शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यां’चाही गौरी-गणपती सणात सहभाग

By admin | Updated: September 10, 2016 01:25 IST

तृतीयपंथी असल्यामुळे कायम उपेक्षित जीवन अशा नागरिकांना जगावे लागते.

यवत : तृतीयपंथी असल्यामुळे कायम उपेक्षित जीवन अशा नागरिकांना जगावे लागते. भारतीय संस्कृतीमध्ये जीवनात सर्व धर्मांचे सण-उत्सव साजरे केले जातात. यात तृतीयपंथींना सहभागी होत असताना कायम वेगळा दर्जा मिळतो. मात्र, याला अपवाद ठरत आहे यवत गावातील गौरी-गणपतीचा उत्सव.यवत येथे गणेशोत्सवात सर्व जाती-धर्मांतील सलोखा तर दिसतोच; मात्र त्याचबरोबर मनुष्य असूनदेखील कायम उपेक्षित जीवन जगणारे तृतीयपंथीदेखील त्यांच्या घरात गणपतीबरोबरच गौरीचीदेखील स्थापना करतात. तसेच, त्यांच्या घरी गावातील सर्व महिला हळदी-कुंकवीसाठी जातात. तृतीयपंथी असल्याची कसलीही वेगळी वागणूक गावातील समाजाकडून त्यांना दिली जात नाही.यवतमध्ये अनेक वर्षांपासून तृतीयपंथी लोकांचा मोठा वाडा आहे. येथील वाड्यात राहणाऱ्या प्रत्येक पिढीबरोबर गावातील नागरिकांचे सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. गावातील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसह प्रत्येक सण-उत्सवाबरोबरच सुखदु:खांतदेखील तृतीयपंथी सहभागी होतात. यामुळे त्यांना कसलीही उपेक्षितपणाची भावना वाटत नाही. याउलट, आता नवीन पिढीमध्ये दीपा गुरू दरेकर रंजिता नायर यांनी गावात आणखी दृढ संबंध निर्माण केले आहेत.श्री गणेशाबरोबर तीन दिवस गौरींचे आगमन होते. तृतीयपंथी असलेल्या दीपा गुरू रंजीता नायर, अचल गुरू दीपा, हेमा गुरू दीपा यांनी यंदा गौरी-गणपतीची केलेली आरास खरोखर पाहण्यासारखी व नेत्रदीपक आहे. बळीराजाच्या शेतातील कष्ट करतानाचे प्रतीकात्मक देखाव्याबरोबर त्यांनी घरातील भांड्यांची आकर्षक सजावट केली आहे. दीपा गुरू या २८ वर्षांपासून गौरी-गणपतीची स्थापना करीत आहेत. त्या तीन वर्षांपासून यवतमध्ये वास्तव्यास आल्या असून, तेथेदेखील गौरी-गणपतीबरोबरच सर्वधर्मीय सण साजरे करतात. सर्व उत्सव साजरे करीत असताना गावातील लोकांचे मोठे प्रेम मिळते. यामुळे कसलाही उपेक्षितपणा जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले.>यवतमधील सर्वसमावेशकता असलेला सांस्कृतिक वारसा : यवतमध्ये गणेशोत्सव साजरा केला जात असताना हिंदू-मुस्लिम समाजात सालोख्याचे वातवरण तर असतेच; मात्र संपूर्ण मानवी समाजात उपेक्षित म्हणून वागविल्या जाणाऱ्या तृतीयपंथी समाजाला गावात सर्वसमावेशक वातावरण असते. त्यांच्या घरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गौरी-गणपतीसाठी गावातील सर्वधर्मीय महिला मोठ्या संख्येने जातात. यामुळे गावातील तृतीयपंथी वाड्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण असते.