शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चौकटी बाहेरचा लेखक

By admin | Updated: December 25, 2016 03:55 IST

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी निधन झाले. विविध कथासंग्रहांच्या माध्यमातून होवाळांनी ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकला. आंबेडकरी विचारांचा होवाळ यांच्यावर पगडा होता.

- ज.वि.पवारज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी निधन झाले. विविध कथासंग्रहांच्या माध्यमातून होवाळांनी ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकला. आंबेडकरी विचारांचा होवाळ यांच्यावर पगडा होता. त्यांच्या साहित्यविषयक आठवणींना दिलेला हा उजाळा...‘बे नवाड’, ‘येळकोट’, ‘वारसदार’, ‘वाटाआडवाटा’ या दर्जेदार कथासंग्रहाच्या माध्यमातून वामनदादांनी ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकला. मराठी साहित्यातील ‘कथा’ या साहित्य प्रकारातील वामनदादांच्या योगदानामुळे मराठी कथांनी वेगळीच उंची गाठली. त्यामुळेच ग्रामीण जीवनांचे वास्तव मांडणाऱ्या त्यांच्या कथा अनेकांच्या पसंतीस उतरल्या.साहित्यविश्वातील ज्येष्ठ लेखक शंकर पाटील, मिरासदार आणि माडगुळकर यानंतर कथाकार म्हणून वामन होवाळांचे नाव आवर्जून घेतले जाते. सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील भाषेला मराठी साहित्यात स्थान मिळवून देण्याचे अभूतपूर्व काम होवाळ यांनी केले. त्यामुळेच त्यांच्या कथांनी वेगळीच उंची गाठली. आंबेडकरी विचारांचा होवाळ यांच्यावर पगडा होता. त्यामुळे आपसुकच त्यांच्या साहित्यातून आंबेडकरी विचारधारेची किनार डोकावते. दलित समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचारावर त्यांनी त्यांच्या विनोदपर लिखाणातून टिका केली. समाजातील वैगुण्यावर गंभीरपणे भाष्य करणे त्यांना पसंत नव्हते. असे असले तरी गमतीशीर पद्धतीने कथेच्या माध्यमातून मांडलेले विचार हे अधिक खोलवर परिणाम करणारे होते.साहित्य संमेलनादरम्यान होणाऱ्या त्यांच्या कथावाचनाच्या कार्यक्रमाला गर्दी असायची. इतका समर्थवान लेखक असूनही सरकारने त्यांची कोणत्याही पुरस्कारासाठी स्वत:हून दखल घेतली नाही, ही खंत आहे. पुरस्कार हे केवळ प्रकाशकांनी पुस्तके पाठविल्यामुळेच त्यांना मिळाले आहेत. हे पुरस्कार आणि ती पुस्तके केवळ त्या वर्षभरापुरते मर्यादीत राहिल्याची खंत आहे.मात्र या साऱ्या गोष्टी बाजूला सारुन त्यांनी साहित्य घडविण्याला महत्त्व दिले. केवळ कथालेखन नाही तर लोकनाट्यातील बतावण्याही ते अगदी छान जुळवत. आम्ही काढलेल्या एका अंकात होवाळ ‘बाबुराव’ या टोपण नावाने ते बतावणी लिहित. त्यांच्या लेखणीतील विशेष सांगायचे झाले तर आपल्या मातीशी नाती सांगणारी अशी भाषा ते वापरत. अनेकदा त्या शब्दांचे अर्थ डिक्शनरीतही सापडणार नाहीत. उदा. ‘देवनाड’ हा शब्द त्यांनी वापरला तेव्हा या शब्दाचा अर्थ लोकांना कळत नव्हता. परंतु देनवाड ही मानसिक प्रवृत्ती असून खोटे सांगा पण दणकून सांगा असा याचा अर्थ होता. प्रचलित भाषेला बाजूला सारत त्यांनी बोलीभाषेला महत्त्व प्राप्त करुन दिले. बाबुराव बागुलानंतर क्षमता असलेला असा हा लेखक होता. पण याची हवी तशी दखल घेतली गेली नाही. वामनदादांनी अनेक मोठ्या साहित्यिकांसोबत काम केले असून मराठी साहित्याला वेगळ््याच उंचीवर नेण्याचे काम केले आहे. त्यांच्यासारखा कथाकार होणे नाही.मूळचे सांगलीचे असलेले वामन होवाळ यांनी उच्च शिक्षण मुंबईत घेतले. दलित ग्रामीण विश्वाचे प्रत्यंकारी चित्रण त्यांनी रेखाटले. कधी कोपरखळ््या मारत, प्रसंगी चिमटे काढत वास्तव मांडणारे हे लेखन वाचकाला अंतर्मुख करणारे होते. मुंबईतल्या झोपडपट्टीतील वास्तव त्यांनी प्रखरतेने मांडले. कथालक्ष्मीच्या अंकात प्रसिद्ध झालेली त्यांची माणूस (१९५३) ही पहिली कथा विशेष गाजली. आंधळ््याची वरात बहिऱ्याच्या घरात, जपून पेरा बेणं या लोकनाट्याने रसिकांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले.