शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

पक्ष वेगळे; भागीदारी एकत्रच

By admin | Updated: July 10, 2017 01:55 IST

नागरिकांचे काम असेल, तर ‘आम्ही सत्तेत नाही, सत्ताधारी पक्ष वेगळा आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : नागरिकांचे काम असेल, तर ‘आम्ही सत्तेत नाही, सत्ताधारी पक्ष वेगळा आहे’, तुम्ही त्यांना संधी दिली आता घ्या अनुभव असे सांगून जनतेच्या प्रश्नावर वेळकाढू भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षाच्या अनेक पदाधिकारी, आणि नगरसेवकांचे भागीदारीत व्यवसाय आहेत. त्यांची वैयक्तिक कामे, व्यावसायिक स्तरावरील कामे अडचणीत आल्याचे निदर्शनास येत नाही. त्यांचे पक्ष जरी वेगवेगळे असले, तरी धंदे, व्यवसाय एकच आहेत. हे वास्तव पिंपरी-चिंचवडमध्ये पहावयास मिळते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेले. भाजपातील त्यांचा प्रवेश हा केवळ राजकीय अभिलाषेपोटी झालेला नाही, तर त्यांच्या अवैध व्यवसायाला सत्ताबदलाचा फटका बसू नये, हा त्यामागील मूळ उद्देश आहे. सत्ता बदलल्यानंतर व्यावसायिक स्तरावर होणारा त्रास टाळण्यासाठी आणि व्यवसायाला संरक्षण मिळावे, यासाठी काहींनी भाजपाशी घरोबा केला आहे. एवढेच नव्हे, तर काही वर्षांपूर्वी एकाच पक्षात असताना कोणी हॉटेल, तर कोणी बांधकाम व्यवसायात भागीदारी केली. निवडणूक काळात त्यांचे राजकीय पक्ष बदलले. राजकीय व्यासपीठावर सत्ताधारी आणि विरोधक असे त्यांचे संबंध असले, तरी इतर वेळी ते व्यावसायिक म्हणून एकमेकाला साथ देतात. त्यामुळे विरोधी पक्षात काम करणारे पदाधिकारी महापालिकेत आक्रमक पद्धतीने विरोधाची भूिमका मांडताना दिसून येत नाहीत. धंदा, व्यवसायात त्यांचे साटेलोटे असल्याने त्यांच्या कोणत्याच कामात अडचण येत नाही. त्यांना नागरिकांची कामे करण्यासाठी मात्र अडचण येते. विरोधी पक्षाकडून आक्रमकता नाहीराष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी यांचे भागीदारीत व्यवसाय आहेत. कोणाची बांधकाम व्यवसायात, तर कोणाची हॉटेल, बार अशा व्यवसायात भागीदारी आहे. परिणामी महापालिकेत विरोधी पक्षात काम करणाऱ्यांची आक्रमकता दिसून येत नाही. सत्तेशिवायही होताहेत कामेनागरिकांनी त्यांची सार्वजनिक स्वरूपाची कामे सांगितल्यास सत्तेत नसल्यामुळे कामे करण्यास अडचणी येतात, असे सांगून अनेकदा तगाद्यातून ते सोडवणूक करून घेतात. त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे करण्यासाठी पक्षाची सत्ता येऊ द्या, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर कधी येत नाही. नागरिकांची कामे करायची तर सत्ताच असली पाहिजे ही सबब नागरिकांचे समाधान करणारी नाही. सत्ताधारी वगळता अन्य कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक असले, तरी त्यांची कामे होत असतील, तर नागरिकांचीही कामे होणे अपेक्षित आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.