सायली जोशी - पटवर्धन,
पुणे- पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ग्रीन कॉरिडॉर ही संकल्पना येत्या काळात आणखी विकसित करण्याचा विचार आहे. यासाठी सर्व शहरांचा एकमेकांशी समन्वय राहील, यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पुणे आणि राज्यात चालू असणाऱ्या पीसीपीएनडीटी कायद्याबाबत ते म्हणाले, ‘‘पीसीपीएनडीटीच्या वादावर राज्य शासनाचे बारकाईने लक्ष आहे. डॉक्टर आणि संबंधित यंत्रणा यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न शासन करणार आहे. या दोन्हींच्या बाजू समजून घेऊन लवकरच योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार. याबरोबरच कायद्याचा विपर्यास किंवा अतिरेक काढून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाशी बोलणे चालू आहे.’’नव्याने करण्यात आलेली महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेत अनेक बदल करण्यात आले असून जास्तीत जास्त रुग्णाांना या योजनांचा फायदा कसा होईल यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले. तळागाळातील नागरीकांपर्यंत शासकीय योजना पोहोचाव्यात यासाठी जनजागृती महत्त्वाची असून त्यासाठी विशेष यंत्रणा करण्याचा विचार आहे. पुण्यातील शासकीय कॅन्सर रुग्णालयाबाबत प्रस्ताव राज्य शासनाकडे आला आहे असे सांगत असतानाच या रुग्णालयासाठी जागेचा शोध चालू असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. >सध्या पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांमध्ये खासगी रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपण होते. त्याचबरोबर शासकीय रुग्णालयातही अवयव प्रत्यारोपण व्हायला हवे. एखाद्या आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णाचे अवयव प्रत्यारोपण झाल्यास ते शासनाचे खरे यश असेल. त्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.विसंवाद हेच कारणडॉक्टरांवरील हल्ल्याला विसंवाद हे प्रमुख कारण असून यासाठी डॉक्टरांचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. यामध्ये रुग्णाची मानसिकता जाणून त्यानुसार काही गोष्टींची आखणी करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने आज तसे काहीच होत नाही. कारण प्रत्येक जण व्यावसायिक झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांबद्दल रुग्णांच्या मनात असणारा आदर दिवसेंदिवस कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. फॅमिली फिजिशियन ही संकल्पना लोप पावत असल्याचेही दीपक सावंत म्हणाले.