शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

अपयशाचा मार्ग जातोय मृत्यूच्या दारात

By admin | Updated: January 21, 2015 23:15 IST

वर्षभरात सरासरी ४० पेक्षा जास्त आत्महत्या : जाच, मनाविरुद्ध होणाऱ्या घटनामुळे शेवट; सामाजिकदृष्ट्या चिंताजनक

एकनाथ पाटील - कोल्हापूर -पैसा टाका आणि झटपट यश मिळवा, या आमिषापोटी तरुण-तरुणींच्यामध्ये स्पर्धा वाढली असून, त्यामध्ये अपयश आल्यास ते आत्महत्येकडे वळतात, असा निष्कर्ष तज्ज्ञांच्या अभ्यासामधून पुढे येत आहे. अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामध्ये युवावर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. नवविवाहिता, शाळकरी मुले, तरुण शेतकरी, उच्चशिक्षित नोकरदारवर्गही याला अपवाद नाही. ‘आत्महत्या’ हा चिंतेचा प्रश्न समाजासमोर बनला असून, वर्षभरात सरासरी ४० आत्महत्या पोलीस दप्तरी नोंद झाल्या आहेत. आजकाल प्रसारमाध्यमे आणि सुलभ देवाण-घेवाणीमुळे कॉलेज तरुण-तरुणींमध्ये एकवेगळ्या प्रकाराचे वातावरण निर्माण झालेले दिसते. पुस्तकांपेक्षा ते मोबाईलवर चॅटिंग करण्यात धन्यता मानतात आणि त्यातूनचे मैत्री, प्रेम वाढत जाते आणि नको इतक्या प्रमाणात ते स्वत:ला वाहून घेतात. त्यातूनच एकतर्फी प्रेमाचा किंवा घरच्यांचा विरोध अशा गोष्टींमुळे तरुण-तरुणी निराशेत जातात आणि आत्महत्येकडे वळतात. उच्चशिक्षित युवकांचेही आत्महत्येचे प्रमाण तितक्याच प्रमाणात वाढत आहे. काही युवक स्वाभिमान दुखावल्याच्या नैराश्येतून टोकाची भूमिका घेतात, तर काही व्यवसायात, नोकरीत थोड्याश्या आलेल्या अपयशानेही स्वत:चे जीवन संपवितात. सध्या इंटरनेटचे युग असल्याने प्रत्येक गोष्ट हायटेक बनत चालली आहे. मोबाईल, व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, टीव्ही चॅनेल, आदींच्या वापरामुळे जीवनही तितक्याच गतीने चालले आहे, अशी भावना प्रत्येक व्यक्तीत निर्माण होत आहे.नवविवाहितेच्या आत्महत्येचे कारण शोधले असता सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशांची मागणी, त्याचबरोबर शिक्षणामुळे वाढलेल्या त्यांच्या अपेक्षा त्यांची पूर्तता न झाल्याने आलेले नैराश्य आणि अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात. समज येण्याच्या अगोदरच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजकालच्या मुलांच्यामध्ये तीव्र बनला आहे. आयुष्य म्हणजे फक्त मजामस्ती आणि आनंद उपभोगणे एवढेच त्यांना माहितीआहे. त्यासोबत काही जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि कष्ट असते याची कल्पनाच नसते. त्यामध्ये पालकही त्यांना त्या जबाबदारीची जाणीव करून देताना दिसत नाहीत. वर्षभरात--४० आत्महत्यापालकही हतबललहान मुलांपासून ते महाविद्यालयीन युवकांच्या स्वभावामध्ये आयुष्याबद्दल एक न्यूनगंड तयार झाला आहे. मग त्यात आई-वडील अभ्यास कर म्हटले अथवा एखादी चैनीची गोष्ट द्यायला नकार दिला, तर ती मुले किंवा तरुण घरातून पळून जाण्यापासून आत्महत्येपर्यंतचा विचार करतात. त्यामुळे आजकालचे पालक मुलांना समजवायला किंवा बोलायला घाबरतात आणि हा एक जागतिक प्रश्न बनत चालला आहे, की मुलांवर संस्कार करायचे तरी कसे ? त्यामुळे पालक हतबल झाले आहेत. युवक-युवतींना सध्या भौतिक सुखाचा हव्यास मोठ्या प्रमाणात जडला आहे. सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी कशा हाताळल्या पाहिजे याचे ज्ञान नाही. स्वत:च्या भावनांना आवर घालण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. त्यामुळे भावनिक बुद्धांक कमी झाल्याने त्यांच्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यांची क्षमता वाढविण्यामध्ये प्रौढवर्ग कमी पडत आहे. - डॉ. शुभदा दिवाण, समुपदेशक जीवन हे प्रत्येकासाठी अनमोल आहे. जीवनामध्ये एखादे अपयश किंवा नैराश्य आले तरी खचून न जाता येणारा दिवस आपला आहे, असे समजून ओढावलेल्या संकटांवर मात करायला शिकले पाहिजे. आत्महत्येच्या पर्यायाने सगळे प्रश्न सुटतात असे नाही, तर ते वाढतात व गुंतागुंतीचे बनतात आणि आपल्याच कुटुंबाला त्याचा आयुष्यभर त्रास होतो. - प्रणाली प्रवीण पाटील (कोडोली) संशय, संपत्ती, अपेक्षाभंग ठरते कारणनवविवाहितेच्या आत्महत्येचे कारण शोधले असता सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशांची मागणी, त्याचबरोबर शिक्षणामुळे वाढलेल्या त्यांच्या अपेक्षा त्यांची पूर्तता न झाल्याने आलेले नैराश्य आणि अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात.