शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

‘त्यां’चाही गौरी-गणपती सणात सहभाग

By admin | Updated: September 10, 2016 01:25 IST

तृतीयपंथी असल्यामुळे कायम उपेक्षित जीवन अशा नागरिकांना जगावे लागते.

यवत : तृतीयपंथी असल्यामुळे कायम उपेक्षित जीवन अशा नागरिकांना जगावे लागते. भारतीय संस्कृतीमध्ये जीवनात सर्व धर्मांचे सण-उत्सव साजरे केले जातात. यात तृतीयपंथींना सहभागी होत असताना कायम वेगळा दर्जा मिळतो. मात्र, याला अपवाद ठरत आहे यवत गावातील गौरी-गणपतीचा उत्सव.यवत येथे गणेशोत्सवात सर्व जाती-धर्मांतील सलोखा तर दिसतोच; मात्र त्याचबरोबर मनुष्य असूनदेखील कायम उपेक्षित जीवन जगणारे तृतीयपंथीदेखील त्यांच्या घरात गणपतीबरोबरच गौरीचीदेखील स्थापना करतात. तसेच, त्यांच्या घरी गावातील सर्व महिला हळदी-कुंकवीसाठी जातात. तृतीयपंथी असल्याची कसलीही वेगळी वागणूक गावातील समाजाकडून त्यांना दिली जात नाही.यवतमध्ये अनेक वर्षांपासून तृतीयपंथी लोकांचा मोठा वाडा आहे. येथील वाड्यात राहणाऱ्या प्रत्येक पिढीबरोबर गावातील नागरिकांचे सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. गावातील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसह प्रत्येक सण-उत्सवाबरोबरच सुखदु:खांतदेखील तृतीयपंथी सहभागी होतात. यामुळे त्यांना कसलीही उपेक्षितपणाची भावना वाटत नाही. याउलट, आता नवीन पिढीमध्ये दीपा गुरू दरेकर रंजिता नायर यांनी गावात आणखी दृढ संबंध निर्माण केले आहेत.श्री गणेशाबरोबर तीन दिवस गौरींचे आगमन होते. तृतीयपंथी असलेल्या दीपा गुरू रंजीता नायर, अचल गुरू दीपा, हेमा गुरू दीपा यांनी यंदा गौरी-गणपतीची केलेली आरास खरोखर पाहण्यासारखी व नेत्रदीपक आहे. बळीराजाच्या शेतातील कष्ट करतानाचे प्रतीकात्मक देखाव्याबरोबर त्यांनी घरातील भांड्यांची आकर्षक सजावट केली आहे. दीपा गुरू या २८ वर्षांपासून गौरी-गणपतीची स्थापना करीत आहेत. त्या तीन वर्षांपासून यवतमध्ये वास्तव्यास आल्या असून, तेथेदेखील गौरी-गणपतीबरोबरच सर्वधर्मीय सण साजरे करतात. सर्व उत्सव साजरे करीत असताना गावातील लोकांचे मोठे प्रेम मिळते. यामुळे कसलाही उपेक्षितपणा जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले.>यवतमधील सर्वसमावेशकता असलेला सांस्कृतिक वारसा : यवतमध्ये गणेशोत्सव साजरा केला जात असताना हिंदू-मुस्लिम समाजात सालोख्याचे वातवरण तर असतेच; मात्र संपूर्ण मानवी समाजात उपेक्षित म्हणून वागविल्या जाणाऱ्या तृतीयपंथी समाजाला गावात सर्वसमावेशक वातावरण असते. त्यांच्या घरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गौरी-गणपतीसाठी गावातील सर्वधर्मीय महिला मोठ्या संख्येने जातात. यामुळे गावातील तृतीयपंथी वाड्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण असते.