शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

ओझोन थर घटतोय; मृत्युदर वाढतोय

By admin | Updated: February 16, 2017 05:06 IST

देशातील वायुप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीमुळे ओझोनचा थरही घटत आहे.

मुंबई : देशातील वायुप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीमुळे ओझोनचा थरही घटत आहे. घटत्या ओझोनच्या थरामुळे मृत्युदराच्या प्रमाणात वाढ होत असून, देशातील हे प्रमाण १ लाख ७ हजार ८०० एवढे नोंदवण्यात आले आहे.जागतिक हवामानाविषयीचा २०१७ चा अहवाल (स्टेट आॅफ ग्लोबल एअर २०१७) नुकतेच बोस्टनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. अहवालानुसार, प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. ओझोन प्रदूषणामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. हवेच्या प्रदूषणापेक्षाही ओझोन प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ओझोन प्रदूषणामुळे जगभरात झालेल्या मृत्यूची २०१५ मधील आकडेवारी २ लाख ५४ हजार आहे. जगभरात हवेच्या प्रदूषणामुळे ४.२ दशलक्षपेक्षाही अधिक अकाली मृत्यूची नोंद २०१५ साली झाली आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या ९२ टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेत वास्तव्य करते. हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या जगभरातील अकाली मृत्यूच्या अर्ध्या प्रमाणासाठी (५२ टक्के) भारत आणि चीन हे दोन जबाबदार आहेत. मुंबई शहर व उपनगरांत मोटारींमुळे दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. दुर्दैव म्हणजे उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत असून, त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. शिवाय पेटत्या डम्पिंग ग्राउंडची यात भर पडत आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवरील धुलीकण मुंबईच्या वातावरणात मिसळत असल्याचे यातून समोर आले आहे. (प्रतिनिधी)