शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पवनानगर रस्त्याची चाळण

By admin | Updated: July 14, 2017 01:51 IST

लोणावळा-पवनानगर या राज्य मार्गाची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : लोणावळा-पवनानगर या राज्य मार्गाची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली असून प्रवास करताना रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. या रस्त्याची दैना झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याचे कसलेही सोयरसुतक वाटत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मात्र जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास याठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य राजश्री राऊत व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.लोणावळा शहरातून पवनानगर, प्रति पंढरी दुधिवरे, लोहगड किल्ला या पर्यटनस्थळांना जाण्यासोबत भैरवनाथनगर, डोंगरगाव, डोंगरगाववाडी, कुसगाववाडी, औंढे, औंढोली, आपटी अशा जवळपास २५ ते ३० गावांना जाण्यासाठी नागरिकांना याच मार्गाने जावे लागते. मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण ही कामे न झाल्याने रस्ता खूप खराब झाला आहे. रस्त्यामध्ये सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. अनेक वेळा चारचाकी वाहने व दुचाकी गाड्या या खड्डयांमध्ये आदळून नुकसान होत आहे. रस्त्याच्या कडेचे नाले योग्य प्रकारे साफ झालेले नाहीत. काही ठिकाणी नाल्यांमधील गाळ तसाच काठावर ढीग रचून ठेवण्यात आला आहे. जून महिन्यात लोणावळा परिसरात जोरदार पाऊस झाला. या वेळी भैरवनाथनगर व गणपती मंदिर परिसरातील हा रस्ता काही फूट पाण्याखाली होता. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने मार्ग काहीकाळ बंद पडला होता. ग्रामस्थ, शाळकरी मुले, दुग्ध व्यावसायिक व पवनानगर परिसरात जाणारे पर्यटक अशा हजारो जणांना या खड्डेमय रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पावसाळ्याचे चार महिने येथे डांबरीकरण करता येत नसले तरी नागरिकांची गैरसोय ठाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डागडुजी करून खड्डे बुजवावेत अशी मागणी पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत, सदाशिव सोनार, किरण हुलावळे, प्रवीण साळवे, संतोष राऊत, सुरेश कडू, दादा डफळ, अमोल केदारी, लक्ष्मण केदारी, सुरेश गुंड, भाऊ भिवडे, साईनाथ मांडेकर, चंद्रकांत घारे, साईदास निंबळे, राजेश केदारी, बाळासाहेब गुंड, हनुमान भोसले, कैलास दाभणे आदींनी केली आहे.