शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

पक्ष वेगळे; भागीदारी एकत्रच

By admin | Updated: July 10, 2017 01:55 IST

नागरिकांचे काम असेल, तर ‘आम्ही सत्तेत नाही, सत्ताधारी पक्ष वेगळा आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : नागरिकांचे काम असेल, तर ‘आम्ही सत्तेत नाही, सत्ताधारी पक्ष वेगळा आहे’, तुम्ही त्यांना संधी दिली आता घ्या अनुभव असे सांगून जनतेच्या प्रश्नावर वेळकाढू भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षाच्या अनेक पदाधिकारी, आणि नगरसेवकांचे भागीदारीत व्यवसाय आहेत. त्यांची वैयक्तिक कामे, व्यावसायिक स्तरावरील कामे अडचणीत आल्याचे निदर्शनास येत नाही. त्यांचे पक्ष जरी वेगवेगळे असले, तरी धंदे, व्यवसाय एकच आहेत. हे वास्तव पिंपरी-चिंचवडमध्ये पहावयास मिळते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेले. भाजपातील त्यांचा प्रवेश हा केवळ राजकीय अभिलाषेपोटी झालेला नाही, तर त्यांच्या अवैध व्यवसायाला सत्ताबदलाचा फटका बसू नये, हा त्यामागील मूळ उद्देश आहे. सत्ता बदलल्यानंतर व्यावसायिक स्तरावर होणारा त्रास टाळण्यासाठी आणि व्यवसायाला संरक्षण मिळावे, यासाठी काहींनी भाजपाशी घरोबा केला आहे. एवढेच नव्हे, तर काही वर्षांपूर्वी एकाच पक्षात असताना कोणी हॉटेल, तर कोणी बांधकाम व्यवसायात भागीदारी केली. निवडणूक काळात त्यांचे राजकीय पक्ष बदलले. राजकीय व्यासपीठावर सत्ताधारी आणि विरोधक असे त्यांचे संबंध असले, तरी इतर वेळी ते व्यावसायिक म्हणून एकमेकाला साथ देतात. त्यामुळे विरोधी पक्षात काम करणारे पदाधिकारी महापालिकेत आक्रमक पद्धतीने विरोधाची भूिमका मांडताना दिसून येत नाहीत. धंदा, व्यवसायात त्यांचे साटेलोटे असल्याने त्यांच्या कोणत्याच कामात अडचण येत नाही. त्यांना नागरिकांची कामे करण्यासाठी मात्र अडचण येते. विरोधी पक्षाकडून आक्रमकता नाहीराष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी यांचे भागीदारीत व्यवसाय आहेत. कोणाची बांधकाम व्यवसायात, तर कोणाची हॉटेल, बार अशा व्यवसायात भागीदारी आहे. परिणामी महापालिकेत विरोधी पक्षात काम करणाऱ्यांची आक्रमकता दिसून येत नाही. सत्तेशिवायही होताहेत कामेनागरिकांनी त्यांची सार्वजनिक स्वरूपाची कामे सांगितल्यास सत्तेत नसल्यामुळे कामे करण्यास अडचणी येतात, असे सांगून अनेकदा तगाद्यातून ते सोडवणूक करून घेतात. त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे करण्यासाठी पक्षाची सत्ता येऊ द्या, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर कधी येत नाही. नागरिकांची कामे करायची तर सत्ताच असली पाहिजे ही सबब नागरिकांचे समाधान करणारी नाही. सत्ताधारी वगळता अन्य कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक असले, तरी त्यांची कामे होत असतील, तर नागरिकांचीही कामे होणे अपेक्षित आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.