शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

अपयशाचा मार्ग जातोय मृत्यूच्या दारात

By admin | Updated: January 21, 2015 23:15 IST

वर्षभरात सरासरी ४० पेक्षा जास्त आत्महत्या : जाच, मनाविरुद्ध होणाऱ्या घटनामुळे शेवट; सामाजिकदृष्ट्या चिंताजनक

एकनाथ पाटील - कोल्हापूर -पैसा टाका आणि झटपट यश मिळवा, या आमिषापोटी तरुण-तरुणींच्यामध्ये स्पर्धा वाढली असून, त्यामध्ये अपयश आल्यास ते आत्महत्येकडे वळतात, असा निष्कर्ष तज्ज्ञांच्या अभ्यासामधून पुढे येत आहे. अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामध्ये युवावर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. नवविवाहिता, शाळकरी मुले, तरुण शेतकरी, उच्चशिक्षित नोकरदारवर्गही याला अपवाद नाही. ‘आत्महत्या’ हा चिंतेचा प्रश्न समाजासमोर बनला असून, वर्षभरात सरासरी ४० आत्महत्या पोलीस दप्तरी नोंद झाल्या आहेत. आजकाल प्रसारमाध्यमे आणि सुलभ देवाण-घेवाणीमुळे कॉलेज तरुण-तरुणींमध्ये एकवेगळ्या प्रकाराचे वातावरण निर्माण झालेले दिसते. पुस्तकांपेक्षा ते मोबाईलवर चॅटिंग करण्यात धन्यता मानतात आणि त्यातूनचे मैत्री, प्रेम वाढत जाते आणि नको इतक्या प्रमाणात ते स्वत:ला वाहून घेतात. त्यातूनच एकतर्फी प्रेमाचा किंवा घरच्यांचा विरोध अशा गोष्टींमुळे तरुण-तरुणी निराशेत जातात आणि आत्महत्येकडे वळतात. उच्चशिक्षित युवकांचेही आत्महत्येचे प्रमाण तितक्याच प्रमाणात वाढत आहे. काही युवक स्वाभिमान दुखावल्याच्या नैराश्येतून टोकाची भूमिका घेतात, तर काही व्यवसायात, नोकरीत थोड्याश्या आलेल्या अपयशानेही स्वत:चे जीवन संपवितात. सध्या इंटरनेटचे युग असल्याने प्रत्येक गोष्ट हायटेक बनत चालली आहे. मोबाईल, व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, टीव्ही चॅनेल, आदींच्या वापरामुळे जीवनही तितक्याच गतीने चालले आहे, अशी भावना प्रत्येक व्यक्तीत निर्माण होत आहे.नवविवाहितेच्या आत्महत्येचे कारण शोधले असता सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशांची मागणी, त्याचबरोबर शिक्षणामुळे वाढलेल्या त्यांच्या अपेक्षा त्यांची पूर्तता न झाल्याने आलेले नैराश्य आणि अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात. समज येण्याच्या अगोदरच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजकालच्या मुलांच्यामध्ये तीव्र बनला आहे. आयुष्य म्हणजे फक्त मजामस्ती आणि आनंद उपभोगणे एवढेच त्यांना माहितीआहे. त्यासोबत काही जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि कष्ट असते याची कल्पनाच नसते. त्यामध्ये पालकही त्यांना त्या जबाबदारीची जाणीव करून देताना दिसत नाहीत. वर्षभरात--४० आत्महत्यापालकही हतबललहान मुलांपासून ते महाविद्यालयीन युवकांच्या स्वभावामध्ये आयुष्याबद्दल एक न्यूनगंड तयार झाला आहे. मग त्यात आई-वडील अभ्यास कर म्हटले अथवा एखादी चैनीची गोष्ट द्यायला नकार दिला, तर ती मुले किंवा तरुण घरातून पळून जाण्यापासून आत्महत्येपर्यंतचा विचार करतात. त्यामुळे आजकालचे पालक मुलांना समजवायला किंवा बोलायला घाबरतात आणि हा एक जागतिक प्रश्न बनत चालला आहे, की मुलांवर संस्कार करायचे तरी कसे ? त्यामुळे पालक हतबल झाले आहेत. युवक-युवतींना सध्या भौतिक सुखाचा हव्यास मोठ्या प्रमाणात जडला आहे. सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी कशा हाताळल्या पाहिजे याचे ज्ञान नाही. स्वत:च्या भावनांना आवर घालण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. त्यामुळे भावनिक बुद्धांक कमी झाल्याने त्यांच्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यांची क्षमता वाढविण्यामध्ये प्रौढवर्ग कमी पडत आहे. - डॉ. शुभदा दिवाण, समुपदेशक जीवन हे प्रत्येकासाठी अनमोल आहे. जीवनामध्ये एखादे अपयश किंवा नैराश्य आले तरी खचून न जाता येणारा दिवस आपला आहे, असे समजून ओढावलेल्या संकटांवर मात करायला शिकले पाहिजे. आत्महत्येच्या पर्यायाने सगळे प्रश्न सुटतात असे नाही, तर ते वाढतात व गुंतागुंतीचे बनतात आणि आपल्याच कुटुंबाला त्याचा आयुष्यभर त्रास होतो. - प्रणाली प्रवीण पाटील (कोडोली) संशय, संपत्ती, अपेक्षाभंग ठरते कारणनवविवाहितेच्या आत्महत्येचे कारण शोधले असता सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशांची मागणी, त्याचबरोबर शिक्षणामुळे वाढलेल्या त्यांच्या अपेक्षा त्यांची पूर्तता न झाल्याने आलेले नैराश्य आणि अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात.