शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मुलांची हत्या करून आई-वडिलांची आत्महत्या

By admin | Updated: April 23, 2015 02:16 IST

अकोल्यातील घटना : शेतकरी कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; गूढ कायम.

पातूर/ शिर्ला/खानापूर (जि. अकोला) : पातूर तालुक्यातील आस्टुल येथील एका शेतकरी कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह मंगळवारी शेतात आढळून आले. मुलांची हत्या करून आई-वडिलांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन मुलींचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले असले तरी, इतर मृत्यूंचे गूढ कायम आहे. शेतकरी संजय पूर्णाजी इंगळे (वय ४५), त्यांची पत्नी मनीषा (३५), मुलगी ऐश्‍वर्या (१९), मयूरी (१७) आणि मुलगा रोशन (१५) असे मृतांचे नाव आहे. संजय इंगळे यांनी वडिलोपार्जित ३५ एकर बागायती शेतीमध्ये संत्र्याची बाग आणि भुईमूग पेरला होता. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे कुटुंबातील सदस्य दररोज शेतात जायचे. मंगळवारी सकाळी पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांना नेहमीप्रमाणे शेतात पिकांना पाणी देण्यासाठी मोटारसायकलने जाताना ग्रामस्थांनी पाहिले. त्यांचा हा नित्यक्रम असल्याने कुणालाही शंका आली नाही. त्यानंतर सकाळी गावातील एक मुलगा शेताकडे पिकांना पाणी देण्यासाठी गेला असता, त्याला पाच जणांचे मृतदेह आढळून आले. पाच जणांपैकी तिघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतल्याच्या स्थितीत, तर दोन मुलींचे मृतदेह शेतात पडलेले आढळले. नवव्या वर्गात शिकणार्‍या रोशनचा मृतदेह जमिनीवरून हात पुरेल एवढय़ा अंतरावरील फांदीला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. मयूरीचा ओढणीने गळा आवळलेला आढळून आला, तर दुसरी मुलगी ऐश्‍वर्यालाही गळा दाबून ठार केल्याचे दिसून येत होते. आंब्याच्या दुसर्‍या झाडाला पती-पत्नीचे मृतदेह लटकलेले होते. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतांवर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान , पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना यांनी दोन मुलींचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात नमूद झाले असल्याचे सांगीतले. इतर तिघांचा गळफासामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते. पोलीस सर्वच बाजूंनी तपास करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*आजीमुळे स्नेहा बचावली

      संजय इंगळे यांचे वडील पूर्णाजी इंगळे अकोला येथे राहतात. संजय यांना तीन मुली होत्या. त्यांच्यासह मुलगा शिक्षणासाठी आजोबांकडेच राहत होता. १४ एप्रिलला भीमजंयतीनिमित्त दोन मुली व मुलगा आस्टुलला आले होते. मुलगी स्नेहा मात्र आजीची तब्येत बरोबर नसल्याने गावी आली नाही. त्यामुळे तिचे प्राण वाचले.

*घटनेमागे संपत्तीचा वाद?

       संजय इंगळे यांच्यासह कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचे कारण गूढ आहे. सकृतदर्शनी दोन मुलींच्या हत्येनंतर आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. तथापि, या घटनेमागे संपत्तीच्या वादासह इतर काही कारणं आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत.