शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पवारांकडून पराभवाचा पंचनामा

By admin | Updated: November 19, 2014 04:59 IST

लोकप्रतिनिधींचा कमी झालेला संपर्क, नेत्यांवर झालेले प्रचंड आरोप, मध्यमवर्गीय मतदारांनी पक्षाकडे फिरविलेली पाठ

चोंढी (अलिबाग) : लोकप्रतिनिधींचा कमी झालेला संपर्क, नेत्यांवर झालेले प्रचंड आरोप, मध्यमवर्गीय मतदारांनी पक्षाकडे फिरविलेली पाठ आणि मुस्लीम-दलित-आदिवासी-धनगर समाजाने योग्य साथ न दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाचा पंचनामा आज केला.पराभवाचे चिंतन आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी आयोजित पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले, विदर्भ, मुंबई शहर आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत अपेक्षित यश मिळाले नाही. जळगावमध्ये ४वरून एका आमदारावर आलो. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आमचे एक आमदार जेलमध्ये होते. त्या प्रतिमेचा फटका बसला.धनगर समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादीचा विरोध नव्हता पण तसे चित्र निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले. मध्यमवर्गीयांची संख्या अधिक असलेल्या मुंबई, पुणे, नागपुरात आम्हाला मोठा फटका बसला. आघाडी ऐनवेळी तुटली तरी स्वबळावर लढण्याची शक्यता तपासून आम्ही तशी तयारी करून ठेवायला हवी होती पण तसे घडले नाही. पक्षाच्या आमदार, खासदारांनी आपल्या मतदारसंघाव्यतिरिक्त एका मतदारसंघात पक्षवाढीच्या दृष्टीने लक्ष घालावे, असे आदेश पवार यांनी दिले. आ. राहुल नार्वेकर यांच्या अलिशान रिसोर्टवर बैठकीची व्यवस्था आहे. नेत्यांच्या मनोरंजनासाठी रात्री ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ही झाला. गेल्या वेळी राष्ट्रवादीची बैठक येथेच एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झाली होती. (विशेष प्रतिनिधी)