शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

मुंबई-नागपूर महामार्गासाठी जमीन देणाऱ्यांना भागीदारी

By admin | Updated: July 6, 2016 01:46 IST

प्रस्तावित मुंबई नागपूर कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस वेचे नामकरण ‘महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे करण्यात आले असून ज्यांच्या जमिनी या महामार्गासाठी जातील त्यांना पर्यायी

मुंबई : प्रस्तावित मुंबई नागपूर कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस वेचे नामकरण ‘महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे करण्यात आले असून ज्यांच्या जमिनी या महामार्गासाठी जातील त्यांना पर्यायी विकसित जमीन आणि वार्षिक अनुदान देण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. नियोजित राजधानी अमरावतीसाठी आंध्र प्रदेश सरकार जो फॉर्म्यूला राबविणार आहे, त्यापेक्षा जास्त वार्षिक अनुदान या समृद्धी महामार्गासाठी देण्यात येणार आहे. या महामार्गावर २४ टाऊनशिप उभारण्यात येणार असून ती कृषी समृद्धी केंद्रे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. हा महामार्ग राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक व कोकण या पाच महसूल विभागांतील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक व ठाणे या दहा जिल्ह्यांतील २७ तालुक्यांमधील ३५० गावांमधून जाणार आहे. नागपूर ते भिवंडीपर्यंतच्या ७१० किलोमीटर अंतरापर्यंतच्या या नियोजित मार्गाची आखणी प्रामुख्याने जास्त लोकवस्ती, बागायती जमीन, मोठी धरणे, वनजमिनी, जलाशये आणि जंगले टाळून करण्यात आलेली आहे. या मार्गाची रुंदी १२० मीटर एवढी प्रशस्त असल्याने निव्वळ रस्त्यांसाठी नऊ हजार हेक्टर आणि त्याच्या जोडरस्त्यांसाठी एक हजार हेक्टर याप्रमाणे एकूण १० हजार हेक्टर जमीन आवश्यक आहे. या महामार्गाचे बांधकाम आणि त्यावरील २४ टाऊनशिपची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास नवनगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा महामार्ग राज्याच्या विकासाचा गेमचेंजर असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)असे असेल पॅकेज- या महामार्गासाठी ज्यांची जिरायती शेती गेली त्यांना शेतीच्या २५ टक्के जमीन ही जवळच्या टाऊनशिपमध्ये मिळेल. - ज्यांची बागायती शेती जाणार त्यांना टाऊनशिपमध्ये ३० टक्के विकसित जमीन दिली जाईल. टाऊनशिपसाठी ज्यांची जमीन संपादित केली जाईल त्यांनाही त्यांच्या जमिनीच्या ३० टक्के विकसित केलेली जमीन मिळेल.- जिरायती शेतीमालकांना पहिल्या वर्षी ५० हजार रुपये वार्षिक अनुदान दिले जाईल. त्यात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात येणार असून हे अनुदान १० वर्षांपर्यंत दिले जाईल.- बागायती व टाऊनशिपमध्ये ज्यांची जमीन जाईल त्यांना पहिल्या वर्षी एक लाख रुपये वार्षिक अनुदान दिले जाईल व त्यात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात येणार आहे. हे अनुदान १० वर्षांपर्यंत दिले जाईल.- टाऊनशिपमधील जमिनीस अपेक्षित बाजारमूल्य न मिळाल्यास ती शासनाकडून बाजारमूल्याने खरेदी करण्यात येणार आहे.