शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

ओएसडींना ‘संदिग्धतेचा’ लाभ!

By admin | Updated: September 27, 2016 02:32 IST

मंजूर पद नसताना विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) या पदावर मंत्र्यांकडे नियुक्ती देण्यात आली असेल तर, अशा ओएसडींची नियुक्ती तत्काळ रद्द करण्याचा आदेश सामान्य

मुंबई : मंजूर पद नसताना विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) या पदावर मंत्र्यांकडे नियुक्ती देण्यात आली असेल तर, अशा ओएसडींची नियुक्ती तत्काळ रद्द करण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने आज दिला. तथापि, या आदेशातील संदिग्धतेचा फायदा मिळून मंत्र्यांच्या ओएसडींना अभयच मिळेल, असे दिसते. प्रत्येक मंत्र्यांकडे असलेले ओएसडीचे पद नियमबाह्य असल्याचे वृत्त लोकमतने दोन महिन्यांपूर्वी दिले होते. या पदाचा आकृतीबंधामध्ये समावेश नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. तसेच पीए, पीएस आणि ओएसडींच्या जबाबदाऱ्या नियमानुसार निश्चित करण्यातच आलेल्या नाहीत, याकडेही लक्ष वेधले होते. मंत्री आस्थापनेत निर्माण करण्यात आलेले ओएसडीचे पद नियमबाह्य असल्याची भूमिका सामान्य प्रशासन विभागाने आज काढलेल्या परिपत्रकात घेतली आहे. मात्र, हे करताना आकृतीबंधात मंजूर नसताना कोणाला ओएसडी नेमले असेल तर ती नियुक्ती तत्काळ रद्द करावी, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. मंत्र्यांच्या आस्थापनेत तीन पीए आकृतीबंधानुसार घेता येतात. त्यातील एक किंवा दोन पीएंचे पद हे ओएसडीमध्ये परावर्तित केले जाते. त्यामुळे मूळ आकृतीबंधाला धक्का न लावता ओएसडींना नेमण्याची चलाखी केली जाते. या पार्श्वभूमीवर, ‘कोणत्याही मार्गाने ओएसडी नेमणे नियमबाह्य आहे’, अशी स्पष्ट भूमिका सामान्यप्रशासन विभागाने घ्यायला हवी होती, असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केले. विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी काढलेल्या परिपत्रकात, ओएसडींचे कर्तव्य आणिजबाबदारी निश्चित नसल्याने त्यांच्या कामकाजाचे मूल्यमापण करणे शक्य नाही. तसेच या पदावरील व्यक्तीकडून काही अनियमितता झाल्यास ते पदच नसल्याने कारवाई करणे शक्य होणार नाही, असे नमूद केले. मात्र, यापुढे कोणत्याही परिस्थितीत ओएसडी हे पद राहणारच नाही, अशी रोखठोक भूमिका घेतली असती तर सगळे ओएसडी घरी गेले असते पण, तसे न म्हटल्याने एकप्रकारे ओएसडींना अभयच मिळाले आहे. (विशेष प्रतिनिधी) शासनाचे आर्थिक नुकसाननियमानुसार मंत्र्यांकडील खासगी सचिव हे वर्ग एक श्रेणीचे (अवर सचिव/उपजिल्हाधिकारी) अधिकारी असावेत. मात्र, प्रत्यक्षात राज्यातील अनेक मंत्र्यांकडील खासगी सचिव हे त्यावरील पदांचे अधिकारी आहेत. वरच्या पदांवरील अधिकाऱ्यांना खालच्या पदावर नेमल्याने वरची पदे रिक्त तर राहतातच शिवाय शासनाचे आर्थिक नुकसानदेखील होते.