शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

...नाहीतर विनाश पक्का

By admin | Updated: September 5, 2016 03:19 IST

जगातील तापमान झपाट्याने वाढत आहे़ ही वाढ चिंताजनक आहे़

पवन देशपांडे,

मुंबई- जगातील तापमान झपाट्याने वाढत आहे़ ही वाढ चिंताजनक आहे़ केवळ साडेचार अंशाने तापमान वाढली तर समुद्राची उंची तब्बल दोन मीटरने वाढेल आणि त्यामुळे अनेक देश पाण्याखाली जातील. हे थांबवायचे असेल तर कार्बन उत्सर्जनाला लगाम लाववी लागेल अन्यथा विनाश पक्का आहे, असा इशारा अमेरिकेचे विशेष दूत डॉ. जोनाथन परशिंग यांनी दिला़अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनात हवामान बदल यासंदर्भात डॉ़ परशिंग हे विशेष दूत आहेत़ ते भारत सरकारशी याविषयी चर्चा करण्यासाठी भारतात आले आहेत़ मुंबई दौऱ्यात त्यांचा सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात वार्तालाप झाला़ यावेळी ते म्हणाले, उद्याचे आयुष्य आपल्याला चांगले जगायचे असेल, तर आजच उपाय योजने गरजेचे आहे़ हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढले आहे़ यात चीन आणि अमेरिकाही अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे़ इतर जगाच्या तुलनेत ही दोन राष्ट्र सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जन करत आहेत़ विविध राष्ट्राचा वाटा वेगळा आहे़ पण परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. त्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दिसत आहे़ कधी जोरदार पाऊस पडतोय तर कधी उन्हाचा पारा चढतो आहे. हे थांबवण्यासाठी कार्बन उत्सर्जन घटवावे लागेल आणि त्याला लगाम लावण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत़ सरकारी पातळीवर धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत़ >पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवावा लागेल चीनमध्ये ५० कोटी लोकांपर्यंत वीज पोहोचली़ मात्र हे उद्दिष्ट गाठताना तेथे कार्बन उत्सर्जनाचे भान ठेवले गेले नाही़ भारतातही जर गावोगावी अशाच प्रकारे वीज पोहोचवली गेली तर येथेही विजनिर्मिती वाढेल, पर्यायाने कार्बन उत्सर्जनही वाढेल़ कारण भारतात औष्णिक उर्जानिर्मितीचे प्रमाण अधिक आहे़ नवतंत्रज्ञानाद्वारे याला पर्याय शोधावा लागेल़ पर्यायी उर्जेचा वापर वाढवावा लागेल आणि सौर-पवन उर्जेचे तंत्रज्ञान परवडणाऱ्या दरात उपबल्ध करावे लागतील, असेही डॉ़ परसिंग यांनी सांगितले़ कार्बन उत्सर्जन थांबवण्यासाठी सारेच देश काम करत आहेत़ अमेरिकेने सुरुवात केली आहे़ जे साहित्य कार्बन उत्सर्जनाचे नियम पाळून तयार करण्यात आले आहेत तेच साहित्य खरेदी करण्याचा आमच्या सरकारचा कल असतो, असेही डॉ़ परसिंग यांनी स्पष्ट केले़ आपल्या रोजच्या जीवनात थोडा बदल करायला लागेल़ वीज वापरापासून सुरुवात जरी केली तरी कमी उर्जा लागेल असे तंत्रज्ञान वापरावे लागेल़ कारण विजनिर्मिती वाढल्याने कार्बन उत्सर्जनही वाढत आहे़ त्यासाठी आपल्याला मिळून काम करावे लागेल, असेही डॉ. परशिंग म्हणाले़