शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, उद्धव ठाकरेंचा टोला

By admin | Updated: September 8, 2016 07:33 IST

अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, पण मग हेच कानडी बांधव सीमा भागातील मराठी जणांवर जे भयंकर अत्याचार करीत आहेत त्याला काय म्हणायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे

- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - तामीळनाडूस त्यांच्या वाट्याचे पाणी दिल्याने कर्नाटकवर अन्याय झाल्याची भावना आहे. चला, यानिमित्ताने अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, पण मग हेच कानडी बांधव सीमा भागातील मराठी जणांवर जे भयंकर अत्याचार करीत आहेत त्याला काय म्हणायचे? दुसर्‍यांवरील अन्याय हा स्वत:साठी न्याय व दुसर्‍यांना मिळालेला न्याय हा स्वत:वरील अन्याय ठरतो तेव्हा राज्याचे मानसिक संतुलन बिघडले असे समजायला हवे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे. 
 
तामीळनाडूविरोधात व खासकरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कानडी बांधवांनी जो हिंसक लुंगी डान्स सुरू केला त्याचा काय अर्थ घ्यावा? तामीळनाडूस त्यांच्या वाट्याचे पाणी दिल्याने कर्नाटकवर अन्याय झाल्याची भावना आहे. चला, यानिमित्ताने अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, पण मग गेली पन्नासेक वर्षे हेच कानडी बांधव सीमा भागातील मराठी जनांवर जे भयंकर अत्याचार करीत आहेत त्याला काय म्हणायचे? हे अत्याचार अन्यायाच्या कोणत्या परिभाषेत बसतात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 
 
कर्नाटक सरकार व कानडी जनता मराठी बांधवांना ‘दुष्मनां’ची पोरे समजून वर्षानुवर्षे चिरडत, भरडत आहे. मराठी शाळा, मराठी पाट्यांवर अन्यायाचे हातोडे मारून मुस्कटदाबीचा कहर करीत आहे. मराठी भाषेवर तिथे एक प्रकारे सरकारी बंदी आणून जो अत्याचार चालवला आहे तो सर्वच प्रकार अन्यायाचे शिखर आहे, पण तामीळनाडूस पाणी दिले हा ज्या कानडी बांधवांना अन्याय वाटतो त्यांना मराठी जनांचे सांडलेले रक्त हा अन्याय वाटू नये हे ढोंगच म्हणावे लागेल. पाण्यासाठी भांडणार्‍यांना न्यायासाठी सांडलेल्या रक्ताचे मोल वाटू नये याचे आश्‍चर्य वाटते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
कर्नाटकात पाणी पेटले आहे. त्याच कर्नाटकच्या सीमा भागात गेली पन्नास वर्षे कानडी अन्यायाविरोधात मराठी जनांची मने व मनगटे पेटली आहेत. हा अन्याय करणारे कानडी बांधवच आहेत. मात्र त्यांनी कावेरी पाणीवाटपात अन्याय झाला म्हणून सर्वोच्च न्यायालय व तामीळनाडूविरोधात लुंग्या झटकून हिंसाचार सुरू केला आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने २० लाख सीमा बांधवांना न्याय देणारा निर्णय दिला तर ‘हा अन्याय आहे हो!’ असे सांगून पेटवापेटवीचा असाच ‘न्याय्य’ मार्ग स्वीकारायला हे लोक कमी करणार नाहीत असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.