शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, उद्धव ठाकरेंचा टोला

By admin | Updated: September 8, 2016 07:33 IST

अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, पण मग हेच कानडी बांधव सीमा भागातील मराठी जणांवर जे भयंकर अत्याचार करीत आहेत त्याला काय म्हणायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे

- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - तामीळनाडूस त्यांच्या वाट्याचे पाणी दिल्याने कर्नाटकवर अन्याय झाल्याची भावना आहे. चला, यानिमित्ताने अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, पण मग हेच कानडी बांधव सीमा भागातील मराठी जणांवर जे भयंकर अत्याचार करीत आहेत त्याला काय म्हणायचे? दुसर्‍यांवरील अन्याय हा स्वत:साठी न्याय व दुसर्‍यांना मिळालेला न्याय हा स्वत:वरील अन्याय ठरतो तेव्हा राज्याचे मानसिक संतुलन बिघडले असे समजायला हवे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे. 
 
तामीळनाडूविरोधात व खासकरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कानडी बांधवांनी जो हिंसक लुंगी डान्स सुरू केला त्याचा काय अर्थ घ्यावा? तामीळनाडूस त्यांच्या वाट्याचे पाणी दिल्याने कर्नाटकवर अन्याय झाल्याची भावना आहे. चला, यानिमित्ताने अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, पण मग गेली पन्नासेक वर्षे हेच कानडी बांधव सीमा भागातील मराठी जनांवर जे भयंकर अत्याचार करीत आहेत त्याला काय म्हणायचे? हे अत्याचार अन्यायाच्या कोणत्या परिभाषेत बसतात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 
 
कर्नाटक सरकार व कानडी जनता मराठी बांधवांना ‘दुष्मनां’ची पोरे समजून वर्षानुवर्षे चिरडत, भरडत आहे. मराठी शाळा, मराठी पाट्यांवर अन्यायाचे हातोडे मारून मुस्कटदाबीचा कहर करीत आहे. मराठी भाषेवर तिथे एक प्रकारे सरकारी बंदी आणून जो अत्याचार चालवला आहे तो सर्वच प्रकार अन्यायाचे शिखर आहे, पण तामीळनाडूस पाणी दिले हा ज्या कानडी बांधवांना अन्याय वाटतो त्यांना मराठी जनांचे सांडलेले रक्त हा अन्याय वाटू नये हे ढोंगच म्हणावे लागेल. पाण्यासाठी भांडणार्‍यांना न्यायासाठी सांडलेल्या रक्ताचे मोल वाटू नये याचे आश्‍चर्य वाटते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
कर्नाटकात पाणी पेटले आहे. त्याच कर्नाटकच्या सीमा भागात गेली पन्नास वर्षे कानडी अन्यायाविरोधात मराठी जनांची मने व मनगटे पेटली आहेत. हा अन्याय करणारे कानडी बांधवच आहेत. मात्र त्यांनी कावेरी पाणीवाटपात अन्याय झाला म्हणून सर्वोच्च न्यायालय व तामीळनाडूविरोधात लुंग्या झटकून हिंसाचार सुरू केला आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने २० लाख सीमा बांधवांना न्याय देणारा निर्णय दिला तर ‘हा अन्याय आहे हो!’ असे सांगून पेटवापेटवीचा असाच ‘न्याय्य’ मार्ग स्वीकारायला हे लोक कमी करणार नाहीत असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.