शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

...नाहीतर विनाश पक्का

By admin | Updated: September 5, 2016 03:19 IST

जगातील तापमान झपाट्याने वाढत आहे़ ही वाढ चिंताजनक आहे़

पवन देशपांडे,

मुंबई- जगातील तापमान झपाट्याने वाढत आहे़ ही वाढ चिंताजनक आहे़ केवळ साडेचार अंशाने तापमान वाढली तर समुद्राची उंची तब्बल दोन मीटरने वाढेल आणि त्यामुळे अनेक देश पाण्याखाली जातील. हे थांबवायचे असेल तर कार्बन उत्सर्जनाला लगाम लाववी लागेल अन्यथा विनाश पक्का आहे, असा इशारा अमेरिकेचे विशेष दूत डॉ. जोनाथन परशिंग यांनी दिला़अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनात हवामान बदल यासंदर्भात डॉ़ परशिंग हे विशेष दूत आहेत़ ते भारत सरकारशी याविषयी चर्चा करण्यासाठी भारतात आले आहेत़ मुंबई दौऱ्यात त्यांचा सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात वार्तालाप झाला़ यावेळी ते म्हणाले, उद्याचे आयुष्य आपल्याला चांगले जगायचे असेल, तर आजच उपाय योजने गरजेचे आहे़ हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढले आहे़ यात चीन आणि अमेरिकाही अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे़ इतर जगाच्या तुलनेत ही दोन राष्ट्र सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जन करत आहेत़ विविध राष्ट्राचा वाटा वेगळा आहे़ पण परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. त्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दिसत आहे़ कधी जोरदार पाऊस पडतोय तर कधी उन्हाचा पारा चढतो आहे. हे थांबवण्यासाठी कार्बन उत्सर्जन घटवावे लागेल आणि त्याला लगाम लावण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत़ सरकारी पातळीवर धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत़ >पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवावा लागेल चीनमध्ये ५० कोटी लोकांपर्यंत वीज पोहोचली़ मात्र हे उद्दिष्ट गाठताना तेथे कार्बन उत्सर्जनाचे भान ठेवले गेले नाही़ भारतातही जर गावोगावी अशाच प्रकारे वीज पोहोचवली गेली तर येथेही विजनिर्मिती वाढेल, पर्यायाने कार्बन उत्सर्जनही वाढेल़ कारण भारतात औष्णिक उर्जानिर्मितीचे प्रमाण अधिक आहे़ नवतंत्रज्ञानाद्वारे याला पर्याय शोधावा लागेल़ पर्यायी उर्जेचा वापर वाढवावा लागेल आणि सौर-पवन उर्जेचे तंत्रज्ञान परवडणाऱ्या दरात उपबल्ध करावे लागतील, असेही डॉ़ परसिंग यांनी सांगितले़ कार्बन उत्सर्जन थांबवण्यासाठी सारेच देश काम करत आहेत़ अमेरिकेने सुरुवात केली आहे़ जे साहित्य कार्बन उत्सर्जनाचे नियम पाळून तयार करण्यात आले आहेत तेच साहित्य खरेदी करण्याचा आमच्या सरकारचा कल असतो, असेही डॉ़ परसिंग यांनी स्पष्ट केले़ आपल्या रोजच्या जीवनात थोडा बदल करायला लागेल़ वीज वापरापासून सुरुवात जरी केली तरी कमी उर्जा लागेल असे तंत्रज्ञान वापरावे लागेल़ कारण विजनिर्मिती वाढल्याने कार्बन उत्सर्जनही वाढत आहे़ त्यासाठी आपल्याला मिळून काम करावे लागेल, असेही डॉ. परशिंग म्हणाले़