शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

पाऊस जास्त पडल्याने खड्डे अधिक

By admin | Updated: October 20, 2016 05:56 IST

पावसाळी दिवस वाढल्यामुळे खड्डे अधिक वाढल्याचा आयुक्त अजय मेहता यांचा दावा, सर्वपक्षीय स्थायी समिती सदस्यांनी आज निमूट मान्य केला.

मुंबई : पावसाळी दिवस वाढल्यामुळे खड्डे अधिक वाढल्याचा आयुक्त अजय मेहता यांचा दावा, सर्वपक्षीय स्थायी समिती सदस्यांनी आज निमूट मान्य केला. यामुळे खड्ड्यांवरून सुरू असलेले रस्त्यावरील राजकीय आंदोलन म्हणजे, निवडणुकीची तयारीच असल्याचे बोलले जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात जाते. यंदा मात्र, रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट आहे. त्यात पुढचे वर्ष निवडणुकीचे असल्याने, राजकीय पक्षांसाठी खड्डे हाच ज्वलंत विषय ठरला आहे. पावसाळा थांबला, तरी खड्डे कायम असल्याने आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याची तयारी विरोधी पक्षांच्या मदतीने शिवसेनेने सुरू केली होती. मात्र, आयुक्तांनी कामाची पाहणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला माघार घ्यावी लागली आहे. मात्र, खड्डेप्रकरणी स्थायी समितीमध्ये निवेदन करताना आयुक्तांनी आपल्या बचावाचा मार्ग मोकळा केला. मुंबईत १ ते १० आॅक्टोबरपर्यंत पाऊस असल्याने खड्डे भरता आले नाहीत. असा बचाव आयुक्तांनी केला. (प्रतिनिधी)>असा सुरू झाला खड्ड्यांचा वाद मुंबईचे रस्ते खड्ड्यात असताना प्रशासनाच्या हास्यास्पद आकडेवारीने नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. मुंबईत केवळ ३५ खड्डे असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केल्यामुळे, सर्वच स्तरातून नाराजीचे सूर उमटू लागले. मुंबईतील खड्डे अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी मनसेने रस्ते विभागाच्या प्रमुख अभियंत्याच्या हातात, ‘मी या खड्ड्यांसाठी जबाबदार’ असल्याचे फलक देऊन रस्त्यावर उभे केले. याच्या निषेधार्थ अभियंत्यांनी काम बंद आंदोलन पुकारले.