शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

ओझोन थर घटतोय; मृत्युदर वाढतोय

By admin | Updated: February 16, 2017 05:06 IST

देशातील वायुप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीमुळे ओझोनचा थरही घटत आहे.

मुंबई : देशातील वायुप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीमुळे ओझोनचा थरही घटत आहे. घटत्या ओझोनच्या थरामुळे मृत्युदराच्या प्रमाणात वाढ होत असून, देशातील हे प्रमाण १ लाख ७ हजार ८०० एवढे नोंदवण्यात आले आहे.जागतिक हवामानाविषयीचा २०१७ चा अहवाल (स्टेट आॅफ ग्लोबल एअर २०१७) नुकतेच बोस्टनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. अहवालानुसार, प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. ओझोन प्रदूषणामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. हवेच्या प्रदूषणापेक्षाही ओझोन प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ओझोन प्रदूषणामुळे जगभरात झालेल्या मृत्यूची २०१५ मधील आकडेवारी २ लाख ५४ हजार आहे. जगभरात हवेच्या प्रदूषणामुळे ४.२ दशलक्षपेक्षाही अधिक अकाली मृत्यूची नोंद २०१५ साली झाली आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या ९२ टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेत वास्तव्य करते. हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या जगभरातील अकाली मृत्यूच्या अर्ध्या प्रमाणासाठी (५२ टक्के) भारत आणि चीन हे दोन जबाबदार आहेत. मुंबई शहर व उपनगरांत मोटारींमुळे दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. दुर्दैव म्हणजे उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत असून, त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. शिवाय पेटत्या डम्पिंग ग्राउंडची यात भर पडत आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवरील धुलीकण मुंबईच्या वातावरणात मिसळत असल्याचे यातून समोर आले आहे. (प्रतिनिधी)