शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

‘त्यां’चाही गौरी-गणपती सणात सहभाग

By admin | Updated: September 10, 2016 01:25 IST

तृतीयपंथी असल्यामुळे कायम उपेक्षित जीवन अशा नागरिकांना जगावे लागते.

यवत : तृतीयपंथी असल्यामुळे कायम उपेक्षित जीवन अशा नागरिकांना जगावे लागते. भारतीय संस्कृतीमध्ये जीवनात सर्व धर्मांचे सण-उत्सव साजरे केले जातात. यात तृतीयपंथींना सहभागी होत असताना कायम वेगळा दर्जा मिळतो. मात्र, याला अपवाद ठरत आहे यवत गावातील गौरी-गणपतीचा उत्सव.यवत येथे गणेशोत्सवात सर्व जाती-धर्मांतील सलोखा तर दिसतोच; मात्र त्याचबरोबर मनुष्य असूनदेखील कायम उपेक्षित जीवन जगणारे तृतीयपंथीदेखील त्यांच्या घरात गणपतीबरोबरच गौरीचीदेखील स्थापना करतात. तसेच, त्यांच्या घरी गावातील सर्व महिला हळदी-कुंकवीसाठी जातात. तृतीयपंथी असल्याची कसलीही वेगळी वागणूक गावातील समाजाकडून त्यांना दिली जात नाही.यवतमध्ये अनेक वर्षांपासून तृतीयपंथी लोकांचा मोठा वाडा आहे. येथील वाड्यात राहणाऱ्या प्रत्येक पिढीबरोबर गावातील नागरिकांचे सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. गावातील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसह प्रत्येक सण-उत्सवाबरोबरच सुखदु:खांतदेखील तृतीयपंथी सहभागी होतात. यामुळे त्यांना कसलीही उपेक्षितपणाची भावना वाटत नाही. याउलट, आता नवीन पिढीमध्ये दीपा गुरू दरेकर रंजिता नायर यांनी गावात आणखी दृढ संबंध निर्माण केले आहेत.श्री गणेशाबरोबर तीन दिवस गौरींचे आगमन होते. तृतीयपंथी असलेल्या दीपा गुरू रंजीता नायर, अचल गुरू दीपा, हेमा गुरू दीपा यांनी यंदा गौरी-गणपतीची केलेली आरास खरोखर पाहण्यासारखी व नेत्रदीपक आहे. बळीराजाच्या शेतातील कष्ट करतानाचे प्रतीकात्मक देखाव्याबरोबर त्यांनी घरातील भांड्यांची आकर्षक सजावट केली आहे. दीपा गुरू या २८ वर्षांपासून गौरी-गणपतीची स्थापना करीत आहेत. त्या तीन वर्षांपासून यवतमध्ये वास्तव्यास आल्या असून, तेथेदेखील गौरी-गणपतीबरोबरच सर्वधर्मीय सण साजरे करतात. सर्व उत्सव साजरे करीत असताना गावातील लोकांचे मोठे प्रेम मिळते. यामुळे कसलाही उपेक्षितपणा जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले.>यवतमधील सर्वसमावेशकता असलेला सांस्कृतिक वारसा : यवतमध्ये गणेशोत्सव साजरा केला जात असताना हिंदू-मुस्लिम समाजात सालोख्याचे वातवरण तर असतेच; मात्र संपूर्ण मानवी समाजात उपेक्षित म्हणून वागविल्या जाणाऱ्या तृतीयपंथी समाजाला गावात सर्वसमावेशक वातावरण असते. त्यांच्या घरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गौरी-गणपतीसाठी गावातील सर्वधर्मीय महिला मोठ्या संख्येने जातात. यामुळे गावातील तृतीयपंथी वाड्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण असते.