शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

अतिउष्णतेने राज्य होरपळले

By admin | Updated: May 19, 2016 05:39 IST

उष्णतेच्या तीव्र लाटेत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश होरपळून निघाला

नवी दिल्ली/मुंबई/पुणे : उष्णतेच्या तीव्र लाटेत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश होरपळून निघाला आहे. उष्माघाताने आठ जणांचा बळी गेला असून त्यामध्ये विदर्भातील चार आणि खान्देशातील चौघांचा समावेश आहे. विदर्भात दुपारी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी परिस्थिती आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमान अकोला येथे नोंदवण्यात आले. या भयानक उष्णतेमुळे अकोला जिल्ह्यात सात माकडांचा मृत्यू झाला. हवामान खात्याने महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली या भागात केंद्रीय अतिउष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, ही लाट २१ मेपर्यंत राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तेलंगणात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या ३0९ वर गेली आहे. त्यामुळे वैशाख वणव्याने महाराष्ट्र होरपळला असताना, अन्य राज्यांची स्थितीही फारशी वेगळी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला अपवाद आहे दक्षिण आणि ईशान्य भारतातील राज्यांचा. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुडुच्चेरी, आसाम, बंगाल या राज्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचा कहर सुरू आहे.>प्रमुख शहरांमधील कमाल तापमान अकोला ४७.१, जळगाव ४६, परभणी व मालेगाव ४५.२, वर्धा ४५, अमरावती ४४.६, यवतमाळ ४४.४ (अंश सेल्सिअस) >विदर्भात चौघांचा बळी विदर्भात सूर्य आग ओकत असल्यासारखी परिस्थिती आहे. एकूणच जनजीवन बेहाल झाले आहे. अकोला जिल्ह्यात उष्माघाताने बुधवारी दोघांचा मृत्यू झाला. गणेश गुलाबराव खंडागळे (वय ५० रा. भांबेरी, ता. तेल्हारा), चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर येथील श्यामराव गोगुलवार (५५), वर्धा जिल्ह्यातील महेंद्र लोहकरे (५०) अशी मृतांची नावे आहेत. पातूर तालुक्यातील चिखलगाव येथे एका ६५ वर्षाचा व्यक्तीचा मृतदेह आढळला असून त्याचा मृत्यूही उष्माघाताने झाल्याचा कयास आहे. याशिवाय राज्यात उष्णतेने सात माकडांचाही बळी गेला.खान्देशात चौघांचा मृत्यूखान्देशातही बुधवारी जळगाव येथे ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात तापमान ४५.६ अंशांवर पोहोचले तर नंदुरबार येथे गेल्या तीन दिवसांपासून पारा ४४ अंशांवर कायम आहे. धुळे जिल्ह्यातील निमगूळ येथील बारीकराव रंगराव बागल (५१) आणि वारुड येथील प्रवीण देवराम चित्ते (३४) आणि जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा खुर्द येथील गोकूळ शेनफडू पाटील (६७) व रावेरच्या संभाजीनगर भागातील भागवत लालू जगताप (वय ४६) या चौघांचा बुधवारी उष्माघाताने मृत्यू झाला. आला रे... मॉन्सून आला..!तीव्र उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरात बुधवारी दाखल झाला. त्यामुळे आता लवकरच तो केरळमार्गे देशाच्या इतर भागांमध्येही दाखल होण्याची आशा वाढली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मॉन्सूनची आगेकूच होऊन तो अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.