शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
4
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
5
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
6
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
7
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
8
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
9
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
10
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
11
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
12
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
13
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
14
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
15
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
16
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
17
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
18
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
19
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 

...अन्यथा ठाणे जि.प. पुन्हा अल्पायुषी!

By admin | Updated: January 5, 2015 04:50 IST

ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याची घाई राज्य सरकारने करू नये. या जिल्ह्यातील काही तालुक्यांची ठिकाणे ही नगरपंचायत होण्याची शक्यता

बदलापूर : ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याची घाई राज्य सरकारने करू नये. या जिल्ह्यातील काही तालुक्यांची ठिकाणे ही नगरपंचायत होण्याची शक्यता असल्याने त्या नगरपंचायतींचा निर्णय घेतल्यावरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याची गरज आहे. अन्यथा, जिल्हा विभाजनानंतर पुन्हा नव्याने गठीत होणारी जिल्हा परिषद अल्पायुषी ठरेल, असे भाकीत माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. ठाणे आणि पालघर जिल्हा विभाजन झाल्यावर ठाणे जिल्हा परिषदेच्या नव्याने निवडणुका घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्याने तयार झालेल्या जिल्ह्यातील वाडा, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावांची वाढती लोकसंख्या पाहता या तिन्ही गावांसाठी स्वतंत्र नगरपंचायती स्थापन करण्याचा निर्णय घेण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. तसेच या तीन गावांसाठी स्वतंत्र निर्णय झालेही पाहिजे. मात्र, नव्या नगरपंचायतींचा निर्णय घेतल्यावरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांची एकत्रित महापालिका स्थापन करण्याचा राज्य शासन विचार करीत आहे. त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषद अल्पायुषी ठरणार आहे. संभाव्य शक्यता लक्षात घेऊन आपण राष्ट्रवादी पक्षाचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)