शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

चौकटी बाहेरचा लेखक

By admin | Updated: December 25, 2016 03:55 IST

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी निधन झाले. विविध कथासंग्रहांच्या माध्यमातून होवाळांनी ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकला. आंबेडकरी विचारांचा होवाळ यांच्यावर पगडा होता.

- ज.वि.पवारज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी निधन झाले. विविध कथासंग्रहांच्या माध्यमातून होवाळांनी ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकला. आंबेडकरी विचारांचा होवाळ यांच्यावर पगडा होता. त्यांच्या साहित्यविषयक आठवणींना दिलेला हा उजाळा...‘बे नवाड’, ‘येळकोट’, ‘वारसदार’, ‘वाटाआडवाटा’ या दर्जेदार कथासंग्रहाच्या माध्यमातून वामनदादांनी ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकला. मराठी साहित्यातील ‘कथा’ या साहित्य प्रकारातील वामनदादांच्या योगदानामुळे मराठी कथांनी वेगळीच उंची गाठली. त्यामुळेच ग्रामीण जीवनांचे वास्तव मांडणाऱ्या त्यांच्या कथा अनेकांच्या पसंतीस उतरल्या.साहित्यविश्वातील ज्येष्ठ लेखक शंकर पाटील, मिरासदार आणि माडगुळकर यानंतर कथाकार म्हणून वामन होवाळांचे नाव आवर्जून घेतले जाते. सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील भाषेला मराठी साहित्यात स्थान मिळवून देण्याचे अभूतपूर्व काम होवाळ यांनी केले. त्यामुळेच त्यांच्या कथांनी वेगळीच उंची गाठली. आंबेडकरी विचारांचा होवाळ यांच्यावर पगडा होता. त्यामुळे आपसुकच त्यांच्या साहित्यातून आंबेडकरी विचारधारेची किनार डोकावते. दलित समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचारावर त्यांनी त्यांच्या विनोदपर लिखाणातून टिका केली. समाजातील वैगुण्यावर गंभीरपणे भाष्य करणे त्यांना पसंत नव्हते. असे असले तरी गमतीशीर पद्धतीने कथेच्या माध्यमातून मांडलेले विचार हे अधिक खोलवर परिणाम करणारे होते.साहित्य संमेलनादरम्यान होणाऱ्या त्यांच्या कथावाचनाच्या कार्यक्रमाला गर्दी असायची. इतका समर्थवान लेखक असूनही सरकारने त्यांची कोणत्याही पुरस्कारासाठी स्वत:हून दखल घेतली नाही, ही खंत आहे. पुरस्कार हे केवळ प्रकाशकांनी पुस्तके पाठविल्यामुळेच त्यांना मिळाले आहेत. हे पुरस्कार आणि ती पुस्तके केवळ त्या वर्षभरापुरते मर्यादीत राहिल्याची खंत आहे.मात्र या साऱ्या गोष्टी बाजूला सारुन त्यांनी साहित्य घडविण्याला महत्त्व दिले. केवळ कथालेखन नाही तर लोकनाट्यातील बतावण्याही ते अगदी छान जुळवत. आम्ही काढलेल्या एका अंकात होवाळ ‘बाबुराव’ या टोपण नावाने ते बतावणी लिहित. त्यांच्या लेखणीतील विशेष सांगायचे झाले तर आपल्या मातीशी नाती सांगणारी अशी भाषा ते वापरत. अनेकदा त्या शब्दांचे अर्थ डिक्शनरीतही सापडणार नाहीत. उदा. ‘देवनाड’ हा शब्द त्यांनी वापरला तेव्हा या शब्दाचा अर्थ लोकांना कळत नव्हता. परंतु देनवाड ही मानसिक प्रवृत्ती असून खोटे सांगा पण दणकून सांगा असा याचा अर्थ होता. प्रचलित भाषेला बाजूला सारत त्यांनी बोलीभाषेला महत्त्व प्राप्त करुन दिले. बाबुराव बागुलानंतर क्षमता असलेला असा हा लेखक होता. पण याची हवी तशी दखल घेतली गेली नाही. वामनदादांनी अनेक मोठ्या साहित्यिकांसोबत काम केले असून मराठी साहित्याला वेगळ््याच उंचीवर नेण्याचे काम केले आहे. त्यांच्यासारखा कथाकार होणे नाही.मूळचे सांगलीचे असलेले वामन होवाळ यांनी उच्च शिक्षण मुंबईत घेतले. दलित ग्रामीण विश्वाचे प्रत्यंकारी चित्रण त्यांनी रेखाटले. कधी कोपरखळ््या मारत, प्रसंगी चिमटे काढत वास्तव मांडणारे हे लेखन वाचकाला अंतर्मुख करणारे होते. मुंबईतल्या झोपडपट्टीतील वास्तव त्यांनी प्रखरतेने मांडले. कथालक्ष्मीच्या अंकात प्रसिद्ध झालेली त्यांची माणूस (१९५३) ही पहिली कथा विशेष गाजली. आंधळ््याची वरात बहिऱ्याच्या घरात, जपून पेरा बेणं या लोकनाट्याने रसिकांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले.