शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

पालघरमधील गोदामात स्फोटकांचा साठा जप्त

By admin | Updated: October 28, 2016 02:18 IST

मुंबई - अहमदाबाद महामार्गालगत सातिवली गावाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पडक्या इमारतीत स्फोटकांचा मोठ्या प्रमाणात साठा दडवून

- हितेन नाईक/आरिफ पटेल, पालघरमुंबई - अहमदाबाद महामार्गालगत सातिवली गावाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पडक्या इमारतीत स्फोटकांचा मोठ्या प्रमाणात साठा दडवून ठेवल्याची माहिती कळताच मुंबईतील काळाचौकी येथील दहशतवादविरोधी पथकाने छापा घालून डिटोनेटर, जिलेटीनच्या कांड्या अशी १४ ते १५ किलो वजनाची स्फोटके हस्तगत केली. या साठ्यामुळे येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवादी पथकाने ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने पालघर जिल्ह्यातील महामार्गालगतच्या सातिवली गावाच्या हद्दीत निर्मनुष्य ठिकाणी या गोदामात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती दिली होती. त्याआधारे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी ७ वाजता या पडक्या इमारतीच्या परिसरात पोहोचले. त्यावेळी लहान लहान पाकिटांमध्ये ही स्फोटके खड्डे खणून दडविल्याचे आढळले. मात्र याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.दहशतवादी पथकाचे मुंबई युनिटचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी, अधिक्षिका शारदा राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अशोक होनमाने आदींसह सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी शोध घेत होते. बेकायदेशीर गोदामे धोकादायकआजवर अनेक स्फोटकांचा यशस्वी शोध घेणाऱ्या पोलिसांच्या श्वानपथकातील लकी आणि मोती या श्वानांनी हा साठा शोधला.नवनिर्मित पालघर जिल्ह्यात प्रथमच बेवारस स्फोटके सापडल्याने हा जिल्हा दहशतवाद्यांच्या कारवाईचे लक्ष्य करण्याचा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रीय महामार्गालगत आदिवासी तसेच खाजगी जमिनींवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गोदामे उभारण्यात आली असून त्यातून अनेक प्रकारची बेकायदेशीर कृत्ये केली जात आहेत. त्यामुळे घातपाती कारवायांसाठी अशा गोदामांचा वापर केला जात असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.सहा महिन्यांपासून साठा दडविलामनोर पोलीस ठाण्याच्या वरई चौकीपासून सातिवलीमधील हे गोदाम अवघ्या ६०० फुटांवर असून त्या चौकीवर २४ तास पहारा असतानाही ही स्फोटके उतरवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा साठा दडविल्याचे समजते. त्यामुळे महामार्गालगतच्या पडक्या इमारती, अनधिकृत ढाबे, गोदामे यामुळे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोदामात मागील अनेक महिन्यांपासून काही जणांचे वास्तव्य असल्याचे घटनास्थळावरील दगडाच्या चुली, ब्लँकेट्स, जुने कपडे यावरून स्पष्ट होते.