अकार्यक्षमतेने प्रलंबित आहे. त्यासाठीचे २० कोटी रुपये नगरपरिषदेकडे जमा आहेत. येत्या काळात नव्या कंत्राटदाराच्या माध्यमातून ही योजना पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.