शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जमीन हडपण्याच्या गुन्ह्यातही महाठगाचा सहभाग

By admin | Updated: October 3, 2016 05:24 IST

बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्ता हडपण्याचे गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मुंबई : मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झालेला महाठग मोहनप्रसाद श्रीवास्तव याने यापूर्वी बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्ता हडपण्याचे गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे अशाच एका गंभीर गुन्ह्यात श्रीवास्तव याला आर्थिक गुन्हे विभागाने अटकही केली होती.सुजीत मंडळ यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, मालाड (पूर्व) येथील कुरार गावातील एक भूखंड त्यांचे वडील अभय मंडळ यांनी १९९0 साली एफ. ई. दिनशा ट्रस्टकडून खरेदी केला होता. त्या खरेदी खताची अभय मंडळ यांनी उपनिबंधकांकडे नोंदणीही केली होती. त्यानुसार जागेच्या सात-बारा उताऱ्यावर अभय मंडळ यांचे नाव आहे. नोव्हेंबर २00४मध्ये अभय मंडळ यांचे निधन झाले. त्यानंतर श्रीवास्तव याने मंडळ कुटुंबीयांशी संपर्क साधून तो भूखंड आपल्या श्री इंटरप्रायझेस या कंपनीने १९९९ साली अभय मंडळ यांच्याकडून खरेदी केला असून, त्या व्यवहाराची उपनिबंधकांकडे नोंदणी केल्याची माहिती दिली.मात्र मंडळ कुटुंबीयांनी तपासणी केली असता श्रीवास्तव याने दाखवलेल्या खरेदी खतावरील अभय मंडळ यांची सही बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून श्रीवास्तव आणि वडाळा येथील इक्बाल कासकर यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे विभागात गुन्हा दाखल करून दोघांना अटकही करण्यात आली होती. पुराव्यादाखल अभय मंडळ यांनी १९८१ साली उपजिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेल्या पत्रावरील त्यांची अस्सल सही सादर करण्यात आली असता आरोपींनी मंडळ कुटुंबीयांची जमीन हडपण्यासाठी खरेदी खतावर बनावट सह्या केल्याचे उघडकीस आले. गुंतवणूकदारांचे सातशे ते एक हजार कोटी रुपये घेऊन पोबारा करणारे मोहनप्रसाद, त्याची पत्नी विभा, मुलगा कार्तिक, मुलगी अर्चिता, सून प्रीती या श्रीवास्तव कुटुंबीय तसेच धर्मेंद्र निकुंभ यांनी केवळ हाच नव्हे, तर असे अनेक गुन्हे केल्याचे दिसत असल्याने त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी; तसेच या प्रकरणाची सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी गुंतवणूकदारांच्या वतीने मुख्यमंंत्र्यांना सादर केले आहे. (प्रतिनिधी)।मुंबईतून फरार झालेले आरोपी श्रीवास्तव व त्याचे कुटुंबीय उत्तर भारतात लपले असून, तेथे त्यांनी मुंबईतील गुंतवणूकदारांकडून लुबाडलेली रक्कम बांधकाम प्रकल्पात गुंतवल्याने ते प्रकल्प बंद करून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे केली आहे.