शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

पवनानगर रस्त्याची चाळण

By admin | Updated: July 14, 2017 01:51 IST

लोणावळा-पवनानगर या राज्य मार्गाची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : लोणावळा-पवनानगर या राज्य मार्गाची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली असून प्रवास करताना रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. या रस्त्याची दैना झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याचे कसलेही सोयरसुतक वाटत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मात्र जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास याठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य राजश्री राऊत व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.लोणावळा शहरातून पवनानगर, प्रति पंढरी दुधिवरे, लोहगड किल्ला या पर्यटनस्थळांना जाण्यासोबत भैरवनाथनगर, डोंगरगाव, डोंगरगाववाडी, कुसगाववाडी, औंढे, औंढोली, आपटी अशा जवळपास २५ ते ३० गावांना जाण्यासाठी नागरिकांना याच मार्गाने जावे लागते. मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण ही कामे न झाल्याने रस्ता खूप खराब झाला आहे. रस्त्यामध्ये सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. अनेक वेळा चारचाकी वाहने व दुचाकी गाड्या या खड्डयांमध्ये आदळून नुकसान होत आहे. रस्त्याच्या कडेचे नाले योग्य प्रकारे साफ झालेले नाहीत. काही ठिकाणी नाल्यांमधील गाळ तसाच काठावर ढीग रचून ठेवण्यात आला आहे. जून महिन्यात लोणावळा परिसरात जोरदार पाऊस झाला. या वेळी भैरवनाथनगर व गणपती मंदिर परिसरातील हा रस्ता काही फूट पाण्याखाली होता. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने मार्ग काहीकाळ बंद पडला होता. ग्रामस्थ, शाळकरी मुले, दुग्ध व्यावसायिक व पवनानगर परिसरात जाणारे पर्यटक अशा हजारो जणांना या खड्डेमय रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पावसाळ्याचे चार महिने येथे डांबरीकरण करता येत नसले तरी नागरिकांची गैरसोय ठाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डागडुजी करून खड्डे बुजवावेत अशी मागणी पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत, सदाशिव सोनार, किरण हुलावळे, प्रवीण साळवे, संतोष राऊत, सुरेश कडू, दादा डफळ, अमोल केदारी, लक्ष्मण केदारी, सुरेश गुंड, भाऊ भिवडे, साईनाथ मांडेकर, चंद्रकांत घारे, साईदास निंबळे, राजेश केदारी, बाळासाहेब गुंड, हनुमान भोसले, कैलास दाभणे आदींनी केली आहे.