शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

पानसरे कुटुंबाची याचिका फेटाळली

By admin | Updated: May 13, 2016 04:48 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अजून सुरू असताना संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याच्यावरील दोषारोपपत्र दाखल करण्याची घाई करू नये,

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अजून सुरू असताना संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याच्यावरील दोषारोपपत्र दाखल करण्याची घाई करू नये, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दाखल करून घेण्यास नकार दिला. यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही व्हावी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायाधीश पिंकी घोष आणि अमित्व रॉय यांच्यासमोर ही सुनावणी झाली. त्यामुळे जिल्हा न्यायालयात येत्या २० मे रोजी गायकवाड याच्यावरील दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.पानसरे यांच्या हत्येसंबंधी तपासाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा तपास सीबीआय व एसआयटी परस्पर समन्वयाने करीत आहेत. हा तपास फारसा समाधानकारक नाही, म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना गेल्याच आठवड्यात फटकारले आहे. पुरेशा गांभीर्याने तपास झाला नाही आणि समीर गायकवाड याच्यावरील खुनाचा गुन्हा सिद्ध होईल, असे पुरावे सादर झाले नाहीत, तर या प्रकरणातून तो सहीसलामत बाहेर पडेल. तसे होऊ नये, यासाठी तपास सुरू आहे, तोपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाने त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्याची घाई करू नये, असे पानसरे कुटुंबीयांचे म्हणणे होते. त्यानुसार, त्यांनी तशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली. न्यायाधीश रणजित मोरे यांच्या खंडपीठाने हे म्हणणे मान्य करून दोषारोपपत्र दाखल करण्याची घाई नको, असे स्पष्ट केले, परंतु मध्यंतरी मोरे यांची बदली झाली व त्या ठिकाणी न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी यांची नियुक्ती झाली. गायकवाड यांच्या वकिलांनी पुन्हा हाच विषय नव्याने त्यांच्यासमोर आणल्यावर धर्माधिकारी यांनी दोषारोपपत्रास स्थगितीचा मुद्दा फेटाळून लावला व याबाबतचा निर्णय जिल्हा सत्र न्यायालयाने घ्यावा, असा आदेश दिला.एकाच न्यायालयातील दोन वेगवेगळ्या आदेशामुळे सून मेघा पानसरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यांनी याचिका (क्रमांक ३८०६) दाखल केली होती. मात्र, सुनावणीवेळी न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यानुसारच कार्यवाही व्हावी, असे मत व्यक्त केले.