शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

जमीन हडपण्याच्या गुन्ह्यातही महाठगाचा सहभाग

By admin | Updated: October 3, 2016 05:24 IST

बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्ता हडपण्याचे गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मुंबई : मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झालेला महाठग मोहनप्रसाद श्रीवास्तव याने यापूर्वी बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्ता हडपण्याचे गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे अशाच एका गंभीर गुन्ह्यात श्रीवास्तव याला आर्थिक गुन्हे विभागाने अटकही केली होती.सुजीत मंडळ यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, मालाड (पूर्व) येथील कुरार गावातील एक भूखंड त्यांचे वडील अभय मंडळ यांनी १९९0 साली एफ. ई. दिनशा ट्रस्टकडून खरेदी केला होता. त्या खरेदी खताची अभय मंडळ यांनी उपनिबंधकांकडे नोंदणीही केली होती. त्यानुसार जागेच्या सात-बारा उताऱ्यावर अभय मंडळ यांचे नाव आहे. नोव्हेंबर २00४मध्ये अभय मंडळ यांचे निधन झाले. त्यानंतर श्रीवास्तव याने मंडळ कुटुंबीयांशी संपर्क साधून तो भूखंड आपल्या श्री इंटरप्रायझेस या कंपनीने १९९९ साली अभय मंडळ यांच्याकडून खरेदी केला असून, त्या व्यवहाराची उपनिबंधकांकडे नोंदणी केल्याची माहिती दिली.मात्र मंडळ कुटुंबीयांनी तपासणी केली असता श्रीवास्तव याने दाखवलेल्या खरेदी खतावरील अभय मंडळ यांची सही बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून श्रीवास्तव आणि वडाळा येथील इक्बाल कासकर यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे विभागात गुन्हा दाखल करून दोघांना अटकही करण्यात आली होती. पुराव्यादाखल अभय मंडळ यांनी १९८१ साली उपजिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेल्या पत्रावरील त्यांची अस्सल सही सादर करण्यात आली असता आरोपींनी मंडळ कुटुंबीयांची जमीन हडपण्यासाठी खरेदी खतावर बनावट सह्या केल्याचे उघडकीस आले. गुंतवणूकदारांचे सातशे ते एक हजार कोटी रुपये घेऊन पोबारा करणारे मोहनप्रसाद, त्याची पत्नी विभा, मुलगा कार्तिक, मुलगी अर्चिता, सून प्रीती या श्रीवास्तव कुटुंबीय तसेच धर्मेंद्र निकुंभ यांनी केवळ हाच नव्हे, तर असे अनेक गुन्हे केल्याचे दिसत असल्याने त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी; तसेच या प्रकरणाची सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी गुंतवणूकदारांच्या वतीने मुख्यमंंत्र्यांना सादर केले आहे. (प्रतिनिधी)।मुंबईतून फरार झालेले आरोपी श्रीवास्तव व त्याचे कुटुंबीय उत्तर भारतात लपले असून, तेथे त्यांनी मुंबईतील गुंतवणूकदारांकडून लुबाडलेली रक्कम बांधकाम प्रकल्पात गुंतवल्याने ते प्रकल्प बंद करून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे केली आहे.