शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नागपूर महामार्गासाठी जमीन देणाऱ्यांना भागीदारी

By admin | Updated: July 6, 2016 01:46 IST

प्रस्तावित मुंबई नागपूर कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस वेचे नामकरण ‘महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे करण्यात आले असून ज्यांच्या जमिनी या महामार्गासाठी जातील त्यांना पर्यायी

मुंबई : प्रस्तावित मुंबई नागपूर कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस वेचे नामकरण ‘महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे करण्यात आले असून ज्यांच्या जमिनी या महामार्गासाठी जातील त्यांना पर्यायी विकसित जमीन आणि वार्षिक अनुदान देण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. नियोजित राजधानी अमरावतीसाठी आंध्र प्रदेश सरकार जो फॉर्म्यूला राबविणार आहे, त्यापेक्षा जास्त वार्षिक अनुदान या समृद्धी महामार्गासाठी देण्यात येणार आहे. या महामार्गावर २४ टाऊनशिप उभारण्यात येणार असून ती कृषी समृद्धी केंद्रे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. हा महामार्ग राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक व कोकण या पाच महसूल विभागांतील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक व ठाणे या दहा जिल्ह्यांतील २७ तालुक्यांमधील ३५० गावांमधून जाणार आहे. नागपूर ते भिवंडीपर्यंतच्या ७१० किलोमीटर अंतरापर्यंतच्या या नियोजित मार्गाची आखणी प्रामुख्याने जास्त लोकवस्ती, बागायती जमीन, मोठी धरणे, वनजमिनी, जलाशये आणि जंगले टाळून करण्यात आलेली आहे. या मार्गाची रुंदी १२० मीटर एवढी प्रशस्त असल्याने निव्वळ रस्त्यांसाठी नऊ हजार हेक्टर आणि त्याच्या जोडरस्त्यांसाठी एक हजार हेक्टर याप्रमाणे एकूण १० हजार हेक्टर जमीन आवश्यक आहे. या महामार्गाचे बांधकाम आणि त्यावरील २४ टाऊनशिपची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास नवनगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा महामार्ग राज्याच्या विकासाचा गेमचेंजर असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)असे असेल पॅकेज- या महामार्गासाठी ज्यांची जिरायती शेती गेली त्यांना शेतीच्या २५ टक्के जमीन ही जवळच्या टाऊनशिपमध्ये मिळेल. - ज्यांची बागायती शेती जाणार त्यांना टाऊनशिपमध्ये ३० टक्के विकसित जमीन दिली जाईल. टाऊनशिपसाठी ज्यांची जमीन संपादित केली जाईल त्यांनाही त्यांच्या जमिनीच्या ३० टक्के विकसित केलेली जमीन मिळेल.- जिरायती शेतीमालकांना पहिल्या वर्षी ५० हजार रुपये वार्षिक अनुदान दिले जाईल. त्यात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात येणार असून हे अनुदान १० वर्षांपर्यंत दिले जाईल.- बागायती व टाऊनशिपमध्ये ज्यांची जमीन जाईल त्यांना पहिल्या वर्षी एक लाख रुपये वार्षिक अनुदान दिले जाईल व त्यात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात येणार आहे. हे अनुदान १० वर्षांपर्यंत दिले जाईल.- टाऊनशिपमधील जमिनीस अपेक्षित बाजारमूल्य न मिळाल्यास ती शासनाकडून बाजारमूल्याने खरेदी करण्यात येणार आहे.