शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

पवनानगर रस्त्याची चाळण

By admin | Updated: July 14, 2017 01:51 IST

लोणावळा-पवनानगर या राज्य मार्गाची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : लोणावळा-पवनानगर या राज्य मार्गाची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली असून प्रवास करताना रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. या रस्त्याची दैना झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याचे कसलेही सोयरसुतक वाटत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मात्र जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास याठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य राजश्री राऊत व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.लोणावळा शहरातून पवनानगर, प्रति पंढरी दुधिवरे, लोहगड किल्ला या पर्यटनस्थळांना जाण्यासोबत भैरवनाथनगर, डोंगरगाव, डोंगरगाववाडी, कुसगाववाडी, औंढे, औंढोली, आपटी अशा जवळपास २५ ते ३० गावांना जाण्यासाठी नागरिकांना याच मार्गाने जावे लागते. मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण ही कामे न झाल्याने रस्ता खूप खराब झाला आहे. रस्त्यामध्ये सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. अनेक वेळा चारचाकी वाहने व दुचाकी गाड्या या खड्डयांमध्ये आदळून नुकसान होत आहे. रस्त्याच्या कडेचे नाले योग्य प्रकारे साफ झालेले नाहीत. काही ठिकाणी नाल्यांमधील गाळ तसाच काठावर ढीग रचून ठेवण्यात आला आहे. जून महिन्यात लोणावळा परिसरात जोरदार पाऊस झाला. या वेळी भैरवनाथनगर व गणपती मंदिर परिसरातील हा रस्ता काही फूट पाण्याखाली होता. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने मार्ग काहीकाळ बंद पडला होता. ग्रामस्थ, शाळकरी मुले, दुग्ध व्यावसायिक व पवनानगर परिसरात जाणारे पर्यटक अशा हजारो जणांना या खड्डेमय रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पावसाळ्याचे चार महिने येथे डांबरीकरण करता येत नसले तरी नागरिकांची गैरसोय ठाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डागडुजी करून खड्डे बुजवावेत अशी मागणी पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत, सदाशिव सोनार, किरण हुलावळे, प्रवीण साळवे, संतोष राऊत, सुरेश कडू, दादा डफळ, अमोल केदारी, लक्ष्मण केदारी, सुरेश गुंड, भाऊ भिवडे, साईनाथ मांडेकर, चंद्रकांत घारे, साईदास निंबळे, राजेश केदारी, बाळासाहेब गुंड, हनुमान भोसले, कैलास दाभणे आदींनी केली आहे.