शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

पवारांनी बारामतीतील गायरान जमिनी लाटल्या!

By admin | Updated: July 21, 2014 02:48 IST

शरद पवारांनी बारामतीतील गायरान जमिनी लाटून त्यावर विद्या प्रतिष्ठानसारख्या संस्था उभ्या केल्याचे टीकास्त्र रविवारी येथील जाहीर सभेत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले.

बार्शी : शरद पवारांनी बारामतीतील गायरान जमिनी लाटून त्यावर विद्या प्रतिष्ठानसारख्या संस्था उभ्या केल्याचे टीकास्त्र रविवारी येथील जाहीर सभेत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले. उद्धव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावरही टीकेची झोड उठविली. भगवंताच्या बार्शीतला भगवा राज्यात फडकवा, असे आवाहन त्यांनी केले.सत्तेत असताना शरद पवारांनी कधीही दुष्काळग्रस्तांसाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी आपले वजन वापरले नाही. पण मोदी सत्तेवर येताच राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पंतप्रधानांना सांगण्यासाठी भेटल्याचे सांगून आपले फोटो ते छापून आणत आहेत. सत्ता असताना महाराष्ट्राचे भले का केले नाही? असा सवाल करतानाच उद्धव यांनी दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांऐवजी पवारांना राज्यात २६ लवासासारखे प्रकल्प उभे करण्यास जास्त रस असल्याचा आरोप केला. गरिबांविषयी त्यांना कळवळा नाही. तर ‘हिल स्टेशन’ उभारण्यात त्यांना धन्यता वाटते, अशीही टीका त्यांनी केली.शिवसेना सोडून गेलेले तडफडत आहेत. त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. शिवसेनेमध्ये प्रेम आहे, असे सांगत सत्ताधाऱ्यांची पैशांची मस्ती वाढत आहे. त्यामुळे आपले सरकार येणारच आहे. विरोधकांना उमेदवार शोधावे लागत आहेत, असा टोला त्यांनी लागावला. स्वीट डिशची काळजीगेल्या १५ वर्षांपासून आघाडी सरकारने खाण्याचेच काम केले आहे. सिंचनावर कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र त्याचा परिणाम किती झाला हे दिसत नाही. अजित पवारांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वीट डिशची चिंता जास्त आहे, असा टोला त्यांनी लगावला. नारायण राणे यांची सद्दी संपली असून त्यांना अस्तित्वासाठी सध्या लढावे लागत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)