शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अपयशाचा मार्ग जातोय मृत्यूच्या दारात

By admin | Updated: January 21, 2015 23:15 IST

वर्षभरात सरासरी ४० पेक्षा जास्त आत्महत्या : जाच, मनाविरुद्ध होणाऱ्या घटनामुळे शेवट; सामाजिकदृष्ट्या चिंताजनक

एकनाथ पाटील - कोल्हापूर -पैसा टाका आणि झटपट यश मिळवा, या आमिषापोटी तरुण-तरुणींच्यामध्ये स्पर्धा वाढली असून, त्यामध्ये अपयश आल्यास ते आत्महत्येकडे वळतात, असा निष्कर्ष तज्ज्ञांच्या अभ्यासामधून पुढे येत आहे. अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामध्ये युवावर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. नवविवाहिता, शाळकरी मुले, तरुण शेतकरी, उच्चशिक्षित नोकरदारवर्गही याला अपवाद नाही. ‘आत्महत्या’ हा चिंतेचा प्रश्न समाजासमोर बनला असून, वर्षभरात सरासरी ४० आत्महत्या पोलीस दप्तरी नोंद झाल्या आहेत. आजकाल प्रसारमाध्यमे आणि सुलभ देवाण-घेवाणीमुळे कॉलेज तरुण-तरुणींमध्ये एकवेगळ्या प्रकाराचे वातावरण निर्माण झालेले दिसते. पुस्तकांपेक्षा ते मोबाईलवर चॅटिंग करण्यात धन्यता मानतात आणि त्यातूनचे मैत्री, प्रेम वाढत जाते आणि नको इतक्या प्रमाणात ते स्वत:ला वाहून घेतात. त्यातूनच एकतर्फी प्रेमाचा किंवा घरच्यांचा विरोध अशा गोष्टींमुळे तरुण-तरुणी निराशेत जातात आणि आत्महत्येकडे वळतात. उच्चशिक्षित युवकांचेही आत्महत्येचे प्रमाण तितक्याच प्रमाणात वाढत आहे. काही युवक स्वाभिमान दुखावल्याच्या नैराश्येतून टोकाची भूमिका घेतात, तर काही व्यवसायात, नोकरीत थोड्याश्या आलेल्या अपयशानेही स्वत:चे जीवन संपवितात. सध्या इंटरनेटचे युग असल्याने प्रत्येक गोष्ट हायटेक बनत चालली आहे. मोबाईल, व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, टीव्ही चॅनेल, आदींच्या वापरामुळे जीवनही तितक्याच गतीने चालले आहे, अशी भावना प्रत्येक व्यक्तीत निर्माण होत आहे.नवविवाहितेच्या आत्महत्येचे कारण शोधले असता सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशांची मागणी, त्याचबरोबर शिक्षणामुळे वाढलेल्या त्यांच्या अपेक्षा त्यांची पूर्तता न झाल्याने आलेले नैराश्य आणि अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात. समज येण्याच्या अगोदरच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजकालच्या मुलांच्यामध्ये तीव्र बनला आहे. आयुष्य म्हणजे फक्त मजामस्ती आणि आनंद उपभोगणे एवढेच त्यांना माहितीआहे. त्यासोबत काही जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि कष्ट असते याची कल्पनाच नसते. त्यामध्ये पालकही त्यांना त्या जबाबदारीची जाणीव करून देताना दिसत नाहीत. वर्षभरात--४० आत्महत्यापालकही हतबललहान मुलांपासून ते महाविद्यालयीन युवकांच्या स्वभावामध्ये आयुष्याबद्दल एक न्यूनगंड तयार झाला आहे. मग त्यात आई-वडील अभ्यास कर म्हटले अथवा एखादी चैनीची गोष्ट द्यायला नकार दिला, तर ती मुले किंवा तरुण घरातून पळून जाण्यापासून आत्महत्येपर्यंतचा विचार करतात. त्यामुळे आजकालचे पालक मुलांना समजवायला किंवा बोलायला घाबरतात आणि हा एक जागतिक प्रश्न बनत चालला आहे, की मुलांवर संस्कार करायचे तरी कसे ? त्यामुळे पालक हतबल झाले आहेत. युवक-युवतींना सध्या भौतिक सुखाचा हव्यास मोठ्या प्रमाणात जडला आहे. सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी कशा हाताळल्या पाहिजे याचे ज्ञान नाही. स्वत:च्या भावनांना आवर घालण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. त्यामुळे भावनिक बुद्धांक कमी झाल्याने त्यांच्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यांची क्षमता वाढविण्यामध्ये प्रौढवर्ग कमी पडत आहे. - डॉ. शुभदा दिवाण, समुपदेशक जीवन हे प्रत्येकासाठी अनमोल आहे. जीवनामध्ये एखादे अपयश किंवा नैराश्य आले तरी खचून न जाता येणारा दिवस आपला आहे, असे समजून ओढावलेल्या संकटांवर मात करायला शिकले पाहिजे. आत्महत्येच्या पर्यायाने सगळे प्रश्न सुटतात असे नाही, तर ते वाढतात व गुंतागुंतीचे बनतात आणि आपल्याच कुटुंबाला त्याचा आयुष्यभर त्रास होतो. - प्रणाली प्रवीण पाटील (कोडोली) संशय, संपत्ती, अपेक्षाभंग ठरते कारणनवविवाहितेच्या आत्महत्येचे कारण शोधले असता सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशांची मागणी, त्याचबरोबर शिक्षणामुळे वाढलेल्या त्यांच्या अपेक्षा त्यांची पूर्तता न झाल्याने आलेले नैराश्य आणि अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात.