शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात श्रीमंतीमध्ये ‘पनवेल’ प्रथम

By admin | Updated: March 6, 2016 02:01 IST

रायगड जिल्ह्यात सर्वात श्रीमंत व भौतिक सुविधा उत्तम असणारा तालुका म्हणून पनवेलची ओळख निर्माण झाली आहे. येथील ८४,७१३ कुटुंबीयांकडे स्वत:चे वाहन, २५,०३१ जणांकडे संगणक व लॅपटॉप आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईरायगड जिल्ह्यात सर्वात श्रीमंत व भौतिक सुविधा उत्तम असणारा तालुका म्हणून पनवेलची ओळख निर्माण झाली आहे. येथील ८४,७१३ कुटुंबीयांकडे स्वत:चे वाहन, २५,०३१ जणांकडे संगणक व लॅपटॉप आहे. १,१७,३६५ नागरिक मोबाइल वापरत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.देशातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र म्हणून पनवेलची ओळख निर्माण होऊ लागली आहे. दक्षिण नवी मुंबई परिसरात येणाऱ्या या तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. मेट्रो रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात आहे. नैना परिसरामध्ये २७० गावांचा व त्या परिसराचा विकास होणार आहे. मुंबईतील प्रमुख रेल्वे टर्मिनलही या ठिकाणी आहे. वर्तमान स्थितीमधील सुविधा व भविष्याचा वेध घेऊन अनेक नागरिक घर खरेदीसाठी पनवेलला प्राधान्य देवू लागले आहेत. यामुळेच या परिसरामधील नागरिकांचा आर्थिक स्तर रायगड जिल्ह्यात सर्वात चांगला आहे. शासनाने केलेल्या आर्थिक सामाजिक सर्वेक्षणामध्येही हा तालुका सर्वच भौतिक सुविधांमध्ये सर्वोत्तम आहे. जिल्ह्यात ५,९६,५१४ कुटुंब आहेत. यामधील ३,९१,६०३ कुटुंबीयांकडे बँक खाते आहे. यामध्ये पनवेलमधील १,३२,५५७ कुटुंबांचा समावेश आहे. पूर्ण जिल्ह्यात ६२% घरांमध्ये टीव्ही आहे. पनवेलमध्ये हेच प्रमाण ८० % आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये ९.६८% नागरिकांकडे लॅपटॉप व संगणक आहेत. पनवेलमध्ये हे प्रमाण १५ % आहे.जिल्ह्यामध्ये मोबाइल मोटारसायकल व स्वत:ची कार असणाऱ्या नागरिकांमध्येही पनवेलकरांचा पहिला क्रमांक आहे. देशामध्ये झपाट्याने आर्थिक व सामाजिक स्तर वाढणाऱ्या शहरांमध्ये पनवेलचा समावेश होऊ लागला आहे. देशातील उच्च शिक्षणाचे देशातील महत्त्वाचे केंद्र या ठिकाणी आहे. ठाणे - बेलापूरसह तळोजा औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. ५० टक्के नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बांधकाम व्यवसायामुळे रोजगार उपलब्ध होत आहे. मुंबई, नवी मुंबई व ठाणेच्या तुलनेमध्ये घरांच्या किमती नियंत्रणामध्ये आहेत. यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांना पनवेल आवडू लागले आहे. एकेकाळी पनवेल ही कोकणामधील प्रमुख बाजारपेठ होती. प्रस्तावित विमानतळ नयना क्षेत्र यामुळे पनवेलला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ लागले आहे.नागरिकांचा वैयक्तिक स्तर वाढत असला तरी सामाजिक विकासाचा स्तर त्या प्रमाणात वाढत नाही. प्रत्येक नागरिकाच्या हातात मोबाइल आला आहे. घरात टीव्ही, फ्रीज, संगणक, लॅपटॉप, मोटारसायकल, कार, बँक बॅलन्स वाढला आहे. परंतु येथील नागरिकांना श्वास घेण्यासाठी प्रदूषणमुक्त वातावरण या परिसरामध्ये नाही. परिसरातील नागरिकांसाठी चांगली उद्याने नाहीत, प्रत्येक नोडमध्ये अधिकृत मार्केट नाही, मुलांना खेळण्यासाठी चांगली मैदाने नाहीत, वाहने उदंड झाली पण ती उभी करण्यासाठी वाहनतळ नाही, नागरिकांना स्वस्त उपचार देण्यासाठी आरोग्य व्यवस्थाही नाही, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे, खारफुटी नष्ट केली जात आहे. गाढी नदीचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न सुुरू आहे. नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त होऊलागले आहे. भविष्याचा वेध घेऊन पाणी, घनकचरा व्यवस्थापन, अत्याधुनिक मलनिस्सारण केंद्र याविषयी ठोस योजना राबविल्या जात नाहीत. यामुळे भौतिक प्रगती जिल्ह्यात सर्वात जास्त असली तरी सार्वजनिक सुविधा मात्र अद्याप अद्ययावत झालेल्या नाहीत.