शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

वेदना २३ वर्षानंतरही कायम !

By admin | Updated: September 30, 2016 02:19 IST

महाप्रलयंकारी भूकंप होऊन २३ वर्षे उलटली, तरी किल्लारी येथील नागरिकांच्या वेदना कायम आहेत. येथील नागरिकांना अद्यापही रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधा

- सूर्यकांत बाळापुरे, किल्लारी (जि. लातूर)

महाप्रलयंकारी भूकंप होऊन २३ वर्षे उलटली, तरी किल्लारी येथील नागरिकांच्या वेदना कायम आहेत. येथील नागरिकांना अद्यापही रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.मराठवाड्यात ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप होऊन लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील ५२ गावे उद्ध्वस्त झाली. यात दहा हजारांपेक्षा जास्त जीवितहानी झाली. या घटनेतून सावरण्यासाठी १२०० कोटींचा निधी जागतिक पातळीवरून उपलब्ध झाला. किल्लारीचे पुनर्वसन ७०० एकर क्षेत्रावर झाले असले तरी गावातील अंतर्गत रस्ते चांगल्या दर्जाचे नसल्याने पावसाळ्यात ये-जा करणे कठीण आहे. विलासराव देशमुख यांनी रस्त्यांसाठी २० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र पुढे त्याची अंमलबजावणी झाली नाही. किल्लारीला ३० खेडी योजनेतून पाणीपुरवठा सुरू आहे. हा पाणीपुरवठा माकणीच्या निम्न तेरणा प्रकल्पातून होतो. मात्र प्रकल्प ते किल्लारीपर्यंतची जलवाहिनी वारंवार फुटत आहे. परिणामी, किल्लारीला महिन्यातून एकदा पाणी मिळत आहे.भूकंपग्रस्तांना विनाअट सरकारी नोकरी देण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यासाठी आरक्षणही मंजूर करण्यात आले. मात्र त्याचा अपेक्षित फायदा भूकंपग्रस्तांना झाला नाही. त्यास विरोध झाल्याने आरक्षणाची टक्केवारी कमी झाली. त्यामुळे या भागात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढतच आहे.बाजारपेठ बंद : किल्लारीमध्ये ३० सप्टेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जातो. या दिवशी गावातील संपूर्ण बाजारपेठ बंद असते. जुन्या किल्लारीत भूकंपातील मयत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात येते. स्मृतिस्थळाची देखभाल हवी : किल्लारी येथे चार एकरवर स्मृतिस्थळ आहे. येथे उद्यान निर्मिती करून कारंजे बसविण्यात आले होते. मात्र काही कालावधीतच त्याची दुरवस्था झाली आहे. त्याची देखभाल वनविभागाकडे देण्यात आली होती. मात्र सध्या येथे सुविधा नाहीत.