शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, उद्धव ठाकरेंचा टोला

By admin | Updated: September 8, 2016 07:33 IST

अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, पण मग हेच कानडी बांधव सीमा भागातील मराठी जणांवर जे भयंकर अत्याचार करीत आहेत त्याला काय म्हणायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे

- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - तामीळनाडूस त्यांच्या वाट्याचे पाणी दिल्याने कर्नाटकवर अन्याय झाल्याची भावना आहे. चला, यानिमित्ताने अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, पण मग हेच कानडी बांधव सीमा भागातील मराठी जणांवर जे भयंकर अत्याचार करीत आहेत त्याला काय म्हणायचे? दुसर्‍यांवरील अन्याय हा स्वत:साठी न्याय व दुसर्‍यांना मिळालेला न्याय हा स्वत:वरील अन्याय ठरतो तेव्हा राज्याचे मानसिक संतुलन बिघडले असे समजायला हवे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे. 
 
तामीळनाडूविरोधात व खासकरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कानडी बांधवांनी जो हिंसक लुंगी डान्स सुरू केला त्याचा काय अर्थ घ्यावा? तामीळनाडूस त्यांच्या वाट्याचे पाणी दिल्याने कर्नाटकवर अन्याय झाल्याची भावना आहे. चला, यानिमित्ताने अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, पण मग गेली पन्नासेक वर्षे हेच कानडी बांधव सीमा भागातील मराठी जनांवर जे भयंकर अत्याचार करीत आहेत त्याला काय म्हणायचे? हे अत्याचार अन्यायाच्या कोणत्या परिभाषेत बसतात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 
 
कर्नाटक सरकार व कानडी जनता मराठी बांधवांना ‘दुष्मनां’ची पोरे समजून वर्षानुवर्षे चिरडत, भरडत आहे. मराठी शाळा, मराठी पाट्यांवर अन्यायाचे हातोडे मारून मुस्कटदाबीचा कहर करीत आहे. मराठी भाषेवर तिथे एक प्रकारे सरकारी बंदी आणून जो अत्याचार चालवला आहे तो सर्वच प्रकार अन्यायाचे शिखर आहे, पण तामीळनाडूस पाणी दिले हा ज्या कानडी बांधवांना अन्याय वाटतो त्यांना मराठी जनांचे सांडलेले रक्त हा अन्याय वाटू नये हे ढोंगच म्हणावे लागेल. पाण्यासाठी भांडणार्‍यांना न्यायासाठी सांडलेल्या रक्ताचे मोल वाटू नये याचे आश्‍चर्य वाटते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
कर्नाटकात पाणी पेटले आहे. त्याच कर्नाटकच्या सीमा भागात गेली पन्नास वर्षे कानडी अन्यायाविरोधात मराठी जनांची मने व मनगटे पेटली आहेत. हा अन्याय करणारे कानडी बांधवच आहेत. मात्र त्यांनी कावेरी पाणीवाटपात अन्याय झाला म्हणून सर्वोच्च न्यायालय व तामीळनाडूविरोधात लुंग्या झटकून हिंसाचार सुरू केला आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने २० लाख सीमा बांधवांना न्याय देणारा निर्णय दिला तर ‘हा अन्याय आहे हो!’ असे सांगून पेटवापेटवीचा असाच ‘न्याय्य’ मार्ग स्वीकारायला हे लोक कमी करणार नाहीत असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.