शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

‘जैतापूर’साठी पवार सरसावले

By admin | Updated: April 12, 2015 01:47 IST

सत्तेत राहून प्रकल्पाला विरोध करणे योग्य नाही, असा टोला त्यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलाताना शिवसेनेला लगावला.

मुंबई : कोकणातील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोई होलांद यांनी एका महत्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर आता या प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील पुढे सरसावले आहेत. हा प्रकल्प देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण आहे, असे सांगतानाच सत्तेत राहून प्रकल्पाला विरोध करणे योग्य नाही, असा टोला त्यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलाताना शिवसेनेला लगावला.दरम्यान, अमरावती येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेच्या प्रकल्पविरोधी भूमिकेवर टीका केली. पंतप्रधानांनी देशाच्या हिताचाच करार फ्रान्सशी घडवून आणला आहे. त्यामुळे कुणीही त्याला विरोध करण्याचे कारण नाही, असा टोला लगावला. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची चांगलीच गोची झाल्याचे दिसत आहे.केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुढाकार घेऊन अणुऊर्जेसंबंधी महत्वपूर्ण करार केले. संपूर्ण जगाचे लक्ष या कराराकडे लक्ष लागले होते. तेव्हापासून शिवसेना या प्रकल्पाला विरोध आहे. मात्र, आता पंतप्रधान मोदी यांनी करारावर स्वाक्षरी केल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला असताजैतापूर प्रकल्पावर शिवसेनेचे आम्ही मन वळवू, असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. खडसेंच्या या वक्तव्यानंतर सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे सेनेचे मंत्री उठून गेले. मंत्री रामदास कदम आणि खा. संजय राऊत सोडले तर शिवसेनेतील इतर नेते जैतापूरबाबत उघडपणे बोलताना दिसत नाहीत. (विशेष प्रतिनिधी)च्हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा असल्याने आमची सरकारला सहकार्याचीच भूमिका राहील. उलट जे सरकारमध्ये सामील आहेत त्यांचा विरोध अनठायी आहे. एकीकडे राज्यात आणि केंद्रात सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे सरकारलाच विरोध करायचा, ही गोष्ट चुकीची असल्याचे सांगत सेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे मग विरोध करावा, असे पवार यांनी सांगितले.च्तारापूर अणूऊर्जा प्रकल्पातून राज्याला स्वस्त व पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता वीज मिळते आहे. त्यामुळे राज्याचा विकास होतो आहे. जर अशीच वीज जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पातून उपलब्ध होणार असेल तर त्याला आपल्या पक्षाचा पाठिंबाच असेल.