शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

शांतता, प्रचार संपला!

By admin | Updated: October 14, 2014 01:02 IST

गत दोन आठवड्यापासून उडालेला प्रचाराचा धुरळा आज सांयकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवस राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखविली.

बहुरंगी लढती : मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यतानागपूर : गत दोन आठवड्यापासून उडालेला प्रचाराचा धुरळा आज सांयकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवस राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखविली. युती आणि आघाडी स्वतंत्रपणे निवडणुका लढवीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातही प्रत्येक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र आहे. प्रत्येक प्रमुख उमेदवार त्याचे मतदार बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असल्याने, त्यातून मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक होत असून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना, मनसे, बसपा यांच्यासह छोट्या-मोठ्या पक्षाचे एकूण २११ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान चार प्रमुख पक्षाचे उमेदवार निवडणुकीत त्यांचे भाग्य आजमावीत आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या ही ३७ लाखांवर आहे. निवडणुकीत प्रत्येक मतदार हा जास्तीतजास्त मतदार बाहेर काढण्यावर भर देणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेतली तर यावेळी मतदानाची टक्केवारी गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. याशिवाय निवडणूक आयोगानेही मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर नियुक्त करून शाळा-महाविद्यालयांत मतदार जागृती अभियान राबविले आहे.उमेदवारांची संख्या अधिक असल्याने विजयी उमेदवारांचे मताधिक्य हे विशेष असणार नाही. त्यामुळे जो उमेदवार जास्तीतजास्त मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यास यशस्वी होईल त्याला जिंकण्याची संधी आहे. राजकीय पक्षानेही त्यांच्या अधिकाधिक जागा जिंकून याव्या यासाठी यंत्रणा तयार केली असून, त्याचाही मुख्य आधार हा मतदारांना घराबाहेर काढण्यावरच असणार आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मतदानाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.२००९ च्या निवडणुकीत काटोल (६४.८९ टक्के), सावनेर ( ७०.१९ टक्के) हिंगणा (५८.१३ टक्के), उमरेड (६२.६८ टक्के), कामठी (५८.८२ टक्के), रामटेक (६४.७६ टक्के), दक्षिण-पश्चिम (४९.८० टक्के), दक्षिण नागपूर (४७.५८ टक्के), पूर्व नागपूर (५६.६० टक्के), मध्य नागपूर (५०.७६ टक्के), पश्चिम नागपूर (४६.९६ टक्के), उत्तर नागपूर (४८.०२ टक्के).(प्रतिनिधी)विनापरवानगी एसएमएस फोन करणाऱ्यांना नोटीसप्रचार थांबल्यावर एसएमएस किंवा फोनद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यास मनाई आहे. मात्र तरीही विनापरवानगी उमेदवारांचे प्रचारासाठी एसएमएस आणि फोन येत आहेत. याकडे सोमवारी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांचे लक्ष वेधले. विनापरवानगीने एसएमएस किंवा फोन करणाऱ्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय निवडणूक शाखेने घेतला आहे.